शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

वृद्धाला गमवावी लागली कोटयवधीची जमापूंजी; सायबर पोलिसांकड़ून गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2021 22:30 IST

Cyber Case : याप्रकरणी पूर्व प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ठळक मुद्देट्रॉम्बे परिसरात राहणारे ६० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला मे महिन्यात अंजली वर्मा नावाच्या महिलेने कॉल करून सरकारी अधिकारी असल्याचे भासवले.

मुंबई : निवृत्तीनंतरच्या विमा योजनेच्या नावाखाली ट्रॉम्बेतील ६० वर्षीय वृद्धाला सव्वा कोटी रुपये गमवावे लागले आहे. याप्रकरणी पूर्व प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ट्रॉम्बे परिसरात राहणारे ६० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला मे महिन्यात अंजली वर्मा नावाच्या महिलेने कॉल करून सरकारी अधिकारी असल्याचे भासवले. पुढे निवृत्ती नंतरच्या पॉलिसीबाबत माहिती देत बोलण्यात गुंतविले. तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्यांनी संबंधित पॉलिसीबाबत होकार दिला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावज जाळयात अडकताच वर्माने तक्रारदार यांना प्रोसेसिंग फी, नोंदणी फी सह विविध चार्जेसच्या नावाखाली काही रक्कम भरण्यास सांगितली. याच ३ महिन्यात वर्मा यांच्याकड़ून १ कोटी १४ लाख रुपये उकळले. पुढे आणखीन पैशांची मागणी होताच त्यांना संशय आला. त्यांनी व्यवहार थांबवला. 

सोमवारी पूर्व प्रादेशिक सायबर विभागाकडे धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी नुकताच गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरु केला आहे. सध्या आरोपीच्या मोबाईल क्रमांक आणि बँक तपशिलाच्या आधारे आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न गुन्हे शाखा करत आहेत. तसेच संबंधित खात्यातील रक्कम गोठविण्याबाबतही बँकेला सांगण्यात आले आहे.

 

टॅग्स :fraudधोकेबाजीMumbaiमुंबईcyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिस