शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

Crime News : 50 लाखांची मदत अन् सरकारी नोकरी द्या, पीडित पुजाऱ्याच्या कुटुंबीयांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2020 10:31 IST

राज्याच्या मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी या घटनेबाबत संताप व्यक्त केला आहे. पोलिसांनी आत्तापर्यंत एका आरोपीस अटक केली आहे. प्राथमिक माहितीनुसार, ही घटना बुधवारी सकाळी घडली.

जयपूर - राजस्थानमधील करौली परिसरात जमिनीच्या वादावरुन मंदिराच्या पुजाऱ्याची जाळून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. राजस्थानातील करौली येथील बुकना या गावी मंदिराच्या जमिनीवरून दोन गटामध्ये झालेल्या वादात पुजाऱ्यावर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्यात आलं. जळालेल्या गंभीर अवस्थेत पुजाऱ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर, पीडित कुटुंबीयांन अंत्यसंस्कारही करता आले नाहीत. याप्रकरणी पीडित कुटुबीयांनी आरोपींना पोलिसांनी पाठिशी घातल्याचा आरोप केला आहे. तसेच, आम्हाला 50 लाख रुपये आर्थिक मदत आणि एकास सरकारी नोकरी देण्याची मागणी केली आहे.  

राज्याच्या मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी या घटनेबाबत संताप व्यक्त केला आहे. पोलिसांनी आत्तापर्यंत एका आरोपीस अटक केली आहे. प्राथमिक माहितीनुसार, ही घटना बुधवारी सकाळी घडली. मंदिराच्या जागा बळकावण्यासाठी कैलास मीणा, शंकर, नमो, रामलखन मीणा आदी छप्पर टाकत होते. यादरम्यान वयस्कर पुजारी बाबूलाल यांनी ते सुरु असलेले काम थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी आरोपींनी त्यांच्यावर पेट्रोल टाकून पेटवून दिलं. त्यामध्ये पुजारी होरपळून गेले होते. मंदिराच्या परिसरातील अतिक्रमण रोखल्यामुळेच त्यांना आपला जीव गमवावा लागला आहे.

याप्रकरणी पुजाऱ्याच्या पीडित कुटुंबीयांनी काही पोलिसांवर आरोप केले आहेत. आरोपींना पाठिशी घालणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी करत आम्हाला पोलीस संरक्षण मिळावे, अशी मागणीही पीडित कुटुंबीयांनी केली आहे. आम्हाला बाबुलाल यांच्या अंत्यसंस्कारातही सामिल होता आले नाही, त्यांचे अंत्यदर्शनही घेता आले नसल्याची खंत नातेवाईकांनी बोलून दाखवली. तसेच, आम्हाल 50 लाख रुपयांची आर्थिक मदत मिळावी, व कुटुंबातील एका सदस्यास सरकारी नोकरी द्यावी, अशी मागणीही नातेवाईकांनी केली आहे.  

काय आहे संपूर्ण प्रकरण?

करौलीच्या बुकना गावात पुजार्‍याला जिवे मारण्यात आले. बुधवारी सायंकाळी उपचारादरम्यान जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात पुजाऱ्याच्या वेदनादायक मृत्यूमुळे राजधानी जयपूरसह करौली जिल्ह्यातील पुजारी आणि ब्राह्मण समाज या घटनेचा तीव्र विरोध करत आहे.

ब्राह्मण समाज, पुजारी संघ, ब्राह्मण समाज, बजरंग दल, भाजपा कार्यकर्त्यांनी पोलिस अधीक्षकांना निवेदन सादर करून आरोपींना अटक केली आहे आणि त्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. यासह पीडितेच्या कुटूंबाला 50 लाख रुपयांची नुकसान भरपाई आणि सरकारी नोकरीची मागणी करण्यात आली आहे. आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. इथल्या घटनेचे गांभीर्य पाहता पोलिस अधीक्षक मृदुल कच्छवा यांनी विशेष पथके तयार केली आणि या घटनेतील मुख्य आरोपी कैलाश मीनाला अटक केली, तर अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखूनRajasthanराजस्थान