शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

Nirbhaya Case :...म्हणून निर्भयाच्या गुन्हेगारांची फाशी लांबणीवर जाण्याची शक्यता?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2020 15:02 IST

NIrbhaya Case : मंगळवारी संध्याकाळी तुरुंग प्रशासनाने त्यांची दया याचिका दिल्ली सरकारच्या गृह विभागाकडे पाठविली आहे.

ठळक मुद्देया प्रकरणातील दोषी मुकेश सिंह यांनी मंगळवारी तुरूंग प्रशासनाकडे दया याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती मनमोहन आणि न्यायमूर्ती संगीता धिंग्रा सहगल यांच्या खंडपीठासमोर ही आव्हान याचिका सुनावणीसाठी देण्यात आली आहे.

नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने क्युरेटिव्ह याचिका फेटाळून लावल्यानंतर निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषी त्यांची फाशी पुढे ढकलण्यासाठी कोणतीही कसर सोडू इच्छित नाही. या प्रकरणातील दोषी मुकेश सिंह यांनी मंगळवारी तुरूंग प्रशासनाकडे दया याचिका दाखल केली आहे. मंगळवारी संध्याकाळी तुरुंग प्रशासनाने त्यांची दया याचिका दिल्ली सरकारच्या गृह विभागाकडे पाठविली आहे. वकिल राहुल मेहरा यांनी दिलेल्या माहितीनुसार 22 जानेवारीला निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी होऊ शकत नाही. यावेळेस जोपर्यंत राष्ट्रपती दया याचिका फेटाळत नाहीत तो पर्यंत फाशी होऊ शकत नाही असेही त्यांनी सांगितल्याने आता निर्भया प्रकरणातील दोषींना होणारी फाशीची शिक्षा लांबणीवर जाण्यासही शक्यता आहे. 

दिल्ली सरकारचा गृह विभाग दया याचिकेवर त्पन्नीनंतर केंद्रीय गृह मंत्रालयाकडे पाठवेल. तेथून दया याचिका राष्ट्रपतींकडे पाठविली जाईल. राष्ट्रपतींनी याचिका मान्य केली की नाकारली यावर दोषींना फाशीची शिक्षा अवलंबून असते. तिहार कारागृहाचे प्रवक्ते राजकुमार म्हणाले की, मुकेश यांनी मंगळवारी दया याचिका केली असून ती तुरूंग प्रशासनाने दिल्ली सरकारकडे पाठविली आहे. ७ जानेवारी रोजी पटियाला हाऊस कोर्टाने निर्भया दोषींच्या फाशीसाठी डेथ वॉरंट जारी केला.

Nirbhaya Case : गुन्हेगारांची फाशी कायम ठेवल्यानंतर निर्भयाच्या आईने व्यक्त केली अशी प्रतिक्रिया... 

दोषींना २२ जानेवारी रोजी तिहार तुरूंगात सकाळी ७ वाजता फाशी देण्यात येणार आहे. अशा वेळी दोषींना क्युरेटिव्ह याचिका अथवा दया याचिका दाखल करण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत देण्याची तरतूद आहे. पटियाला कोर्टाच्या या आदेशानंतर विनय कुमार आणि मुकेश सिंग या दोन दोषींच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह याचिका दाखल केली. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी ही याचिका फेटाळून लावली आहे.

याशिवाय निर्भया प्रकरणातील दोषी मुकेश सिंग यांनी पटियाला हाऊस कोर्टाने डेथ वॉरंटला हायकोर्टात आव्हान दिले आहे. न्यायमूर्ती मनमोहन आणि न्यायमूर्ती संगीता धिंग्रा सहगल यांच्या खंडपीठासमोर ही आव्हान याचिका सुनावणीसाठी देण्यात आली आहे. ही याचिका मुकेशच्यावतीने अधिवक्ता वृंदा ग्रोव्हर यांनी दाखल केली आहे. या याचिकेत मुकेश यांनी उपराज्यपाल आणि राष्ट्रपती यांना दया याचिका पाठविली आहे. या याचिकेत डेथ वॉरंट रद्द करावा अशी विनंती करण्यात आली आहे. तसेच या वॉरंटच्या अंमलबजावणीवर स्थगिती द्यावी अन्यथा याचिकाकर्त्याच्या घटनात्मक अधिकारावर परिणाम होईल असे देखील याचिकेत नमूद आहे.

या याचिकेत दया याचिका फेटाळल्यास त्याचे मृत्यू वॉरंट बजावण्यासाठी १४ दिवसांची नोटीस देण्यात यावी. शत्रुघभन चौहान विरुद्ध केंद्रातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार दया याचिका बरखास्त करण्याच्या नोटीस आणि डेथ वॉरंट अंमलबजावणीदरम्यान १४ दिवसांचे अंतर असले पाहिजे जेणेकरून दोषी त्याचा कायदेशीर हक्क बजावू शकेल.

 

 

 

टॅग्स :Nirbhaya Gang-rapeनिर्भया गॅंगरेपSupreme Courtसर्वोच्च न्यायालयjailतुरुंगHome Ministryगृह मंत्रालयPresidentराष्ट्राध्यक्ष