शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
7
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
8
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
9
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
10
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
11
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
12
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
13
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
14
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
15
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
16
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
17
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
18
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
19
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट

लाचखोरांना पकडण्यात पुणे विभाग आघाडीवर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2018 12:39 IST

एका पाठोपाठ दोन सापळा कारवाईत कोटीच्या कोटी रुपयांची लाच घेतली जात असल्याचे उघड झाल्याने राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे़.

ठळक मुद्देराज्यात महसुल विभागातून ३ कोटींची लाच पकडली२०१७ मध्ये पुणे विभागाने सर्वाधिक केल्या १८७ सापळा कारवाया राज्यभरात अपसंपदा याचे २२ गुन्हे आणि अन्य भ्रष्टाचाराचे २३ गुन्हे या वर्षभरात दाखल राज्यात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आतापर्यंत ८८२ सापळा कारवाया

पुणे : राज्यात लाचखोरांना पकडण्यात पुणे विभागाने नेहमीप्रमाणे आघाडी घेतली असून तब्बल २०० सापळा केसेस करुन लाचखोरांवर कारवाई करण्याची धडाडी दाखविली आहे़. २०१७ मध्येही पुणे विभागाने सर्वाधिक १८७ सापळा कारवाया केल्या होत्या़ तर २०१६ मध्ये १८५ सापळा कारवाया केल्या होत्या़. भूमी अभिलेख उपसंचालकाने एका जमिनीच्या प्रकरणात निकाल दिल्यानंतर काही वेळात १ कोटी ७० लाख रुपयांची लाच स्वीकारताना अ‍ॅड़. रोहित शेंडे यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले होते़. त्यानंतर शनिवारी मुळशीच्या तहसीलदाराला १ कोटी रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले़. एका पाठोपाठ दोन सापळा कारवाईत कोटीच्या कोटी रुपयांची लाच घेतली जात असल्याचे उघड झाल्याने राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे़. यापूर्वी पुणे विभागाने वन विभागाच्या अधिकाऱ्यांना ११ लाख रुपयांची लाच घेताना याच वर्षी पकडले होते़. लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कारवायाचा धडाका सुरु केल्याने शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कार्यालयात लाच घेण्याऐवजी सुट्टीच्या दिवशी तसेच बाहेर रात्री उशिरा पैसे घेण्यास सुरुवात केली़. त्यावर लाचलुचपत ने अगदी सुट्टीच्या दिवशी आणि रात्री उशिराही कारवाया करुन अशा लाचखोरांचा पर्दाफाश केला आहे़.शिक्षण विभागातील अधिकारी महिलेने सुट्टीच्या दिवशी व त्या संस्थेमध्ये येऊन पैसे घेणार असल्याचे कळविले होते़. तेव्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रविवारच्या सुट्टीच्या दिवशी सकाळी लवकर सापळा रचला व या महिला अधिकाऱ्यांला पकडले़. पुणे -मुंबई रस्त्यावर वाहनचालकांकडून घाटातून मोठ्या ट्रकला परवानगी देण्यासाठी लाच घेणाऱ्या रस्ता सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यावर भर रस्त्यात पहाटे साडेतीन वाजता खंडाळा येथे कारवाई करुन पकडले़. देशभरातील इतक्या पहाटे केलेली ही बहुदा पहिलीच कारवाई असावी़. ़़़़़़़़पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ७७ सापळा कारवाया झाल्या असून त्याखालोखाल सोलापूर ३७, कोल्हापूर ३४, सातारा २९, सांगली २३ सापळा कारवाया करण्यात आल्या आहेत़. .........राज्यात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आतापर्यंत ८८२ सापळा कारवाया केल्या असून त्यात ११६७ जणांना पकडण्यात आले आहे़. २०१७ साली ८६६ सापळा कारवाया करण्यात आल्या असून त्यात ११३३ जणांना पकडण्यात आले होते़. सापळा कारवायांबरोबर राज्यभरात अपसंपदा याचे २२ गुन्हे आणि अन्य भ्रष्टाचाराचे २३ गुन्हे या वर्षभरात दाखल करण्यात आले आहेत़. लाचखोरीमध्ये महसुल विभाग आघाडीवर असून त्यातील २१५ प्रकरणे उघडकीस आली़. त्यात ३ कोटी ६ लाख १४ हजार १०० रुपयांची लाच स्वीकारली गेली आहे़. त्यात एकूण २७० जणांना पकडण्यात आले आहे़.पोलिसांविरोधात १९५ लाचखोरीची प्रकरणे दाखल झाली असून त्यात २५८ जणांकडून २४ लाख ६६ हजार ९०० रुपयांची लाच स्वीकारण्यात आली होती़. राज्यातील महापालिकांमध्ये ४७ कारवाया करण्यात येऊन त्यात १६ लाख ६८ हजार ५५० रुपयांची लाच स्वीकारण्यात आली होती़. नगर रचना विभागात ३ प्रकरणात सापळा कारवाई करण्यात आली असून त्यात १३ लाख ७५ हजार रुपये ५ जणांकडून पकडण्यात आले़.  राज्यभरात एकूण ८८२ प्रकरणात तब्बल ४ कोटी ४३ लाख ८६ हजार ८७८ रुपयांची लाच घेताना १ हजार १६७ जणांना पकडण्यात आले आहे़.

टॅग्स :PuneपुणेCorruptionभ्रष्टाचारAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग