शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
2
Air India Plane Crash in Ahmedabad : पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
3
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
4
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
5
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
6
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
7
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
8
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
9
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
10
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
11
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
12
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
13
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
14
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
15
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
16
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
17
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
18
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
19
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
20
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...

लग्न लागणार इतक्या नवरदेवाला घेऊन गेले पोलीस, त्याच्या लहान भावासोबत लावून दिलं नवरीचं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2021 10:29 IST

काही कळायच्या आत पोलीस नवरदेवाला मंडपातून उचलतात आणि घेऊन जातात. नवरीला याचा धक्का बसतो आणि ती घरात परत जाते.

ते म्हणतात ना जोड्या देवाघरीच तयार झालेल्या असतात. अशीच एक घटना बिहारच्या मोरारचकमध्ये बघायला मिळाली. नवरदेव मंडपात बसला होता. सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. नवरी लाजत मंडपात येत होती. तेव्हाच मंडपात पोलिसांची एन्ट्री झाली. काही कळायच्या आत पोलीस नवरदेवाला मंडपातून उचलतात आणि घेऊन जातात. नवरीला याचा धक्का बसतो आणि ती घरात परत जाते.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना १५ जून रोजी बिहारच्या मोरारचक गावात घडली. काही वेळातच या घटनेची माहिती गावात पसरली. अशात गावात पंचायत बोलवली जाते आणि तेव्हा ठरतं की, नवरीचं लग्न नवरदेवाच्या छोट्या भावासोबत लावून द्यावं. पंचायतचा हा निर्णय वराती आणि घरातील लोक मान्य करतात. घाईघाईत नवरदेवाच्या लहान भावाला तयार केलं जातं आणि त्याच मंडपात नवरीसोबत त्याचं लग्न लावून दिलं जातं. (हे पण वाचा : घरातून पळून गेलेल्या मुलीला समजली प्रियकराच्या पगाराची रक्कम, ऐनवेळी लग्नास दिला नकार)

काय आहे प्रकरण?

संजय यादवचा मुलगा अनिल कुमारचं लग्न मुरारचक गावातील भीम यादवच्या मुलीसोबत ठरलं होतं. सर्व कार्यक्रम ठरल्यानुसार पार पडत होते. १५ जूनला वरात पोहोचली तर त्यांचा चांगला मान-सन्मान करण्यात आला. दुसरीकडे अनिलच्या पहिल्या पत्नीला जसं समजलं की, त्याचं दुसरं लग्न होत आहे. ती पोलिसांकडे केली आणि हे लग्न रोखण्याची विनंती केली. तिने अनिलसोबत तिच्या लग्नाचा फोटोही पोलिसांना दाखवा. त्यानंतर पोलिसांनी महिलेची साथ दिली.

नवरदेवाचं आधीच झालं होतं लग्न

अशात गावाचे प्रमुख अशोक य़ादव यांना पोलिसांचा फोन आला. त्यांनी यादव यांना सांगितलं की, तुमच्या गावात जी वरात आली आहे तो मुलगा आधीच विवाहित आहे. त्याची पत्नी आमच्याकडे आली आहे. तुम्ही जाऊन लग्न थांबवा. आम्ही येतोय. अशोक यादव यांनी नवरीच्या वडिलांना हा सगळा प्रकार सांगितला. हे ऐकून त्यांनही धक्का बसला. गावातही ही खबर आगीसारखी पसरली. अशात अनिकची पहिली पत्नी पोलिसांना घेऊन तिथे पोहोचली. 

नवरदेवाच्या भावासोबत नवरीचं लग्न

महिलेने सांगितलं की, एक वर्षाआधीच आम्ही लग्न केलं आहे. पोलीस नवरदेवाला घेऊन पोलीस स्टेशनमद्ये गेले. त्यानंतर गावकऱ्यांनी वरातीत आलेल्या लोकांना बंदी बनवलं. अशात गावाच्या प्रमुखांनी यात मार्ग काढण्याचा विषय काढला. बरीच चर्चा झाल्यावर ठरलं की, नवरीचं लग्न नवरदेवाच्या लहान भावासोबत लावून दिलं जावं. दोन्हीकडील लोकांच्या उपस्थितीत सकाळी दोघांचं लग्न लावण्यात आलं. तेव्हा प्रकरण शांत झालं. तर अनिलकडून पोलिसांनी लिहून घेतलं की, तो त्याच्या पत्नीचा सांभाळ करेल. त्यानंतर पोलिसांनी त्यालाही सोडून दिलं.

टॅग्स :Biharबिहारmarriageलग्नCrime Newsगुन्हेगारी