शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

Naxal Attack: “पगार घेणारे कर्मचारी ड्युटीवर मरत असतील तर त्यांना शहीद कसं म्हणायचं?”; लेखिकेची वादग्रस्त FB पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2021 12:24 IST

लेखिका शिखा सरमा यांच्यावर विविध कलमं ज्यात IPC १२४ अ(देशद्रोह) याचाही समावेश आहे. या लेखिकेला अटक करण्यात आली आहे.

ठळक मुद्देआसाममधील एका ४८ वर्षीय लेखिकेने जवानांच्या बलिदानावर फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट केलीशिखा सरमाची ही फेसबुक पोस्ट सोशल मीडियात चर्चेचा केंद्रबिंद बनली आहे. मोठ्या संख्येने लोकं याचा विरोध करत आहेशिखाचे विधान हे शहीद जवानांच्या बलिदानाचा  अपमान आहे. ही पोस्ट राष्ट्र भावनेतून सेवा करणाऱ्यांवर हल्ला आहे.

रायपूर – छत्तीसगडमध्ये अलीकडेच झालेल्या नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात सुरक्षा दलाचे २२ जवान शहीद झाले आहेत.   (Sukma Naxal Attack) देशातील प्रत्येक नागरिक या घटनेचा निषेध करून नक्षलींविरोधात सरकारने कडक कारवाई करण्याची मागणी करत आहे. यातच आसाममधील एका ४८ वर्षीय लेखिकेने जवानांच्या बलिदानावर फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट केली. त्यानंतर मंगळवारी या लेखिकेला देशद्रोहासह अन्य आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

गुवाहाटी पोलीस आयुक्त मुन्ना प्रसाद गुप्ता म्हणाले की, लेखिका शिखा सरमा यांच्यावर विविध कलमं ज्यात IPC १२४ अ(देशद्रोह) याचाही समावेश आहे. या लेखिकेला अटक करण्यात आली आहे. शिखा सरमा या लेखिकेने फेसबुकवर लिहिलं होतं की, पगार घेणारे कामगार जर ड्यूटीवेळी मरत असतील तर त्यांना शहीद कसं बोलू शकतो. याच लॉजिकनुसार जर वीज विभागातील कर्मचारी जो करंट लागून मृत्युमुखी पडतो त्यालाही शहीद म्हटलं पाहिजे. मीडियाच्या लोकांनी भावूक बनू नये असं या लेखिकेने म्हटलं आहे.

शिखा सरमाची ही फेसबुक पोस्ट सोशल मीडियात चर्चेचा केंद्रबिंद बनली आहे. मोठ्या संख्येने लोकं याचा विरोध करत आहे. सोमवारी गुवाहाटी हायकोर्टाचे वकील उमी डेका बरुआ आणि कंगकना गोस्वामी यांनी दिसपूर पोलीस स्टेशनमध्ये या विरोधात FIR नोंदवली आहे. तक्रारकर्त्यांनी शिखाविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. शिखाचे विधान हे शहीद जवानांच्या बलिदानाचा  अपमान आहे. ही पोस्ट राष्ट्र भावनेतून सेवा करणाऱ्यांवर हल्ला आहे. दिसपूर पोलीस स्टेशनने याबाबत तक्रार नोंदवून घेत शिखा सरमाला अटक केली आहे.

काय घटना घडली?

शनिवारी ३ एप्रिल रोजी छत्तीसगडमधील बिजापूर आणि सुकमा जिल्ह्याच्या सीमेवर झालेल्या मोठ्या नक्षलवादी हल्ल्यामध्ये २२ जवानांचा मृत्यू झाला होता. पैकी २१ जवानांचे मृतदेह हे रविवारी सापडले होते. बिजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी हल्ला करून केलेल्या जीवितहानीकडे सुरक्षा दले आणि गृहमंत्रालय नामुष्की म्हणून पाहत असून, त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी नक्षलवाद्यांविरोधात एक मोठे अभियान चालवण्याच्या मोहिमेची तयारी झाली आहे. या मोहिमेमध्ये नक्षलवाद्यांच्या काही टॉप कमांडरही सुरक्षा दलांच्या रडारवर असतील. त्यामध्ये बिजापूर नक्षली हल्ल्यामधील एक मास्टरमाईंड असलेला हिडमा याचाही समावेश असेल

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काल झालेल्या बैठकीनंतर गृहमंत्री अमित शाहा  यांनी नक्षलवाद्यांविरोधातील अभियानाला गती देण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच तसेच त्यासाठी ह्युमन इंटेलिजेन्स आणि टेक्निकल इंटेलिजेन्सची मदत घेतली जाईल. एवढेच नाही तर आता व्यापक पातळीवर एनटीआरओ सुरक्षा यंत्रणांना रियल टाइम माहिती देऊन मदत करेल.

 

टॅग्स :naxaliteनक्षलवादीFacebookफेसबुक