शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
4
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
5
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
6
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
7
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
8
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
9
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
10
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
11
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
12
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
13
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
14
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
15
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
16
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
17
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
18
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
19
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
20
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
Daily Top 2Weekly Top 5

लग्न लागणार इतक्या नवरदेवाला घेऊन गेले पोलीस, त्याच्या लहान भावासोबत लावून दिलं नवरीचं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2021 10:29 IST

काही कळायच्या आत पोलीस नवरदेवाला मंडपातून उचलतात आणि घेऊन जातात. नवरीला याचा धक्का बसतो आणि ती घरात परत जाते.

ते म्हणतात ना जोड्या देवाघरीच तयार झालेल्या असतात. अशीच एक घटना बिहारच्या मोरारचकमध्ये बघायला मिळाली. नवरदेव मंडपात बसला होता. सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. नवरी लाजत मंडपात येत होती. तेव्हाच मंडपात पोलिसांची एन्ट्री झाली. काही कळायच्या आत पोलीस नवरदेवाला मंडपातून उचलतात आणि घेऊन जातात. नवरीला याचा धक्का बसतो आणि ती घरात परत जाते.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना १५ जून रोजी बिहारच्या मोरारचक गावात घडली. काही वेळातच या घटनेची माहिती गावात पसरली. अशात गावात पंचायत बोलवली जाते आणि तेव्हा ठरतं की, नवरीचं लग्न नवरदेवाच्या छोट्या भावासोबत लावून द्यावं. पंचायतचा हा निर्णय वराती आणि घरातील लोक मान्य करतात. घाईघाईत नवरदेवाच्या लहान भावाला तयार केलं जातं आणि त्याच मंडपात नवरीसोबत त्याचं लग्न लावून दिलं जातं. (हे पण वाचा : घरातून पळून गेलेल्या मुलीला समजली प्रियकराच्या पगाराची रक्कम, ऐनवेळी लग्नास दिला नकार)

काय आहे प्रकरण?

संजय यादवचा मुलगा अनिल कुमारचं लग्न मुरारचक गावातील भीम यादवच्या मुलीसोबत ठरलं होतं. सर्व कार्यक्रम ठरल्यानुसार पार पडत होते. १५ जूनला वरात पोहोचली तर त्यांचा चांगला मान-सन्मान करण्यात आला. दुसरीकडे अनिलच्या पहिल्या पत्नीला जसं समजलं की, त्याचं दुसरं लग्न होत आहे. ती पोलिसांकडे केली आणि हे लग्न रोखण्याची विनंती केली. तिने अनिलसोबत तिच्या लग्नाचा फोटोही पोलिसांना दाखवा. त्यानंतर पोलिसांनी महिलेची साथ दिली.

नवरदेवाचं आधीच झालं होतं लग्न

अशात गावाचे प्रमुख अशोक य़ादव यांना पोलिसांचा फोन आला. त्यांनी यादव यांना सांगितलं की, तुमच्या गावात जी वरात आली आहे तो मुलगा आधीच विवाहित आहे. त्याची पत्नी आमच्याकडे आली आहे. तुम्ही जाऊन लग्न थांबवा. आम्ही येतोय. अशोक यादव यांनी नवरीच्या वडिलांना हा सगळा प्रकार सांगितला. हे ऐकून त्यांनही धक्का बसला. गावातही ही खबर आगीसारखी पसरली. अशात अनिकची पहिली पत्नी पोलिसांना घेऊन तिथे पोहोचली. 

नवरदेवाच्या भावासोबत नवरीचं लग्न

महिलेने सांगितलं की, एक वर्षाआधीच आम्ही लग्न केलं आहे. पोलीस नवरदेवाला घेऊन पोलीस स्टेशनमद्ये गेले. त्यानंतर गावकऱ्यांनी वरातीत आलेल्या लोकांना बंदी बनवलं. अशात गावाच्या प्रमुखांनी यात मार्ग काढण्याचा विषय काढला. बरीच चर्चा झाल्यावर ठरलं की, नवरीचं लग्न नवरदेवाच्या लहान भावासोबत लावून दिलं जावं. दोन्हीकडील लोकांच्या उपस्थितीत सकाळी दोघांचं लग्न लावण्यात आलं. तेव्हा प्रकरण शांत झालं. तर अनिलकडून पोलिसांनी लिहून घेतलं की, तो त्याच्या पत्नीचा सांभाळ करेल. त्यानंतर पोलिसांनी त्यालाही सोडून दिलं.

टॅग्स :Biharबिहारmarriageलग्नCrime Newsगुन्हेगारी