Naxal Attack: केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी मार्च 2026 पर्यंत देशातून नक्षलवादाचा समूळ नाश करण्याची शपथ घेतली आहे. अशातच, छत्तीसगडच्या बीजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी दोन निष्पाप गावकऱ्यांची क्रूरपणे हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. ही धक्कादायक घटना उसूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेलाकांकेर गावात घडली असून, या हत्येमुळं संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
रात्रीच्या अंधारात धारदार शस्त्रांनी हत्या
मिळालेल्या माहितीनुसार, नक्षलवाद्यांच्या एका पथकानं शुक्रवारी(दि.24) रात्री गावातील रवी कट्टम (25) आणि तिरुपती सोढी (38) या दोघांची धारदार शस्त्रांनी हत्या केली. घटनेनंतर नक्षलवादी तात्काळ जंगलाच्या दिशेनं फरार झाले. माहिती मिळताच पोलिस दल घटनास्थळी रवाना झाले आणि तपास सुरू केला. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच शेकडो नक्षलवाद्यांनी आत्मसर्मपण केलं, त्यानंतर अशाप्रकारची घटना घडली आहे.
भाजप कार्यकर्त्याचीही हत्या
यापूर्वी १४ ऑक्टोबर रोजी इलमिडी थाना क्षेत्रातील मुजालकांकेर गावात नक्षलवाद्यांनी भाजप कार्यकर्ता सत्यम पुनेमची गळा दाबून हत्या केली होती. पोलिसांच्या माहितीनुसार, पुनेम हा स्थानिक भाजप मंडळात सक्रिय कार्यकर्ता होता. घटनेच्या ठिकाणाहून मिळालेल्या पत्रकात नक्षलवाद्यांच्या “मद्देड एरिया कमिटी”नं या हत्येची जबाबदारी स्वीकारल्याचं नमूद करण्यात आलं होतं. पत्रकात पुनेमवर पोलिसांना माहिती पुरवल्याचा आरोप करण्यात आला होता.
बस्तरमध्ये वाढती नक्षल हिंसा
दरम्यान, बस्तर विभागातील सात जिल्ह्यांमध्ये चालू वर्षभरात सुमारे 40 लोक नक्षल हिंसेचे बळी ठरले आहेत. जानेवारी 2023 ते डिसेंबर 2024 या कालावधीत 11 भाजप नेत्यांची हत्या करण्यात आली आहे. हे आकडे स्पष्ट दर्शवतात की, नक्षलवाद्यांचा प्रभाव या भागात अजूनही कमी झालेला नाही.
Web Summary : Naxalites in Bijapur, Chhattisgarh, killed two villagers, Ravi Kattam and Tirupati Sodhi. This incident follows the earlier murder of a BJP worker and highlights ongoing Naxalite violence in the Bastar region, where 40 people have died this year.
Web Summary : छत्तीसगढ़ के बीजापुर में नक्सलियों ने दो ग्रामीणों, रवि कट्टम और तिरुपति सोढ़ी की हत्या कर दी। यह घटना भाजपा कार्यकर्ता की पहले की हत्या के बाद हुई है और बस्तर क्षेत्र में जारी नक्सली हिंसा को उजागर करती है, जहाँ इस वर्ष 40 लोग मारे गए हैं।