शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

Rashmi Shukla: फोन टॅपिंग महाराष्ट्र सरकारच्या सांगण्यावरून; रश्मी शुक्लांचा न्यायालयात मोठा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2021 20:32 IST

Rashmi Shukla Phone tapping Case: डीजीपींच्या आदेशाने रश्मी शुक्ला यांनी ही कारवाई केली होती. त्या केवळ आदेशाचे पालन करत होत्या. राज्य सरकारचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे (Sitaram Kunte) यांची परवानगी घेतली होती, असे वरिष्ठ वकील जेठमलानी यांनी सांगितले.

Rashmi Shukla Phone tapping Case: मुंबई: महाराष्ट्रात फोन टॅपिंग प्रकरणी राज्य गुप्त वार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त डॉ. रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्या वकिलाने उच्च न्यायालयात मोठा दावा केला आहे. महाराष्ट्र सरकारनेच रश्मी शुक्ला यांना काही लोकांचे फोन नंबर टॅप करण्याची (Phone Tapping) परवानगी दिली होती, असे त्यांनी न्यायालयाला सांगितले आहे. पोलिस दलातील कथित ट्रान्सफर आणि पोस्टिंगवेळच्या भ्रष्टाचाराच्या तक्रारी खऱ्या आहेत का हे तपासण्यासाठी ही परवानगी दिली होती, अशी माहिती शुक्ला यांच्यावतीने देण्यात आली आहे. (Interception of phones done with Maharashtra govt's nod: IPS officer Rashmi Shukla to Bombay High Court)

रश्मी शुक्ला सध्या केंद्रीय प्रतिनियुक्तीवर हैदराबाद येथे कार्यरत आहेत. शुक्ला यांचे वकील महेश जेठमलानी यांनी आज उच्च न्यायालयाला सांगितले की, महाराष्ट्राच्या डीजीपी यांनी काही फोन नंबर टॅप करण्याचे आदेश दिले होते. हे नंबर राजकीय व्यक्तींशी संपर्क असलेल्या काही मध्यस्थांचे होते. ते भ्रष्टाचारात गुंतलेले होते. त्यांच्याकडून इच्छित ठिकाणी बदलीसाठी पोलीस अधिकाऱ्यांकडून मोठी रक्कम मागितली जायची. 

रश्मी शुक्ला यांच्या याचिकेवर आज उच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्ती एस एस शिंदे आणि एन जे जामदार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. मुंबई पोलिसांनी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याविरोधात त्यांनी आव्हान दिले आहे.

रश्मी शुक्ला बळीचा बकरा...जेठमलानी यांनी सांगितले की, डीजीपींच्या आदेशाने रश्मी शुक्ला यांनी ही कारवाई केली होती. त्या केवळ आदेशाचे पालन करत होत्या. शुक्ला यांनी भारतीय़ टेलीग्राफ नियमांनुसार राज्य सरकारचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे (Sitaram Kunte) यांची परवानगी घेतली होती. 17 जुलै ते 29 जुलै 2020 या काळात कुंटे यांनी याची परवानगी दिली होती. मात्र, नंतर त्यांनी सांगितले की, परवानगी मागताना चुकीची माहिती देण्यात आली. आता शुक्ला यांना बळीचा बकरा बनविले जात आहे. गुन्हे रोखण्यासाठी सबळ कारणामुळे वायरलेस संदेश टॅप करणे वैध असल्याचेही जेठमलानी यांनी न्यायालयाला सांगितले. 

टॅग्स :Rashmi Shuklaरश्मी शुक्लाHigh Courtउच्च न्यायालयMaharashtraमहाराष्ट्रPoliceपोलिस