शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

चोरलेला ऐवज मिळावा यासाठी वृद्धेची वणवण; पोलिसांसह नेत्यांचे झिजवले उंबरठे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 00:45 IST

मूळ सातपाटी गावच्या मात्र धनसार येथे स्थायिक झालेल्या शालिनी मोरे या शिक्षिका सातपाटी सरकारी मत्स्योद्योग माध्यमिक शाळेतून सेवानिवृत्त झाल्या.

पालघर : आपल्या सेवानिवृत्तीनंतर वार्धक्याच्या काळात उपयोगी पडावी म्हणून साठवून ठेवलेली रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण ३ लाख ७० हजारांचा ऐवज घरातून लुटून नेल्यानंतर संकटात सापडलेल्या धनसार येथील ७८ वर्षीय शालिनी मोरे या सेवानिवृत्त शिक्षिका आपला ऐवज मिळावा म्हणून पोलीस ठाण्यासह लोकप्रतिनिधींचे उंबरठे झिजवीत आहेत.

मूळ सातपाटी गावच्या मात्र धनसार येथे स्थायिक झालेल्या शालिनी मोरे या शिक्षिका सातपाटी सरकारी मत्स्योद्योग माध्यमिक शाळेतून सेवानिवृत्त झाल्या. २५ जानेवारी रोजी त्या आपल्या घरातील कामकाज आटोपून सकाळी १० वाजता जवळच असलेल्या शेतात कामानिमित्त निघून गेल्या. शेतावरचे काम आटोपून अर्ध्या-पाऊण तासाने घरी येत दरवाजा उघडला असता दरवाजा आतून लॉक केल्याचे दिसून आले. घराच्या मागच्या बाजूने खिडकी तोडलेली आणि दरवाजा उघडून घरातील कपाट फोडून चोरी झाल्याचे निदर्शनास आले. या चोरीत सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याची माळ, अंगठी, रोख रक्कम असा एकूण ३ लाख ७० हजारांचा ऐवज चोरीला गेल्याची नोंद पालघर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. 

मी नेहमी शेतावर कामासाठी जात असल्याची पाहणी (रेकी) करून चोरट्याने आपल्या दागिन्यांवर हात मारल्याचा संशय निवृत्त शिक्षिकेने व्यक्त केला आहे. या घटनेला एक महिन्याचा कालावधी लोटून गेला तरी अजूनही पोलिसांच्या तपासात कुठलीही प्रगती दिसून येत नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

जगण्याचा आधार वार्धक्याच्या काळात जगण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेला ऐवजच चोरीला गेल्याने माझ्या जगण्याचा आधार निघून गेला आहे. त्यामुळे पोलिसांनी चोरट्याचा शोध घेऊन माझा ऐवज मला परत मिळवून द्यावा, अशी मागणीवजा  विनंती त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांच्याकडे केली आहे. 

टॅग्स :Policeपोलिस