शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Crime News : 50 लाखांची मदत अन् सरकारी नोकरी द्या, पीडित पुजाऱ्याच्या कुटुंबीयांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2020 10:31 IST

राज्याच्या मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी या घटनेबाबत संताप व्यक्त केला आहे. पोलिसांनी आत्तापर्यंत एका आरोपीस अटक केली आहे. प्राथमिक माहितीनुसार, ही घटना बुधवारी सकाळी घडली.

जयपूर - राजस्थानमधील करौली परिसरात जमिनीच्या वादावरुन मंदिराच्या पुजाऱ्याची जाळून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. राजस्थानातील करौली येथील बुकना या गावी मंदिराच्या जमिनीवरून दोन गटामध्ये झालेल्या वादात पुजाऱ्यावर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्यात आलं. जळालेल्या गंभीर अवस्थेत पुजाऱ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर, पीडित कुटुंबीयांन अंत्यसंस्कारही करता आले नाहीत. याप्रकरणी पीडित कुटुबीयांनी आरोपींना पोलिसांनी पाठिशी घातल्याचा आरोप केला आहे. तसेच, आम्हाला 50 लाख रुपये आर्थिक मदत आणि एकास सरकारी नोकरी देण्याची मागणी केली आहे.  

राज्याच्या मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी या घटनेबाबत संताप व्यक्त केला आहे. पोलिसांनी आत्तापर्यंत एका आरोपीस अटक केली आहे. प्राथमिक माहितीनुसार, ही घटना बुधवारी सकाळी घडली. मंदिराच्या जागा बळकावण्यासाठी कैलास मीणा, शंकर, नमो, रामलखन मीणा आदी छप्पर टाकत होते. यादरम्यान वयस्कर पुजारी बाबूलाल यांनी ते सुरु असलेले काम थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी आरोपींनी त्यांच्यावर पेट्रोल टाकून पेटवून दिलं. त्यामध्ये पुजारी होरपळून गेले होते. मंदिराच्या परिसरातील अतिक्रमण रोखल्यामुळेच त्यांना आपला जीव गमवावा लागला आहे.

याप्रकरणी पुजाऱ्याच्या पीडित कुटुंबीयांनी काही पोलिसांवर आरोप केले आहेत. आरोपींना पाठिशी घालणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी करत आम्हाला पोलीस संरक्षण मिळावे, अशी मागणीही पीडित कुटुंबीयांनी केली आहे. आम्हाला बाबुलाल यांच्या अंत्यसंस्कारातही सामिल होता आले नाही, त्यांचे अंत्यदर्शनही घेता आले नसल्याची खंत नातेवाईकांनी बोलून दाखवली. तसेच, आम्हाल 50 लाख रुपयांची आर्थिक मदत मिळावी, व कुटुंबातील एका सदस्यास सरकारी नोकरी द्यावी, अशी मागणीही नातेवाईकांनी केली आहे.  

काय आहे संपूर्ण प्रकरण?

करौलीच्या बुकना गावात पुजार्‍याला जिवे मारण्यात आले. बुधवारी सायंकाळी उपचारादरम्यान जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात पुजाऱ्याच्या वेदनादायक मृत्यूमुळे राजधानी जयपूरसह करौली जिल्ह्यातील पुजारी आणि ब्राह्मण समाज या घटनेचा तीव्र विरोध करत आहे.

ब्राह्मण समाज, पुजारी संघ, ब्राह्मण समाज, बजरंग दल, भाजपा कार्यकर्त्यांनी पोलिस अधीक्षकांना निवेदन सादर करून आरोपींना अटक केली आहे आणि त्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. यासह पीडितेच्या कुटूंबाला 50 लाख रुपयांची नुकसान भरपाई आणि सरकारी नोकरीची मागणी करण्यात आली आहे. आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. इथल्या घटनेचे गांभीर्य पाहता पोलिस अधीक्षक मृदुल कच्छवा यांनी विशेष पथके तयार केली आणि या घटनेतील मुख्य आरोपी कैलाश मीनाला अटक केली, तर अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखूनRajasthanराजस्थान