शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस माने मला त्रास द्यायचा, गुरुशरणसिंह चौहानच्या पत्नीचे गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 11:41 IST

सुनील माने मला सतत फोन करून मानसिक त्रास देत होता, तर चिमाजी आढाव आणि अकबर पठाण माझ्या पतीला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत असल्याचा आरोप खंडणी प्रकरणातील तक्रारदार गुरुशरणसिंह चौहानच्या पत्नीने केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी आम्हाला सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली. वर्षभर आम्ही न्यायासाठी राजकारणी आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे उंबरे झिजवले. सुनील माने मला सतत फोन करून मानसिक त्रास देत होता, तर चिमाजी आढाव आणि अकबर पठाण माझ्या पतीला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत असल्याचा आरोप खंडणी प्रकरणातील तक्रारदार गुरुशरणसिंह चौहानच्या पत्नीने केला आहे.

चौहान यांच्या म्हणण्यानुसार, हे तिन्ही पोलीस अधिकारी माझ्या पतीला सतत त्रास देत होते. ‘तुम्ही मोठे व्यावसायिक आहात त्यामुळे तुम्ही आम्हाला पैसे द्यायचे, अन्यथा तुम्हाला खोट्या आरोपात अडकवेन,’ अशी धमकी डीसीपी पठाण तसेच माने व आढाव यांच्याकडून दिली जात होती. मला सुनील माने वेळी अवेळी फोन करून माझा मानसिक छळ करायचा, तर पठाण व आढाव हे माझ्या नवऱ्याला खोट्या प्रकरणात अडकवेन, पत्नीवर गुन्हा दाखल करेन, अशी धमकी द्यायचे. पत्नीला पैसे आणायला सांग, असेही रात्री त्यांच्याकडून सांगण्यात येत होते. घर विका, दागिने विका; पण आम्हाला पैसे आणून द्या, असे म्हणत आमचे खच्चीकरण केले. आम्हाला घरातून बाहेर पडण्याची मुलांना बाहेर पाठविण्याची भीती वाटायची. रक्षणासाठी असलेलेच भक्षण करण्याचा प्रयत्न करू लागले तर दाद मागायची कोणाकडे, असा प्रश्न समोर होता. 

...म्हणून घेतली सर्वोच्च न्यायालयात धाव

  • आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तात्कालिक गृहमंत्री अनिल देशमुख, पोलीस आयुक्त परमबीर सिंह, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे २०२० साली याबाबत तक्रार केली. 
  • कोणीच माझ्या मदतीला आले नाही. त्यामुळे आम्ही अखेर सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. सर्वोच्च न्यायालयाने अंधेरी कोर्टात जाण्याचा सल्ला देत न्याय न मिळाल्यास पुन्हा सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागण्याची मुभा दिली. त्यानंतर अंबोली पोलिसांनी आमची तक्रार दाखल केली, असे चौहान म्हणाल्या.
टॅग्स :Policeपोलिस