शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
5
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
6
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
7
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
8
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
9
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
10
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
11
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
12
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
13
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
14
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
15
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
16
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
17
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
18
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
19
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
20
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कुरार पोलिसांची छप्परतोड कारवाई, एटीएममध्ये बोलबच्चन करत लुबाडणाऱ्या टोळीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2023 12:15 IST

मशीनमधून गुपचूप रक्कम काढताना साथीदार पीडिताला व्यवहार पूर्ण झाल्याचा विश्वास दाखवत त्यांची फसवणूक करायचे.    

मुंबई : नागरिकांना पैसे जमा करणे किंवा काढण्यास मदत करण्याच्या बहाण्याने एटीएम केंद्रांवर जाऊन त्यांची फसवणूक करणाऱ्या टोळीच्या चौघांना कुरार पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींनी छप्पर तोडून पळण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा गाशा गुंडाळण्यात आला. त्यांनी महाराष्ट्रासह देशभरात असंख्य लोकांची फसवणूक केल्याची माहिती असून अद्याप मुंबईत घडलेल्या नऊ प्रकरणांची उकल केल्याचा पोलिसांचा दावा आहे. 

पोलिसांनी धर्मवीर किशून महतो (३२), विवेककुमार पासवान (२८), बीरलाल साह (२३) आणि किशोर महतो (२८) अशी त्यांची नावे असून टोळीचा आणखी एक सदस्य अरुण प्रसाद (२८) हा पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. अटक करण्यात आलेले आरोपी मूळचे बिहारचे असून, त्यांच्यावर विविध कलमांखाली गुन्हा दाखल करत त्यांची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली आहे. गेल्या तीन ते चार वर्षांपासून ते पकडले न जाता देशभरात फसवणुकीच्या कारवायांमध्ये गुंतले आहेत. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार लोकांना पैसे जमा करणे किंवा काढण्यात मदत करण्याच्या बहाण्याने एटीएम केंद्रांवर जायचे. त्या टोळीचा एक सदस्य केंद्रात राहून पीडितांना मदत करण्याचा बहाणा करतो तर दुसरा घाईत असल्याचे भासवत असतो. मशीनमधून गुपचूप रक्कम काढताना साथीदार पीडिताला व्यवहार पूर्ण झाल्याचा विश्वास दाखवत त्यांची फसवणूक करायचे.    

तर  दुसऱ्या पद्धतीत नोटांचे बंडल घेऊन ग्राहक म्हणून उभे राहायचे. त्या बंडलमध्ये फक्त पुढच्या आणि मागच्या नोटा खऱ्या तर बाकीचे कोरे कागद होते. पैसे जमा करणाऱ्या पीडितांना नकळत ते बंडल दिले जायचे आणि त्या बदल्यात खऱ्या नोटा घेऊन पसार व्हायचे. लिला जेवियर (५७) या महिलेला मे महिन्यात या टोळक्याने अशाच प्रकारे ५० हजार रुपयांना लुबाडले होते. पोलिस उपायुक्त स्मिता पाटील आणि वरिष्ठ निरीक्षक सतेश गाढवे यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलिस निरीक्षक पंकज वानखेडे आणि पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि कॉल डेटा रेकॉर्डचा वापर करत आरोपींचे भांडुपमधील ठिकाण शोधले आणि टोळीतील इतर सदस्यांची माहिती देणाऱ्या धर्मवीर महतोला अटक केली. 

गुन्ह्यांची होणार उकलअटक कारवाईदरम्यान आरोपींनी छत फोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांचा पाठलाग करत तिघांना पकडले, तर एक जण पळून गेला. अटक केलेल्या व्यक्तींनी त्यांच्या गुन्ह्यांची कबुली दिली असून मुंबईसह, केरळ आणि दक्षिण भारतातील गुन्हे उघड झाले आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी