शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

एका एन्काऊंटरमुळे काहीही थांबणार नाही, पण....

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2019 15:42 IST

अतिरिक्त पोलीस महासंचालक पी के जैन यांनी हैद्राबाद एन्काऊंटरवरुन सुरु असलेल्या मतमतांतरांनंतर  लोकमतशी बोलताना मांडले मत...

- मनीषा म्हात्रे  

 मुंबई -  एका एन्काऊंटरमुळे काहीही थांबणार नाही. याचा फरक मात्र हैद्राबादमध्ये नक्की पडेल. भविष्यात अशा स्वरुपाचा गुन्हा केल्यास आपलाही एन्काऊंटर होवू शकतो ही भीती अशा विचारसणीच्या गुन्हेगारांमध्ये राहणार हे नक्की. त्यामुळे असे एन्काऊंटर होणे गरजेचे असल्याचे मत   माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक पी के जैन यांनी हैद्राबाद एन्काऊंटरवरुन सुरु असलेल्या मतमतांतरांनंतर  लोकमतशी बोलताना मांडले.

तरुणीवर बलात्कार करून करण्यात आलेल्या हत्येनंतर देशभरात संतापाचे वातावरण होते. याच दबावातून हे एन्काऊंटर घडवले गेले काय?हैद्राबाद बलात्कारप्रकरणात चार आरोपींना पोलिसांनी अटक केली होती.घटनास्थळावरील पंचनाम्यादरम्यान आरोपींनी शिक्षेच्या भितीने पोलिसांवर हल्ला चढवून पळण्याचा प्रयत्न केला. त्यातूनच झालेल्या झटापटीत पोलिसांनी एन्काऊंटर केले, हे मान्य करण्यास काहीच हरकत नाही. मुळात हैद्राबादमध्ये नुकत्याच झालेल्या कायद्यानुसार, पोलिसांकडून होणाजया कुठल्याही एन्काऊंटरनंतर पोलिसांविरुद्ध आधी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात यावा, त्यानंतर संबंधित घटनेची चौकशी करावी अशी तरतूद आहे. त्यामुळे कोणीही स्वत:हून अशा कारवाईची नामुष्की ओढवून घेणार नाही. पुढे काय खरे? काय खोटे? हे तपासाअंती समोर येईलच. तरीही पोलिसांवर संशय व्यक्त करण्यात येत आहे. ते चुकीचे आहे. त्यात राहिला दबावाचा प्रश्न तर, पोलिसांनी आधीच आरोपींना पकडले होते. एन्काऊंटरमुळे अशा गंभीर गुन्हे करणार्‍यांवर वचक बसेल का?एका एन्काऊंटरमुळे काहीही थांबणार नाही. याचा फरक मात्र हैद्राबादमध्ये नक्की पडेल. भविष्यात अशा स्वरुपाचा गुन्हा केल्यास आपलाही एन्काऊंटर होवू शकतो ही भीती अशा विचारसणीच्या गुन्हेगारांमध्ये राहणार हे नक्की. त्यामुळे असे एन्काऊंटर होणे गरजेचे आहे.   न्याय मिळण्यात होणार्‍या उशिरामुळे नागरिकांमध्ये संताप आहे. त्यावर न्याय प्रणालीमध्ये कोणत्या सुधारणा होण्याची आवश्यकता आहे?आजही तारीख पे तारीख सुरुच आहे. निर्भयाप्रकरणाला 7 वर्षे उलटली तरी त्या मुलीला अद्याप न्याय मिळाला नाही. आजही राष्ट्रपतींकडे असे अनेक दया अर्ज प्रलंबित आहेत. याची आवश्यकताच काय आहे. त्यामुळे ही पद्धतच बंद होणे गरजेचे आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल अंतीम धरुन दोषींवर कारवाई व्हावी. कुठेतरी सर्वांवर वेळेचे निर्बंध हवे. वर्षभरातच प्रकरण निकाली लावत आरोपींना शिक्षा होणे गरजेचे आहे. जेणेकरुन आरोपींमध्ये कायद्याचा धाक कायम राहण्यास मदत होईल. बलात्कारासारख्या घटनांना थांबविण्यासाठी समाजाची भूमिका काय वाटते?घरातूनच पुरुषप्रधान मानसिकता बंद व्हायला हवी. मुलगा, मुलगी यात भेदभाव नको. लहानपणापासून मुलांवर तसे संस्कार होणे गरजेचे आहे. आज पोलीस खात्यातही नवरा बायकोच भांडण झाल्यास पत्नी पोलीस ठाण्यात तक्रार घेवून येते तेव्हा, आमच्यापैकी काही हवालदार त्या महिलेलाच पतीने दोन चापट्या मारल्या तर काय झाले असे विचारतो. त्यामुळे ही मानसिकता बदलणे गरजेचे आहे. समाजाने महिला सक्षमीकरणाचा विचार करायला हवा. बेटी बचाव बेटी पढाओ या योजनांची ठोस अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. जोपर्यंत ते होणार नाही. तोपर्यंत काहीही होणार नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीhyderabad caseहैदराबाद प्रकरणPoliceपोलिस