शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

भयंकर! रोज मिळायचे तुकडे, पोलिसांनी घरोघरी जाऊन 500 फ्रिज उघडून पाहिले; असा झाला पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2022 11:57 IST

पांडव नगरमधल रामलीला मैदान परिसरात पोलिसांना मानवी शरीराचे तुकडे मिळाले. दररोज तुकडे सापडत होते

दिल्लीमध्ये श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. पांडव नगरमधल रामलीला मैदान परिसरात पोलिसांना मानवी शरीराचे तुकडे मिळाले. दररोज तुकडे सापडत होते. मात्र ते कोणाच्या मृतदेहाचे आहेत त्याची माहिती मिळत नव्हती. गुन्हे शाखेने प्रकरणाचा तपास हाती घेतला. जवळपास पाच महिन्यांच्या मेहनतीनंतर अखेर गुन्ह्याचा उलगडा झाला आहे.

रामलीला मैदानाच्या आसपास मृतदेहाचे तुकडे सापडत होते. पोलिसांनी परिसरातील घरांमध्ये असलेले फ्रिज तपासले. आसपासच्या भागातून दुर्गंधी येतेय का याबद्दलही स्थानिकांना विचारणा केली. अखेर पाच महिन्यांनी पोलिसांना आरोपी सापडले. मैदानाजवळ सापडत असलेले तुकडे अंजन दासच्या मृतदेहाचे असल्याचं पोलीस तपासातून उघडकीस आलं. तो बिहारचा रहिवासी होता. दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्रांचने खुलासा केला आहे. अंजन दासची पत्नी पूनम आणि तिचा मुलगा दीपकनं अंजन दासची निर्घृण हत्या केली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंजन त्याचा सावत्र मुलगा दीपकच्या मुलीकडे, दीपकच्या बहिणीकडे वाकड्या नजरेनं पाहायचा. त्यामुळे दीपक आणि पूनमने अंजनच्या हत्येचा कट रचला. त्यांनी अंजनला नशेच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर त्याचा गळा चिरला. त्याचे मृतदेहाचे दहा तुकडे करुन फ्रिजमध्ये टाकले. पूनम आणि दीपक रोज रात्री घराबाहेर पडायचे आणि मृतदेहाचे तुकडे मैदानाच्या आसपास टाकायचे.

रामलीला परिसरात दररोज मानवी मृतदेहाचे तुकडे सापडत होते. मात्र मृताची ओळख पटत नव्हती. त्यामुळे पोलिसांसमोर अवघड आव्हान होतं. पोलिसांना सर्वात आधी ब्लॉक 20 मधील रहिवाशांवर संशय आला. पोलिसांनी घरोघरी जाऊन फ्रिज तपासले. तुमच्याकडे फ्रिज आहे का, उघडून दाखवा, अशी विचारणा पोलिसांनी घरी येऊन केल्याचं ब्लॉक 20 मध्ये राहणाऱ्या सिकंदर सिंहनं सांगितलं.

पोलिसांनी जवळपास 500 फ्रिज उघडून पाहिले. घरात अतिरिक्त फ्रिज आहे का याबद्दल विचारणा केली. आसपासच्या परिसरातून तुम्हाला दुर्गंधी येते का, असा प्रश्न पोलिसांनी सिकंदरला विचारला. त्याने नाही असं उत्तर दिलं. ब्लॉक 20 मध्ये 500 घरं आहेत आणि या परिसरात असे अनेक ब्लॉक आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी किती मेहनत घेतली याची कल्पना करता येऊ शकेल, असं सिकंदर म्हणाला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस