शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

प्रतिस्पर्धी टोळीला माहिती देत असल्याच्या कारणावरून खून ; चार वर्षांपूर्वीचा गुन्हा उघडकीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2018 21:38 IST

चार वर्षापूर्वी बेपत्ता झालेल्या तरुणाच्या खुनाचा गुन्हा उघड करण्यात गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलच्या पोलिसांना यश आले आहे.

पुणे : चार वर्षापूर्वी बेपत्ता झालेल्या तरुणाच्या खुनाचा गुन्हा उघड करण्यात गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलच्या पोलिसांना यश आले आहे. प्रतिस्पर्धी टोळीला माहिती देत असल्याच्या संशयातून अपहरण करून तरुणाचा खून करून त्याचा मृतदेह पुरुन टाकण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. मनोज भाऊसाहेब पाडळे (वय ३०, रा़ वडगाव बु.) अटक केलेल्याचे नाव आहे. तर त्याच्या इतर साथीदारांवर सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

    विनायक विलास चव्हाण (वय १८, रा़ नांदेड फाटा) असे खुन झालेल्याचे नाव आहे. मनोज पाडळे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याने साथीदारांसोबत मिळून चव्हाण याचा खून केला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार वर्षांपूर्वी विनायक विलास चव्हाण  हे बेपत्ता झाले होते. वडगाव बुद्रुक येथील पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार मनोज पाडळे याने त्याचा खून करून त्याचा मृतदेह नऱ्हे भागातील डोंगर उतारावर पुरला असल्याची माहिती प्रॉपर्टी सेलचे पोलिस हवालदार राजेंद्र झुंझुरके व सहायक पोलिस फौजदार अनिल शिंदे यांना मिळाली होती. त्यानंतर सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक निकम, उपनिरीक्षक दिगंबर जाखडे, अजय म्हेत्रे, सहायक पोलिस फौजदार दत्ता गरुड, अनिल शिंदे, अनिल उसुलकर,  कर्मचारी राजेंद्र झुंझुरके, राजेंद्र भोरडे, महेश साळवी, दादा खंडाळे, दिनकर भुजबळ तसेच इतर कर्मचाºयांनी  साक्षीदारांना शोधून त्याची सत्यता आढळून आल्यानंतर  पोलिसांनी पाडळे याला अटक केली.

   विनायक चव्हाण हा नऱ्हे येथील झील कॉलेज परिसरात मिळेल ते काम करत होता. दरम्यान तेथेच मनोज पाडळे याची पानाची टपरी होती. या टपरीवरच विनायक व मनोज पाडळे आणि त्याचे साथीदार सागर पवार, विशाल खरात, विकी चावडा, बाळा उर्फ बालाजी सूर्यवंशी, पप्पू गोळे,  अंकुश यांच्याशी ओळख झाली. मात्र मनोज हा परिसरातील पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत आहे. विनायक चव्हाण हा मनोज पाडळेच्या प्रतिस्पर्धी टोळीला त्यांच्याबद्दलची माहिती देत असल्याचा संशय त्याला आला होता. त्यामुळे त्याने व  त्याच्या साथीदारांनी विनायकचे १५ सप्टेबर २०१४ रोजी अपहरण केले. त्यांनी त्याला परिसरातीलच एका स्नूकर सेंटरवर नेऊन लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर १७ सप्टेबर २०१४ रोजी त्याला अभिनव कॉलेजच्या मागे असलेल्या डोंगराळ परिसरात नेऊन त्याचे हातपाय बांधून पुन्हा लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर त्याचा गळा चिरून खून केला. त्यानंतर त्याला तेथेच खड्डा खणून पुरण्यात आले. त्यासोबतच त्यातील एका साथीदाराला कोणाला हा प्रकार सांगितल्यास ठार करण्याची धमकी देत तीन दिवस अडकवून ठेवले होते, असे तपासात समोर आले. 

    या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक दिगंबर जाखडे यांनी सिंहगड रोड पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल केला.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणेMurderखूनnewsबातम्या