शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

पोलीस नाईक सखाराम भोये यांची हत्या की आत्महत्या?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2020 17:42 IST

Suicide or Murder : तपास सीआयडीकडे देण्याची अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेची मागणी

ठळक मुद्दे दरम्यान सदर प्रकरणाची पोलीस आयुक्त डॉ सदानंद दाते यांनी तातडीने चौकशीचे आदेश देत या प्रकरणी परिमंडळ 3 चे उपायुक्त प्रशांत वाघूडे यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू करून चौकशीत जे सत्य समोर आढळून आल्यावर नक्कीच कायदेशीर कारवाईला सामोर जावं लागेल. 

वसई -  तुळिंज पोलीस ठाण्यात कार्यरत मयत पोलीस नाईक सखाराम भोये यांनी केलेल्या आत्महत्या प्रकरणी आठ दिवस उलटून ही ठोस माहिती समोर न आल्याने व पोलीस वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्याने ही हत्या की आत्महत्या याचा उलगडा होण्यासाठी हा तपास सीआयडी कडे वर्ग करण्याच्या मागणीचे निवेदन आदिवासी विकास परिषदेचे राज्य युवा अध्यक्ष लकीभाऊ जाधव यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सहीत विधानसभा उपाध्यक्ष व  गृहमंत्री अनिल देशमुख तसेच इतर संबंधित मंत्र्यांना दिल्याची माहिती लकीभाऊ जाधव यांनी लोकमतला दिली आहे.

मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालय अंतर्गत परिमंडळ -3 मधील तुळिंज पोलीस ठाण्यातील मयत पोलीस नाईक सखाराम भोये यांनी 24 डिसेंबर 2020 रोजी तुलिंज पोलीस ठाण्यामध्ये पोलीस निरीक्षक यांच्या दालनातच सकाळच्या वेळी पिस्तुलाने स्वतः च्या डोक्यात गोळी मारून आत्महत्या केली होती.

या प्रकरणी तातडीने या घटनेची गंभीर नोंद घेत जिल्ह्यातील  आदिवासी संघटना आक्रमक होऊन त्यांनी या घटनेस तेथील पोलीस निरीक्षक जयप्रकाश सूर्यवंशी जबाबदार असून त्यांना तात्काळ बडतर्फ करून त्यांच्यावर सदोष मनुष्य वध, जातिवाचक आदी गंभीर गुन्हे दाखल करण्यासंबंधीचे निवेदन गृहमंत्री व वसई विरार पोलीस आयुक्त सदानंद दाते यांना भेटी वेळीं देण्यात आले होते.

दरम्यान सदर प्रकरणाची पोलीस आयुक्त डॉ सदानंद दाते यांनी तातडीने चौकशीचे आदेश देत या प्रकरणी परिमंडळ 3 चे उपायुक्त प्रशांत वाघूडे यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू करून चौकशीत जे सत्य समोर आढळून आल्यावर नक्कीच कायदेशीर कारवाईला सामोर जावं लागेल. 

तसेच भोये यांच्या कुटुंबाला शक्य होईल ती शासकीय मदत किंबहुना  न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दस्तुरखुद्द स्वतः वसई विरार पोलीस आयुक्तांनी त्यावेळेस आदिवासी विकास व विविध आदिवासी संघटनांच्या शिष्टमंडळाला दिलं होतं. तुळिंज पोलीस स्टेशन येथे मयत पोलीस नाईक सखाराम भोये यांनी पोलीस निरीक्षक जयप्रकाश सूर्यवंशी यांच्या जाचाला वैतागून आत्महत्या केली असल्याचा आदिवासी संघटना व भोये कुटुंबीयांचा आरोप व वजा संशय आहे.

त्यातून या प्रकरणी आठ दिवस उलटले तरी पोलीस निरीक्षकावर अद्यप कारवाई वजा या घटनेतील नेमकं सत्य समोर येत नाही त्यामुळेच पोलीस वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. किंबहुना याचा उलगडा सीआयडी तपासात अधिक पारदर्शक होण्याची शक्यता अधिक असल्याने आदिवासी संघटनानी मुख्यमंत्री ठाकरे सहीत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ तसेच गृहमंत्री अनिल देशमुख आदीकडे सीआयडी तपासाची मागणी केली आहे.

 

चौकशी सुरू असलेले पोलीस निरीक्षक जयप्रकाश सूर्यवंशी यांची बदली ?

मयत सखाराम भोये आत्महत्या या गंभीर प्रकरणाची परिमंडळ 3 चे उपायुक्त प्रशांत वाघूडे यांच्यामार्फत चौकशी सुरू आहे, दरम्यान दि 30 डिसेंबर ला अचानकपणे पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांना  मि भा व वि आयुक्तांलयाच्या नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे आणि तसे आदेश पोलीस आयुक्तांलय यांनी काढले आहेत.

टॅग्स :Suicideआत्महत्याMurderखूनVasai Virarवसई विरारPoliceपोलिसMira Bhayanderमीरा-भाईंदर