शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

महिलेने मुलींना सोबत घेऊन परिवाराला जेवणातून दिलं विष, कारण वाचून डोकं चक्रावून जाईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 15:40 IST

Noida Crime News : पोलिसांनुसार, आई आणि दोन मुलींचं प्रेमप्रकरण सुरू होतं. ज्याला परिवारातून विरोध होत होता. घरातील लोकांनी त्यांचं बाहेर जाणंही बंद केलं होतं.

Noida Crime News : ग्रेटर नोएडामधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. इथे एका सूनेने मुलींसोबत मिळून सासू, सासरा, पती आणि दीराला जेवणातून विष दिलं. मात्र, विषाचा डोज कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली. पण जसेही घरातील सर्व सदस्य बेशुद्ध झाले महिला आणि मुली आपापल्या प्रियकरांसोबत फरार झाल्या. घरात कोणतीही हालचाल न दिसल्याने शेजारी लोकांना संशय आला आणि त्यांनी लगेच पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी लगेच घरातील सर्व सदस्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. पोलिसांनी फरार महिला आणि तिच्या मुलींना त्यांच्या प्रियकरांसोबत अटक केली.

पोलिसांनुसार, आई आणि दोन मुलींचं प्रेमप्रकरण सुरू होतं. ज्याला परिवारातून विरोध होत होता. घरातील लोकांनी त्यांचं बाहेर जाणंही बंद केलं होतं. त्या आपल्या प्रियकरांसोबत फोनवरही बोलू शकत नव्हत्या. यानंतर तिघींनी मिळून परिवाराच्या हत्येचा प्लान केला, पण विष देताना मुलीचं काळीज पिघळलं. तिने जेवणात कमी विष टाकलं. मुलीला वाटत होतं की, घरातील सदस्यांचा जीव जाऊ नये. विषामुळे महिलेच्या सासूची स्थिती गंभीर झाली आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत. तर घरातील इतर सदस्य घरी परत आले आहेत.

असं सांगितलं जात आहे की, महिलेचे गावातच राहणाऱ्या एका तरूणासोबत अनैतिक संबंध होत. ज्याची माहिती परिवारातील सदस्यांना लागली होती. त्यामुळे घरात नेहमीच वाद होत होता. त्यानंतर महिला घर सोडून गेली होती. बऱ्याच दिवसांनी ती परत आली. यादरम्यान तिच्या दोन मुलींचं गावातील दोन तरूणांसोबत प्रेमप्रकरण सुरू झालं होतं. महिलेला जेव्हा याबाबत माहिती मिळाली तेव्हा तिने विरोध केला नाही. यादरम्या महिलाही तिच्या प्रियकरासोबत बोलत होती.

एक दिवस आरोपी महिला राजकुमारी तिचा प्रियकर रवींद्रसोबत फोनवर बोलत होती. ते पती देवेंद्रने ऐकलं. देवेंद्रने पत्नी आणि तिच्या प्रियकराला न बोलण्याची धमकी दिली. त्याने पत्नीचा फोनही फोडला. राजकुमारीला आपल्या दोन मुलींना सोबत घेऊन परिवाराला आपल्या मार्गातून हटवायचं होतं.

त्यांनी मिळून प्लान केला आणि यात मुलींचे प्रियकर अभिषेक व दीपकने मुख्य भूमिका निभावली. सर्वांनी मिळून योजना आखली की, परिवाराला विष देऊ त्यांना संपवायचं. पळून जायचं आणि काही दिवसांनी पुन्हा परत यायचं. तेव्हा पूर्ण प्रॉपर्टीवर कब्जा मिळवायचा. 

पोलिसांनी सांगितलं की, जेवणात विष टाकून सर्वांना देण्याची जबाबदारी मुलगी अर्चनाची होती. पण जेवणात विष टाकताना मुलीचं काळीज पिघळलं. तिने कमी विष घातलं. जेवणानंतर रात्री ११ वाजता सर्वांची स्थिती बिघडली आणि सगळे बेशुद्ध झाले.

यानंतर महिला तिच्या मुलींच्या प्रियकरांसोबत फरार झाली. घरात काहीच हालचाल झाली नाही तर शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी घरात जाऊन पाहिलं तर धक्का बसला. सगळे बेशुद्ध पडले होते. त्यानंतर पोलीस आले. पोलिसांनी सांगितलं की, महिलेचा प्रियकर या घटनेत सहभागी नव्हता. केवळ मुलींचे प्रियकर यात सहभागी होते. महिलेचं तिच्या प्रियकरासोबत भांडण झालं होतं. ज्यामुळे तिने प्रियकराला हे काही सांगितलं नाही. 

टॅग्स :delhiदिल्लीCrime Newsगुन्हेगारी