शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
3
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
4
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
5
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
6
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
7
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
8
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
9
गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
10
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
11
Meesho च्या शेअरला अपर सर्किट; इश्यू प्राईजच्या दुप्पट झाली किंमत, सह-संस्थापक बनले अब्जाधीश
12
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
13
विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ; जाणून घ्या त्याचे महत्व
14
Payal Gaming: कोण आहे पायल गेमिंग? १.२० मिनटांचा MMS लीक झाल्यानंतर आली चर्चेत!
15
Video: BJP आमदाराच्या मुलाचा शाही विवाह सोहळा; तब्बल ७० लाखांच्या फटाक्यांची केली आतषबाजी
16
ओला-उबरला टक्कर! १ जानेवारीपासून 'भारत टॅक्सी' ॲप होणार लाँच; प्रवाशांना स्वस्त प्रवास आणि ड्रायव्हर्सची होणार जास्त कमाई
17
लग्नानंतर एका वर्षात शोभिता धुलिपाला देणार गुडन्यूज? सासरे नागार्जुन म्हणाले, "योग्य वेळ..."
18
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
19
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
20
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

राकेश पाटील हत्या प्रकरण : मानेवरचा घावच बेतला जीवावर, आरोपी आले होते हत्येच्या हेतूनेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2020 01:34 IST

Rakesh Patil murder case News : राकेश पाटील यांची हत्या झाल्यावर नेमकी ही हत्या का आणि कशी झाली, याचे कारण पुढे येत आहे.

 अंबरनाथ : राकेश पाटील यांची हत्या झाल्यावर नेमकी ही हत्या का आणि कशी झाली, याचे कारण पुढे येत आहे. पाटील यांना एका इमारतीच्या ग्रीलचे काम मिळाले होते. मात्र, ते काम डी. मोहन यांना संबंधित बांधकाम व्यावसायिकाने दिले होते. त्यावरून राकेश आणि डी. मोहन यांच्यात वाद झाला आणि त्याच वादातून डी. मोहन याने साथीदारांच्या मदतीने पाटील यांंची हत्या केल्याचे समोर आले आहे. हत्येच्या वेळी राकेश याचा भाऊ आणि त्याचे मित्रही सोबत होते. राकेश यांच्या शरीरावर नऊ वार करण्यात आले असून त्यातील एक घाव हा मानेवर होता. त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.अंबरनाथ शिव मंदिर परिसरातील जैनम रेसिडेन्सी या इमारतीच्या आवारात राकेश आणि डी. मोहन यांच्यात वाद झाला होता. राकेश आणि त्यांच्या कुटुंबीयांची जागा एका बिल्डरला विकासासाठी दिली आहे. त्या जागेपासून बाजूलाच नव्या इमारतीचे काम सुरू असून त्याच बिल्डरची जागा असल्याने तेेथील काम संबंधित बांधकाम व्यावसायिकाने राकेश यांना दिले होते, असे फिर्यादीत नमूद केले आहे. मात्र, हे काम करताना डी. मोहन याने संबंधित बांधकाम व्यावसायिकाकडून परस्पर त्या इमारतीच्या ग्रीलचे काम घेतले होते. फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे राकेश आणि त्याचे भाऊ जे काम करत होते, तेच काम डी. मोहन यांनी मिळविल्याने पाटील आणि डी. मोहन यांच्यात वाद झाला. त्यामुळेच डी. मोहन आणि त्यांच्या साथीदारांनी राकेश, त्याचा भाऊ अजय आणि त्याच्या मित्रांवर हल्ला केला.या हल्ल्यात राकेश यालाच लक्ष्य करत धारदार शस्त्राने हल्ला केला. त्याला वाचविण्यासाठी त्याचे मित्र आणि भावाने प्रयत्न केला. मात्र, त्यांनी राकेशच्या मानेवर आणि पाठीवर घाव घातल्याने त्याचा मृत्यू झाला. मारेकरी हे गाडीमध्ये शस्त्र घेऊनच आल्याने मारेकऱ्यांचा हेतू हा राकेश यांना मारण्याचाच होता, हे समोर आले आहे. ...ही तर सत्तेची मस्ती : बाळा नांदगावकर यांचा आरोपराकेशची हत्या म्हणजे सत्तेची मस्ती आहे. हल्लेखोरांसोबत हत्येचा कट रचणारे यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे. ही हत्या ठरवून केली आहे. पोलीस आयुक्तांकडे यासंदर्भात वास्तव मांडून आरोपींवर कारवाईची मागणी करणार असल्याचे मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले. नांदगावकर, आमदार राजू पाटील यांनी शुक्रवारी राकेश यांच्या कुटुंबाची भेट घेतली. ही हत्या करून गावात दहशत माजविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. योग्यवेळी उत्तर दिले जाईल, असा इशारा नांदगावकर यांनी दिला. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मोबाइलवर पाटील यांच्या कुटुंबीयांशी चर्चा करुन त्यांना सांत्वन दिले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीambernathअंबरनाथ