शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

पोलीस नाईक सखाराम भोये यांची हत्या की आत्महत्या?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2020 17:42 IST

Suicide or Murder : तपास सीआयडीकडे देण्याची अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेची मागणी

ठळक मुद्दे दरम्यान सदर प्रकरणाची पोलीस आयुक्त डॉ सदानंद दाते यांनी तातडीने चौकशीचे आदेश देत या प्रकरणी परिमंडळ 3 चे उपायुक्त प्रशांत वाघूडे यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू करून चौकशीत जे सत्य समोर आढळून आल्यावर नक्कीच कायदेशीर कारवाईला सामोर जावं लागेल. 

वसई -  तुळिंज पोलीस ठाण्यात कार्यरत मयत पोलीस नाईक सखाराम भोये यांनी केलेल्या आत्महत्या प्रकरणी आठ दिवस उलटून ही ठोस माहिती समोर न आल्याने व पोलीस वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्याने ही हत्या की आत्महत्या याचा उलगडा होण्यासाठी हा तपास सीआयडी कडे वर्ग करण्याच्या मागणीचे निवेदन आदिवासी विकास परिषदेचे राज्य युवा अध्यक्ष लकीभाऊ जाधव यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सहीत विधानसभा उपाध्यक्ष व  गृहमंत्री अनिल देशमुख तसेच इतर संबंधित मंत्र्यांना दिल्याची माहिती लकीभाऊ जाधव यांनी लोकमतला दिली आहे.

मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालय अंतर्गत परिमंडळ -3 मधील तुळिंज पोलीस ठाण्यातील मयत पोलीस नाईक सखाराम भोये यांनी 24 डिसेंबर 2020 रोजी तुलिंज पोलीस ठाण्यामध्ये पोलीस निरीक्षक यांच्या दालनातच सकाळच्या वेळी पिस्तुलाने स्वतः च्या डोक्यात गोळी मारून आत्महत्या केली होती.

या प्रकरणी तातडीने या घटनेची गंभीर नोंद घेत जिल्ह्यातील  आदिवासी संघटना आक्रमक होऊन त्यांनी या घटनेस तेथील पोलीस निरीक्षक जयप्रकाश सूर्यवंशी जबाबदार असून त्यांना तात्काळ बडतर्फ करून त्यांच्यावर सदोष मनुष्य वध, जातिवाचक आदी गंभीर गुन्हे दाखल करण्यासंबंधीचे निवेदन गृहमंत्री व वसई विरार पोलीस आयुक्त सदानंद दाते यांना भेटी वेळीं देण्यात आले होते.

दरम्यान सदर प्रकरणाची पोलीस आयुक्त डॉ सदानंद दाते यांनी तातडीने चौकशीचे आदेश देत या प्रकरणी परिमंडळ 3 चे उपायुक्त प्रशांत वाघूडे यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू करून चौकशीत जे सत्य समोर आढळून आल्यावर नक्कीच कायदेशीर कारवाईला सामोर जावं लागेल. 

तसेच भोये यांच्या कुटुंबाला शक्य होईल ती शासकीय मदत किंबहुना  न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दस्तुरखुद्द स्वतः वसई विरार पोलीस आयुक्तांनी त्यावेळेस आदिवासी विकास व विविध आदिवासी संघटनांच्या शिष्टमंडळाला दिलं होतं. तुळिंज पोलीस स्टेशन येथे मयत पोलीस नाईक सखाराम भोये यांनी पोलीस निरीक्षक जयप्रकाश सूर्यवंशी यांच्या जाचाला वैतागून आत्महत्या केली असल्याचा आदिवासी संघटना व भोये कुटुंबीयांचा आरोप व वजा संशय आहे.

त्यातून या प्रकरणी आठ दिवस उलटले तरी पोलीस निरीक्षकावर अद्यप कारवाई वजा या घटनेतील नेमकं सत्य समोर येत नाही त्यामुळेच पोलीस वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. किंबहुना याचा उलगडा सीआयडी तपासात अधिक पारदर्शक होण्याची शक्यता अधिक असल्याने आदिवासी संघटनानी मुख्यमंत्री ठाकरे सहीत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ तसेच गृहमंत्री अनिल देशमुख आदीकडे सीआयडी तपासाची मागणी केली आहे.

 

चौकशी सुरू असलेले पोलीस निरीक्षक जयप्रकाश सूर्यवंशी यांची बदली ?

मयत सखाराम भोये आत्महत्या या गंभीर प्रकरणाची परिमंडळ 3 चे उपायुक्त प्रशांत वाघूडे यांच्यामार्फत चौकशी सुरू आहे, दरम्यान दि 30 डिसेंबर ला अचानकपणे पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांना  मि भा व वि आयुक्तांलयाच्या नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे आणि तसे आदेश पोलीस आयुक्तांलय यांनी काढले आहेत.

टॅग्स :Suicideआत्महत्याMurderखूनVasai Virarवसई विरारPoliceपोलिसMira Bhayanderमीरा-भाईंदर