शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

केवळ ३५ हजारांना मुंबईतील महिलेला सौदीत विकले; सीबीआयकडे तपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2018 15:37 IST

काही महिन्यातच महिलेला शारीरिक आणि मानसिक छळाला सामोरं जावं लागलं. त्यावेळी तिला ३५ हजार रुपयांना विकत घेतले असल्याचे त्या कुटुंबाने सांगितले. त्यांनतर याप्रकरणी केंद्रीय गुप्तचर विभागाने (सीबीआय) मानवी तस्करी केल्यासंबंधी आरोपी एजंटचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. 

ठळक मुद्देकेरळ येथील एजंटने तिला सौदी अरेबिया येथे एका कुटुंबीयांकडे त्यांचे घरकाम करण्यासाठी पाठविले होयाप्रकरणी केंद्रीय गुप्तचर विभागाने (सीबीआय) मानवी तस्करी केल्यासंबंधी आरोपी एजंटचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. परदेशात जास्त पगाराची नोकरी मिळावी म्हणून मुंबईतील एक महिला नोकरी शोधात होती

मुंबई - मुंबईत राहणाऱ्या एका महिलेला घरकाम करण्यासाठी २५ हजार रुपयांच्या रोजंदारीवर सौदी अरेबिया या आखाती देशात पाठविण्यात आले होते. केरळ येथील एजंटने तिला सौदी अरेबिया येथे एका कुटुंबीयांकडे त्यांचे घरकाम करण्यासाठी पाठविले होते. मात्र, काही महिन्यातच महिलेला शारीरिक आणि मानसिक छळाला सामोरं जावं लागलं. त्यावेळी तिला ३५ हजार रुपयांना विकत घेतले असल्याचे त्या कुटुंबाने सांगितले. त्यांनतर याप्रकरणी केंद्रीय गुप्तचर विभागाने (सीबीआय) मानवी तस्करी केल्यासंबंधी आरोपी एजंटचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. 

परदेशात जास्त पगाराची नोकरी मिळावी म्हणून मुंबईतील एक महिला नोकरी शोधात होती. तिच्या संपर्कात केरळातील एक परदेशात पाठवणार एजंट आला. सजोय असं या एजंटचा नाव असून त्याने तिला २५ हजार दरमहा अशी नोकरी लावतो सांगितले. पुढील प्रक्रियेसाठी तिच्याकडे एजंट १५ हजार रुपये मागितले. त्यानंतर त्या महिलेने १५ हजार रुपये सजोयला दिले. तसेच तिने पासपोर्ट देखील सुपूर्द करत व्हिसाची प्रक्रिया सुरु करण्यात आली. १ एप्रिल २०१६ दरम्यान ही घटना घडली. त्यानंतर महिलेने परदेशातील नोकरीबाबत विचारणा केली असता ६ एप्रिल २०१६ रोजी सजोयचा मित्र मुजीबने त्या महिलेला सौदीमध्ये घरकामासाठी पाठविले. मात्र, सौदीतील त्या कुटुंबाकडून संबंधित महिलेला ठरलेला २५ हजार पगार मिळत नव्हताच तसेच तिच्याकडून त्या कुटुंबातील घरकामाबरोबरच इतर कामं देखील करून घेतली जात होती. याबाबत एजंट सजोयला तिने कळविले. त्यावर त्याने दुसऱ्या नोकरीबाबत कळालं की सांगतो असं सांगून टोलवाटोलवी करत होता. मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून पीडित महिलेने सौदीतील कुटुंबियांना ठरलेला पगार देत नसल्याबाबत जाब विचारला. त्यानंतर त्या कुटुंबाने आम्ही तुला ३५ हजार रुपयांना विकत घेतल्याचे सांगितले. त्यानंतर नातेवाईकांच्या मदतीने पीडित महिलेने नोव्हेंबर २०१६ ला मुंबई गाठली. याप्रकरणी केरळ पोलिसांकडून तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला असून सीबीआयने मानव तस्करीचा गुन्हा दाखल करून तपास करत आहेत. सजोय, मुजीबसह अन्य साथीदारांचा सीबीआय शोध घेत असून या टोळींना अनेक भारतीयांना परदेशात नोकरीला लावतो सांगून फसवल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

टॅग्स :Human Traffickingमानवी तस्करीCBIगुन्हा अन्वेषण विभागKeralaकेरळsaudi arabiaसौदी अरेबिया