शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

मनसुख हिरेन प्रकरणात धक्कादायक माहिती समोर; 'तो' कॉल सचिन वाझेंनीच केला होता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2021 21:19 IST

Sachin Vaze : मी त्या तावडे नावाच्या पोलिसाला घोडबंदर येथे भेटायला चाललो आहोत, असं मनसुखने ४ मार्चच्या रात्री त्याच्या पत्नीला सांगितले होते.

ठळक मुद्देहा फोन सचिन वाझे यांनीच तावडे नावाने केला होता, अशी माहिती धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरेन यांना तावडे नावाच्या पोलीस कॉन्स्टेबलच्या नावाने फोन सचिन वाझे यांनीच केला होता, अशी धक्कादायक माहिती उघड झाली आहे. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ सापडल्यानंतर मनसुख हिरेन यांचा काही दिवसांनी म्हणजेच ५ मार्चला मुंब्रा येथील रेतीबंदर खाडीत मृतदेह आढळला. आता मनसुख हत्या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA)  करत आहे. या तपासात एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. हत्येच्या आदल्यादिवशी म्हणजेच ४ मार्चला मनसुख यांना तावडे नावाच्या पोलीस कॉन्स्टेबलने फोन केल्याचे मनसुख यांच्या पत्नीने माहिती दिली. मात्र हा फोन सचिन वाझे यांनीच तावडे नावाने केला होता, अशी माहिती धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

४ मार्चला मनसुख यांना तावडे नावाच्या एका कांदिवली गुन्हे शाखेतील पोलिसांचा फोन आला आणि त्याने घोडबंदर येथे त्यांना भेटायला बोलावले. त्यानुसार मनसुख घराबाहेर पडले होते आणि त्यानंतर मनसुख यांचा मोबाईल बंद झाला आणि ते  गायब झाले होते. सुरुवातीला एटीएस या प्रकरणाचा तपास करत होतं. त्यावेळी सचिन वाझे यांचा साथीदार निलंबित पोलीस विनायक शिंदे याने तावडे नावाच्या अधिकाराच्या नावाने मनसुख यांना ४ मार्चच्या रात्री फोन केला होता आणि त्याची हत्या केली होती. पण आता तपासात जी माहिती समोर आली आहे ती खळबळजनक आहे.

तांत्रिक पुराव्याच्या आधारे NIA ने दावा केला की, ४ मार्चच्या रात्री मनसुख जेव्हा त्याच्या दुकानातून घरी गेले आणि घरी जेवत असताना म्हणून मनसुखला Whats App  कॉल आला होता. त्यानुसार मनसुखने त्याच्या पत्नीला सांगितले होते की, एका तावडे नावाच्या  कांदिवली क्राइम ब्रांचच्या पोलिसाने फोन केला होता आणि अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणी चौकशी करायची आहे. त्यामुळे मी त्या तावडे नावाच्या पोलिसाला घोडबंदर येथे भेटायला चाललो आहोत, असं मनसुखने ४ मार्चच्या रात्री त्याच्या पत्नीला सांगितले होते. हे सर्व मनसुख यांच्या पत्नी विमला यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. 

मात्र, ४ मार्चच्या रात्री मनसुख यांना फोन करणारा दुसरा तिसरा कोणी नसून सचिन वाझेच होता आणि सचिन वाझे यांनी Whats App कॉलच्या माध्यमातून मनसुख यांना घराखाली बोलावून घेतले होते, अशी माहिती न्यूज १८ लोकमतने दिली आहे. नंतर सचिन वाझे यांनी मनसुख यांना त्याच्याच काही माणसांच्या हवाली केले. त्यानंतर मनसुख बेपत्ता झाले आणि ५ मार्चच्या सकाळी १०. ३० च्या सुमारास मृतदेह ठाण्यातील मुंब्रा रेतीबंदर खाडी येथे आढळून आला.

टॅग्स :sachin Vazeसचिन वाझेMansukh Hirenमनसुख हिरणMukeshमुकेशNIAराष्ट्रीय तपास यंत्रणाAnti Terrorist Squadएटीएस