शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

पाकच्या आदिल शेखनं हरशिमरनला केलं ब्लॅकमेल; ३६३ कोटींचे हेरॉइन प्रकरणी खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2023 05:55 IST

हरशिमरनला मुंबईत कोणीच ओळखत नसल्याने त्याने मुंद्रा बंदरातील कस्टम क्लिअरिंग एजंट महेंद्र राठोड याच्याशी संपर्क साधला.

आशिष सिंगमुंबई - गेल्या वर्षी जेएनपीटी बंदरात आलेल्या ३६३ कोटी रुपये किमतीचा हेरॉइनचा साठा ताब्यात घेण्यास आयातदार हरशिमरन सेठी याने नकार दिल्यानंतर पाकिस्तानच्या आयएसआय संघटनेचा ड्रग सप्लायर आदिल शेख आणि जर्मनीतील मोनू सिंह ऊर्फ मनी हे तो साठा दिल्लीपर्यंत पोहोचवण्यासाठी हरशिमरनला ब्लॅकमेल करीत होते, असे तपासात उघडकीस आले आहे. 

हरशिमरनने चौकशीत सांगितल्यानुसार व्हिएतनाम, ग्रीस, चीन आणि पाकिस्तान येथून तो विविध प्रकारच्या मालाची आयात करतो. याचदरम्यान त्याची अटारी सीमेवर आदिल शेखशी ओळख झाली. आदिल हरशिमरनला पाकिस्तानातून ड्रायफ्रूटचा पुरवठा करायचा. दोघांमध्ये उधारीवर व्यवसाय चालायचा. मात्र कालांतराने हरशिमरनचे व्यवसायात नुकसान झाल्याने तो आदिलचे १ कोटी ३० लाख रुपये देणे लागत होता. रकमेच्या वसुलीसाठी हरशिमरन आणि त्याच्या कुटुंबीयांना आयएसआयमार्फत धमकीचे फोन येऊ लागले. आदिलच्या हस्तकांकरवी खात्मा केला जाईल, असे त्याला धमकावले जात होते. घाबरलेला हरशिमरन २०२० साली गुजरातमधील गांधीग्राम येथे राहावयास गेला. जयपूरमध्ये व्यवसायात जमू लागलेला असतानाच हरशिमरनला आदिल शेखचा फोन आला. उधारीचे १ कोटी ३० लाख रुपये माफ केल्याचे सांगत अफगाणिस्तानातून आलेला संगमरवरी फरशांचा साठा ताब्यात घेऊन दिल्लीला पोहोचवण्याची गळ आदिलने हरशिमरनला घातली. ती मान्य करून हरशिमरन दिल्लीतील घरी परतला. 

काही महिन्यानंतर लुधियानातून चारजण हरशिमरनला भेटायला आले. याच चौघांवर ड्रग तस्कर मोनू सिंहने हेरॉइनचा साठा दिल्लीहून पंजाबमध्ये पोहोचवण्याची जबाबदारी सोपवली होती. या चौघांनी  हरशिमरनला २१ लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले. त्यातील २० लाख रुपये अफगाणिस्तानातील हा कंटेनर चालान बनवून जेएनपीटी बंदरातून ताब्यात घेण्याचे तसेच एक लाख रुपये मुंबई ते दिल्लीपर्यंतच्या वाहतुकीसाठी होते. कंटेनर दिल्लीत पोहोचल्यावर तो पंजाबला नेण्याची त्यांची योजना होती. चौघांना नंतर पंजाब पोलिसांनी अटक केली. 

हरशिमरनला मुंबईत कोणीच ओळखत नसल्याने त्याने मुंद्रा बंदरातील कस्टम क्लिअरिंग एजंट महेंद्र राठोड याच्याशी संपर्क साधला.  राठोडने दुसरा एजंट सागर कांबळे याला गाठले. तपशिलात गेल्यावर हरशिमरनच्या लक्षात आले की बंदरात आलेला कंटेनर अफगाणिस्तानातून नसून पाकिस्तानातून पाठवण्यात आला आहे. त्यावरील २८० टक्के ड्युटी भरल्यावरच तो आपल्या ताब्यात दिला जाईल. त्यामुळे हरशिमरनने तो ताब्यात घेण्यास नकार दिला. या प्रकाराने संतापलेल्या आदिल शेख आणि मोनू सिंह यांनी त्याला धमकावण्यास सुरुवात केली. हा कंटेनर ताब्यात घेऊन दिल्लीपर्यंत पोहोचवला नाही तर त्या कंटेनरमध्ये हेरॉइन असून, तो हरशिमरन हाच त्याचा आयातदार आहे आणि तो दिल्ली तसेच पंजाबमध्ये पाठवण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती तपास यंत्रणांना देऊ, असा दम ते देत राहिले. यादरम्याम सात महिने कंटेनर बंदरातच पडून राहिला. काही दिवसांनी त्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली आणि छापासत्र घडले.