शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

राकेश पाटील हत्या प्रकरण : मानेवरचा घावच बेतला जीवावर, आरोपी आले होते हत्येच्या हेतूनेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2020 01:34 IST

Rakesh Patil murder case News : राकेश पाटील यांची हत्या झाल्यावर नेमकी ही हत्या का आणि कशी झाली, याचे कारण पुढे येत आहे.

 अंबरनाथ : राकेश पाटील यांची हत्या झाल्यावर नेमकी ही हत्या का आणि कशी झाली, याचे कारण पुढे येत आहे. पाटील यांना एका इमारतीच्या ग्रीलचे काम मिळाले होते. मात्र, ते काम डी. मोहन यांना संबंधित बांधकाम व्यावसायिकाने दिले होते. त्यावरून राकेश आणि डी. मोहन यांच्यात वाद झाला आणि त्याच वादातून डी. मोहन याने साथीदारांच्या मदतीने पाटील यांंची हत्या केल्याचे समोर आले आहे. हत्येच्या वेळी राकेश याचा भाऊ आणि त्याचे मित्रही सोबत होते. राकेश यांच्या शरीरावर नऊ वार करण्यात आले असून त्यातील एक घाव हा मानेवर होता. त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.अंबरनाथ शिव मंदिर परिसरातील जैनम रेसिडेन्सी या इमारतीच्या आवारात राकेश आणि डी. मोहन यांच्यात वाद झाला होता. राकेश आणि त्यांच्या कुटुंबीयांची जागा एका बिल्डरला विकासासाठी दिली आहे. त्या जागेपासून बाजूलाच नव्या इमारतीचे काम सुरू असून त्याच बिल्डरची जागा असल्याने तेेथील काम संबंधित बांधकाम व्यावसायिकाने राकेश यांना दिले होते, असे फिर्यादीत नमूद केले आहे. मात्र, हे काम करताना डी. मोहन याने संबंधित बांधकाम व्यावसायिकाकडून परस्पर त्या इमारतीच्या ग्रीलचे काम घेतले होते. फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे राकेश आणि त्याचे भाऊ जे काम करत होते, तेच काम डी. मोहन यांनी मिळविल्याने पाटील आणि डी. मोहन यांच्यात वाद झाला. त्यामुळेच डी. मोहन आणि त्यांच्या साथीदारांनी राकेश, त्याचा भाऊ अजय आणि त्याच्या मित्रांवर हल्ला केला.या हल्ल्यात राकेश यालाच लक्ष्य करत धारदार शस्त्राने हल्ला केला. त्याला वाचविण्यासाठी त्याचे मित्र आणि भावाने प्रयत्न केला. मात्र, त्यांनी राकेशच्या मानेवर आणि पाठीवर घाव घातल्याने त्याचा मृत्यू झाला. मारेकरी हे गाडीमध्ये शस्त्र घेऊनच आल्याने मारेकऱ्यांचा हेतू हा राकेश यांना मारण्याचाच होता, हे समोर आले आहे. ...ही तर सत्तेची मस्ती : बाळा नांदगावकर यांचा आरोपराकेशची हत्या म्हणजे सत्तेची मस्ती आहे. हल्लेखोरांसोबत हत्येचा कट रचणारे यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे. ही हत्या ठरवून केली आहे. पोलीस आयुक्तांकडे यासंदर्भात वास्तव मांडून आरोपींवर कारवाईची मागणी करणार असल्याचे मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले. नांदगावकर, आमदार राजू पाटील यांनी शुक्रवारी राकेश यांच्या कुटुंबाची भेट घेतली. ही हत्या करून गावात दहशत माजविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. योग्यवेळी उत्तर दिले जाईल, असा इशारा नांदगावकर यांनी दिला. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मोबाइलवर पाटील यांच्या कुटुंबीयांशी चर्चा करुन त्यांना सांत्वन दिले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीambernathअंबरनाथ