शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच ग्रामस्थाची ग्राम सचिवाला मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2020 13:49 IST

आरोपीवर गुन्हा दाखल, कारण वेगळेच असल्याची गावात चर्चा

चेतन घोगरे अंजनगाव सुर्जी :चिंचोली खुर्द ग्रामपंचायत मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ग्रामसभा सुरू होण्याच्या अगोदरच ग्रामसचिव व गावातील नागरिक गुणवंत मानकर यांच्यामध्ये हाणामारी झाली. त्यानंतर ग्राम सचिवाच्या तक्रारीवरून रहिमापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला तत्काळ अटक करण्यात आली आहे.

चिंचोली खुर्द ग्रामपंचायत आवारात प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सकाळी झेंडावंदन झाल्यानंतर ग्रामसचिव रमेश सुखदेवराव उईके (वय ५०) व  ग्रामपंचायत कर्मचारी नंदकिशोर वसु, कमलेश खंडारे, प्रमोद आंबडकर हे आपल्या कार्यालयात शासकीय कामकाज करत होते. त्यावेळी गावातील नागरिक गुणवंत तुळशीराम मानकर हे आले. त्यांनी माझ्या घरकुलाचे व संडासचे काम का झाले नाही यावरुन वाद घातला. त्यानंतर शिवीगाळ केली व त्यांनी मारहाण केली व शासकीय दस्तावेजाची0 नासधूस केल्याची तक्रार रमापुर पोलीस स्टेशनला देण्यात आली आहे. 

यावेळी तेथील फोटोंचे नुकसान झाले. यामुळे काही वेळ गावामध्ये तणावाचे वातावरण होते. ग्रामसचिव यांच्या तक्रारीवरून रहिमापूर पोलीस ठाण्यात मुंबई अधिनियम ३५३, ३३२, ४२७, ५०४ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सचिवांच्या तक्रारीवरून आरोपीवर गुन्हा दाखल केला. तसेच तात्काळ अटक करण्यात आली आहे.- जमील शेख ,ठाणेदार रहिमापुर

सत्य घटना वेगळीच....आरोपी हा मागील पाच महिन्यांपासून आपल्या राहत्या घराची माहिती ग्रामसचिवाकडे मागत होता. पण गावातील राजकारणामुळे ग्रामसचिव माहिती देण्यास टाळाटाळ करीत होता. म्हणून आज हे पाऊल गुणवंत मानकर यांनी उचल्याची चर्चा गावात रंगली होती.

टॅग्स :Policeपोलिस