शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

विजय वल्लभ हॉस्पिटल दुर्घटनेप्रकरणी व्यवस्थापकासह दोघांना पोलिसांनी केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2021 20:13 IST

Vijay Vallabh Hospital Fire : या प्रकरणी चौकशी सुरू असून दुर्घटनेसाठी जबाबदार असलेल्या अन्य जणांना देखील अटक केली जाईल, अशी माहिती या प्रकरणाचा तपास अधिकारी प्रमोद बडाख यांनी दिली. या दुर्घटनेत १५ करोनाबाधित रूग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देरुग्णालयाचे व्यवस्थापक दिलीप शहा आणि शैलेश पाठक यांना गुन्हे शाखा ३ कडून अटक करण्यात आली आहे.

संपूर्ण देश हादरून गेलेल्या घटनेत विरारमधील विजय वल्लभ या खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात भीषण आग लागून घडलेल्या दुर्दैवी दुर्घटना घडली. या विजयवल्लभ रुग्णालयाला लागलेल्या आगीप्रकरणी आज दोघांना अटक करण्यात आली आहे. रुग्णालयाचे व्यवस्थापक दिलीप शहा आणि शैलेश पाठक यांना गुन्हे शाखा ३ कडून अटक करण्यात आली आहे. या दोघांना वसईच्या सत्र न्यायालयात हजर केले असता, एक दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणी चौकशी सुरू असून दुर्घटनेसाठी जबाबदार असलेल्या अन्य जणांना देखील अटक केली जाईल, अशी माहिती या प्रकरणाचा तपास अधिकारी प्रमोद बडाख यांनी दिली. या दुर्घटनेत १५ करोनाबाधित रूग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

 

विरार विजय वल्लभ हॉस्पिटल दुर्घटनेस अग्निशमनदलाचे प्रमुख जबाबदार, भाजपाचा आरोप

 

शुक्रवारी संध्याकाळी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात रुग्णालयाचे व्यवस्थापक आणि डॉक्टरांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी प्राथमिक चौकशीत या दुर्घटनेसाठी रुग्णालय प्रशासन जबाबदार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर हे गुन्हे दाखल करण्यात आले होते.विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयात घडलेल्या दुर्दैवी घटनेत 15 निष्पाप रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आणि यात मृतांचे कुटुंबीय, नातलग यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. ही घटना इतकी भीषण होती की,यामुळे वसई-विरार शहरच नाही तर अवघ्या राज्य व केंद्रीय प्रशासन ही या घटनेमुळे गहिवरले. सर्वत्र देशभर याचे पडसाद उमटले व शोककळा पसरली. या घटनेनंतर मृतांच्या वारसांना शासनाकडून तात्काळ मदत जाहीर करण्यात आली. परिणामी या घटनेनंतर विजय वल्लभ  रुग्णालय प्रशासन, व्यवस्थापन, डॉक्टर, कर्मचारी आदी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा ही दाखल करण्यात आला.

मात्र एवढे करून चालणार नाही तर या 15 रुग्णांच्या घटनेस जे कोणी प्रमुख जबाबदार आहेत त्यांच्यावरही कारवाई होणे आवश्यक असल्याचे मत अशोक शेळके यांनी लोकमत शी बोलताना व्यक्त केले आहे. याप्रकरणी राज्य शासनाने अग्निशमन विभागाची सखोल चौकशी करून आजपर्यत (फायर ऑडिट) का करण्यात आले नाही? यास जबाबदार असणाऱ्या अग्निशमन दल प्रमुख दिलीप पालव यांचे तात्काळ निलंबन करून त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करावेत अशी मागणी अशोक शेळके यांनी केली आहे.

 

 

टॅग्स :fireआगVirarविरारVasai Virarवसई विरारPoliceपोलिसArrestअटकhospitalहॉस्पिटल