शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

फौजदारी गुन्हे दाखल असलेले पोलीस विधानसभेपर्यंत ‘साईडला’

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 22:00 IST

निवडणूक आयोगाच्या निर्देश; डीजींचे तात्काळ अंमलबजावणीचे आदेश

ठळक मुद्देलोकसभा निवडणूकीसाठी मार्चच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागू होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार २८ फेब्रुवारीपर्यंत सर्व अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जाणार आहेत.पोलीस आयुक्त आणि विशेष महानिरीक्षकांनी या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करुन त्याबाबतचा अहवाल पोलीस मुख्यालयाला पाठवावयाचा आहे.

जमीर काझीमुंबई - केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकषाचा चांगलाच धसका महाराष्ट्र पोलीस दलाने घेतला असून त्यांनी दिलेल्या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे फर्मान पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी सर्व घटकप्रमुखांना दिले आहेत. त्यानुसार फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेले पोलीस अधिकारी, अंमलदारांची कार्यकारी पदावरुन थेट अकार्यकारी पदावर (साईड ब्रॅँच) उचलबांगडी केली जाणार आहे. केवळ लोकसभा निवडणूक नव्हे तर त्यानंतर सहा महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणूकीपर्यत त्यांना महत्वाच्या ठिकाणी नियुक्ती दिली जाणार नाही.पोलीस आयुक्त आणि विशेष महानिरीक्षकांनी या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करुन त्याबाबतचा अहवाल पोलीस मुख्यालयाला पाठवावयाचा आहे.लोकसभा निवडणूकीसाठी मार्चच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागू होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार २८ फेब्रुवारीपर्यंत सर्व अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जाणार आहेत. त्यामध्ये फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या अधिकाऱ्यांना तातडीने कार्यकारी पदावरुन म्हणजेच पोलीस ठाण्यात नेमणूक असल्यास किंवा निवडणूकीशी संबंध येईल, अशा ठिकाणी कार्यरत असल्यास त्यांची अन्यत्र उचलबांगडी केली जाईल. लोकसभेनंतर विधानसभा निवडणूका संपेपर्यंत म्हणजे साधारण नोव्हेंबरअखेरपर्यंत त्यांना कार्यकारी पदावर नेमले जाणार नाही, याची खातरजमा घटकप्रमुखांकडून करावयाची असून संबंधित आयुक्त व विशेष महानिरीक्षकांवर त्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.त्याशिवाय आयुक्तालय आणि परिश्रेत्राचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या किंवा ३१ मेपर्यंत पूर्ण होणार आहेत, अशा उपनिरीक्षक ते निरीक्षकांच्या बदल्या पोलीस अस्थापना वर्ग क्र.२ म्हणजे महासंचालकांकडून केल्या जातील, त्या व्यतिरिक्त अन्य सर्व बदल्याचे अधिकार हे संबंधित आयुक्त आणि विशेष महानिरीक्षकांना देण्यात आलेले आहेत. उपनिरीक्षक ते निरीक्षक पर्यतचा मुंबई पोलीस दल वगळता अन्य आयुक्तालय व परिश्रेत्रासाठी आठ तर मुंबईसाठी नऊ वर्षाचा कार्यकाळ आहे.

* यांच्या होणार बदल्या...* एका जिल्ह्यात चार वर्षामध्ये तीन वर्षे सेवा झालेले, स्वत:च्या जिल्ह्यात कार्यरत तसेच २०१४ च्या निवडणूकीत ज्याठिकाणी कार्यरत असलेले असलेले उपनिरीक्षक ते निरीक्षक दर्जाचे अधिकाऱ्यांच्या बदल्या विशेष महानिरीक्षकांनी परिक्षेत्रातील अन्य घटकामध्ये करावयाच्या आहेत. कार्यकारी पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जातील .त्यासाठी उपरोक्त तीनही निकषाचा भंग होणार नसल्याची दक्षता घ्यावयाची आहे.* मुंबई पोलीस आयुक्तालय वगळता अन्य आयुक्तालयातील आयुक्तांनी उपरोक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करावयाच्या आहेत. अधिकाऱ्यांच्या परिश्रेत्र व आयुक्तालयाच्या ८ वर्षाचा सेवा कालावधी पूर्ण झाला असल्यास किंवा ३१ मे २०१९ पर्यत पुर्ण होणार असल्यास त्या अधिकाऱ्यांची माहिती पोलीस महासंचालकांना द्यावयाची आहे. त्या अधिकाऱ्यांची बदली अस्थापना वर्ग क्रं.२ कडून केली जाईल.* जे पोलीस अधिकारी स्वत:च्या जिल्ह्यात कार्यरत आहेत, परंतू ३० नोव्हेंबर २०१९ पर्यंत निवृत्त होणार आहेत, त्यांच्या त्याच घटकात अकार्यकारी पदावर नेमणूक करावयाची आहे. त्यांना निवडणूकीसंबंधी कोणतीही ड्युटी द्यावयाची नाही.* मुंबई आयुक्तालयातर्गंत शहर व उपनगर असे दोन जिल्हे आणि सहा लोकसभा मतदार संघ आहेत. याठिकाणी कार्यरत असलेल्या अधिकाºयांनाही बदलीबाबतचे उपरोक्त नियम कायम असून त्यांची गेल्या निवडणूकीतील बदलीचा जिल्हा व लोकसभा मतदारसंघ यावेळी कायम राहणार नाही याची बदली करताना आयुक्तांनी दक्षता घ्यावयाची आहे. त्याचप्रमाणे परिविक्षाधीन उपनिरीक्षक असल्यास स्वत:चे जिल्हा व पोलीस शिपाई म्हणून यापूर्वी च्या घटकात कार्यरत असतील त्यांना इतर जिल्हे , लोकसभा मतदार संघ वगळून बदल्या कराव्यात. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसElectionनिवडणूकMaharashtraमहाराष्ट्र