शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

नवा ट्विस्ट! "तू ये, नाहीतर तो मला मारून टाकेल"; लेकीचा 'तो' ऑडिओ ऐकून कुटुंबाला मोठा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 11:52 IST

अनुरागने मधूकडे १५ लाखांची मागणी केली होती आणि ती पूर्ण न केल्यामुळे तिचा दररोज मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता. 

लखनौमध्ये मर्चंट नेव्ही ऑफिसर अनुराग याची पत्नी मधूच्या मृत्यूने संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला आहे. लग्नाच्या सहा महिन्यांतच मुलीचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांनी आत्महत्या नाही तर सुनियोजित हत्या असल्याचा आरोप केला आहे. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नानंतर काही दिवसांनी मधूला खूप त्रास देण्यात आला. पती अनुरागने तिच्याकडे १५ लाखांची मागणी केली होती आणि ती पूर्ण न केल्यामुळे तिचा दररोज मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता. 

मधूची बहीण प्रियाने दिलेल्या माहितीनुसार, अनुरागला दारूचं व्यसन होतं आणि मधूलाही दारू पिण्यास भाग पाडत होता. तिने नकार दिल्यावर तो तिला मारहाण करायचा. तो मधूचा फोनही चेक करत होता आणि जर ती कोणाशी बोलली तर तिला शिवीगाळ करत होता. खूप संशय घ्यायचा. बहिणीशी बोलण्यापासूनही रोखायचा आणि दोन्ही बहिणींमधील नात्याबद्दल आक्षेपार्ह आरोपही करायचा.

मधूच्या बहिणीने एक धक्कादायक खुलासा केला. तिने सांगितले की, १० मार्च रोजी अनुरागने प्लेट ठेवण्याच्या छोट्याशा कारणावरून मधूला मारहाण केली. त्या दिवशी तिने बहिणीला बोलावलं आणि म्हणाली, " तू ये, नाहीतर तो मला मारून टाकेल." प्रियाने मधूचे शेवटचं ऑडिओ रेकॉर्डिंग देखील ऐकलं, ज्यामध्ये ती खूप रडत आहे. ऑडिओ ऐकून कुटुंबाला धक्का बसला आहे. लग्नाआधी मधू खूप उत्साही होती, तिला पार्टी करायला आणि फिरायला खूप आवडायचं, परंतु लग्नानंतर तिचं आयुष्यच बदललं. 

घटनेच्या एक दिवस आधी रविवारी अनुराग आणि मधू गाडीतून कुठेतरी गेले होते. अनुराग गाडीत दारू पिऊन होता, तर मधू गाडी चालवत होती. वाटेत खड्डा टाळण्यासाठी मधूने गाडी वळवली तेव्हा अनुरागने तिला टोमणे मारले आणि म्हणाला, "मुलांना पाहून तू गाडी वळवलीस का?" त्यानंतर त्याने मधूला गाडीतच मारहाण केली. दुसऱ्या दिवशी सोमवारी, दुपारी ४ वाजताच्या सुमारास, अनुरागने मधुच्या वडिलांना फोन करून सांगितलं की मधूने आत्महत्या केली आहे. कुटुंब तिथे पोहोचेपर्यंत मधुचा मृतदेह फासावरून खाली उतरवण्यात आला होता. कुटुंबाचा दावा आहे की, ही आत्महत्या असू शकत नाही, कारण मधू अशी मुलगी नव्हती जी टोकाचं पाऊल उचलेल.

मधूच्या कुटुंबाचं असंही म्हणणं आहे की, अनुराग ३० एप्रिल रोजी मर्चंट नेव्ही शिप ड्युटीवर जात असल्याचं सांगून घराबाहेर पडला होता आणि सहा महिने परत येणार नाही असं सांगितलं होतं. परंतु तो २२ जुलै रोजी अचानक घरी परतला. त्यानंतर बरोबर १० दिवसांनी मधूचा मृत्यू झाला. या संदर्भात कुटुंबाचं म्हणणं आहे की, अनुरागचं अचानक परतणं आणि त्यानंतर लगेचच त्याचा मृत्यू होणं हा एक मोठा कट आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdowryहुंडाPoliceपोलिस