शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

मनसुख हिरेन प्रकरणात धक्कादायक माहिती समोर; 'तो' कॉल सचिन वाझेंनीच केला होता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2021 21:19 IST

Sachin Vaze : मी त्या तावडे नावाच्या पोलिसाला घोडबंदर येथे भेटायला चाललो आहोत, असं मनसुखने ४ मार्चच्या रात्री त्याच्या पत्नीला सांगितले होते.

ठळक मुद्देहा फोन सचिन वाझे यांनीच तावडे नावाने केला होता, अशी माहिती धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरेन यांना तावडे नावाच्या पोलीस कॉन्स्टेबलच्या नावाने फोन सचिन वाझे यांनीच केला होता, अशी धक्कादायक माहिती उघड झाली आहे. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ सापडल्यानंतर मनसुख हिरेन यांचा काही दिवसांनी म्हणजेच ५ मार्चला मुंब्रा येथील रेतीबंदर खाडीत मृतदेह आढळला. आता मनसुख हत्या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA)  करत आहे. या तपासात एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. हत्येच्या आदल्यादिवशी म्हणजेच ४ मार्चला मनसुख यांना तावडे नावाच्या पोलीस कॉन्स्टेबलने फोन केल्याचे मनसुख यांच्या पत्नीने माहिती दिली. मात्र हा फोन सचिन वाझे यांनीच तावडे नावाने केला होता, अशी माहिती धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

४ मार्चला मनसुख यांना तावडे नावाच्या एका कांदिवली गुन्हे शाखेतील पोलिसांचा फोन आला आणि त्याने घोडबंदर येथे त्यांना भेटायला बोलावले. त्यानुसार मनसुख घराबाहेर पडले होते आणि त्यानंतर मनसुख यांचा मोबाईल बंद झाला आणि ते  गायब झाले होते. सुरुवातीला एटीएस या प्रकरणाचा तपास करत होतं. त्यावेळी सचिन वाझे यांचा साथीदार निलंबित पोलीस विनायक शिंदे याने तावडे नावाच्या अधिकाराच्या नावाने मनसुख यांना ४ मार्चच्या रात्री फोन केला होता आणि त्याची हत्या केली होती. पण आता तपासात जी माहिती समोर आली आहे ती खळबळजनक आहे.

तांत्रिक पुराव्याच्या आधारे NIA ने दावा केला की, ४ मार्चच्या रात्री मनसुख जेव्हा त्याच्या दुकानातून घरी गेले आणि घरी जेवत असताना म्हणून मनसुखला Whats App  कॉल आला होता. त्यानुसार मनसुखने त्याच्या पत्नीला सांगितले होते की, एका तावडे नावाच्या  कांदिवली क्राइम ब्रांचच्या पोलिसाने फोन केला होता आणि अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणी चौकशी करायची आहे. त्यामुळे मी त्या तावडे नावाच्या पोलिसाला घोडबंदर येथे भेटायला चाललो आहोत, असं मनसुखने ४ मार्चच्या रात्री त्याच्या पत्नीला सांगितले होते. हे सर्व मनसुख यांच्या पत्नी विमला यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. 

मात्र, ४ मार्चच्या रात्री मनसुख यांना फोन करणारा दुसरा तिसरा कोणी नसून सचिन वाझेच होता आणि सचिन वाझे यांनी Whats App कॉलच्या माध्यमातून मनसुख यांना घराखाली बोलावून घेतले होते, अशी माहिती न्यूज १८ लोकमतने दिली आहे. नंतर सचिन वाझे यांनी मनसुख यांना त्याच्याच काही माणसांच्या हवाली केले. त्यानंतर मनसुख बेपत्ता झाले आणि ५ मार्चच्या सकाळी १०. ३० च्या सुमारास मृतदेह ठाण्यातील मुंब्रा रेतीबंदर खाडी येथे आढळून आला.

टॅग्स :sachin Vazeसचिन वाझेMansukh Hirenमनसुख हिरणMukeshमुकेशNIAराष्ट्रीय तपास यंत्रणाAnti Terrorist Squadएटीएस