शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

'तो' क्षुल्लक वाद टोकाला गेला आणि भाऊबीजेच्याच दिवशी 4 बहिणींनी एकुलता एक भाऊ गमावला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2021 12:33 IST

Crime News : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी मामाकडे आलेल्या भाच्याची निर्घृण हत्या केल्याची भयंकर घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली - ऐन दिवाळीत एक धक्कादायक घटना घडली आहे. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी मामाकडे आलेल्या भाच्याची निर्घृण हत्या केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. एक क्षुल्लक वाद टोकाला गेला आणि भाऊबीजेच्याच दिवशी 4 बहिणींनी एकुलता एक भाऊ गमावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशच्या खरगोनमध्ये ही मन सुन्न करणारी घटना घडली आहे. यामध्ये तरुणाचा मृत्यू झाला असून मामा गंभीररित्या जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. 

तरुण दिवाळीच्या निमित्ताने आपल्या मामाकडे आला होता. त्याच दरम्यान त्याच्या मामाचा गावातील काही लोकांसोबत वाद सुरू होता. याच दरम्यान त्याची हत्या करण्यात आली. पोलिसांना याप्रकरणी दहा जणांना ताब्यात घेतलं आहे. खरगोनच्या उमरखली येथे मामा पप्पू वर्मा याच्याकडे त्याचा भाचा राजा वर्मा आला होता. गाडी लावण्यावरून पप्पू वर्माचा गावातील काही लोकांशी छोटा वाद झाला. यानंतर वर्मा यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर रागाच्या भरात हल्ला करण्यात आला. घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. 

राजा हा चार बहिणींचा एकुलता एक भाऊ 

संतापलेल्या लोकांनी पप्पू वर्माच्या घरावर हल्ला केला आणि त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी राजा देखील या भांडणात पडला. पुढे या वादाचं रुपांतर मारहाणीत झालं. यामध्ये दोघांवर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला. दोन्ही जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण राजाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राजा हा चार बहिणींचा एकुलता एक भाऊ होता. भाऊबीजेच्याच दिवशी त्याचा मृत्यू झाल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेश