शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

महिलेने मुलींना सोबत घेऊन परिवाराला जेवणातून दिलं विष, कारण वाचून डोकं चक्रावून जाईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 15:40 IST

Noida Crime News : पोलिसांनुसार, आई आणि दोन मुलींचं प्रेमप्रकरण सुरू होतं. ज्याला परिवारातून विरोध होत होता. घरातील लोकांनी त्यांचं बाहेर जाणंही बंद केलं होतं.

Noida Crime News : ग्रेटर नोएडामधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. इथे एका सूनेने मुलींसोबत मिळून सासू, सासरा, पती आणि दीराला जेवणातून विष दिलं. मात्र, विषाचा डोज कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली. पण जसेही घरातील सर्व सदस्य बेशुद्ध झाले महिला आणि मुली आपापल्या प्रियकरांसोबत फरार झाल्या. घरात कोणतीही हालचाल न दिसल्याने शेजारी लोकांना संशय आला आणि त्यांनी लगेच पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी लगेच घरातील सर्व सदस्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. पोलिसांनी फरार महिला आणि तिच्या मुलींना त्यांच्या प्रियकरांसोबत अटक केली.

पोलिसांनुसार, आई आणि दोन मुलींचं प्रेमप्रकरण सुरू होतं. ज्याला परिवारातून विरोध होत होता. घरातील लोकांनी त्यांचं बाहेर जाणंही बंद केलं होतं. त्या आपल्या प्रियकरांसोबत फोनवरही बोलू शकत नव्हत्या. यानंतर तिघींनी मिळून परिवाराच्या हत्येचा प्लान केला, पण विष देताना मुलीचं काळीज पिघळलं. तिने जेवणात कमी विष टाकलं. मुलीला वाटत होतं की, घरातील सदस्यांचा जीव जाऊ नये. विषामुळे महिलेच्या सासूची स्थिती गंभीर झाली आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत. तर घरातील इतर सदस्य घरी परत आले आहेत.

असं सांगितलं जात आहे की, महिलेचे गावातच राहणाऱ्या एका तरूणासोबत अनैतिक संबंध होत. ज्याची माहिती परिवारातील सदस्यांना लागली होती. त्यामुळे घरात नेहमीच वाद होत होता. त्यानंतर महिला घर सोडून गेली होती. बऱ्याच दिवसांनी ती परत आली. यादरम्यान तिच्या दोन मुलींचं गावातील दोन तरूणांसोबत प्रेमप्रकरण सुरू झालं होतं. महिलेला जेव्हा याबाबत माहिती मिळाली तेव्हा तिने विरोध केला नाही. यादरम्या महिलाही तिच्या प्रियकरासोबत बोलत होती.

एक दिवस आरोपी महिला राजकुमारी तिचा प्रियकर रवींद्रसोबत फोनवर बोलत होती. ते पती देवेंद्रने ऐकलं. देवेंद्रने पत्नी आणि तिच्या प्रियकराला न बोलण्याची धमकी दिली. त्याने पत्नीचा फोनही फोडला. राजकुमारीला आपल्या दोन मुलींना सोबत घेऊन परिवाराला आपल्या मार्गातून हटवायचं होतं.

त्यांनी मिळून प्लान केला आणि यात मुलींचे प्रियकर अभिषेक व दीपकने मुख्य भूमिका निभावली. सर्वांनी मिळून योजना आखली की, परिवाराला विष देऊ त्यांना संपवायचं. पळून जायचं आणि काही दिवसांनी पुन्हा परत यायचं. तेव्हा पूर्ण प्रॉपर्टीवर कब्जा मिळवायचा. 

पोलिसांनी सांगितलं की, जेवणात विष टाकून सर्वांना देण्याची जबाबदारी मुलगी अर्चनाची होती. पण जेवणात विष टाकताना मुलीचं काळीज पिघळलं. तिने कमी विष घातलं. जेवणानंतर रात्री ११ वाजता सर्वांची स्थिती बिघडली आणि सगळे बेशुद्ध झाले.

यानंतर महिला तिच्या मुलींच्या प्रियकरांसोबत फरार झाली. घरात काहीच हालचाल झाली नाही तर शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी घरात जाऊन पाहिलं तर धक्का बसला. सगळे बेशुद्ध पडले होते. त्यानंतर पोलीस आले. पोलिसांनी सांगितलं की, महिलेचा प्रियकर या घटनेत सहभागी नव्हता. केवळ मुलींचे प्रियकर यात सहभागी होते. महिलेचं तिच्या प्रियकरासोबत भांडण झालं होतं. ज्यामुळे तिने प्रियकराला हे काही सांगितलं नाही. 

टॅग्स :delhiदिल्लीCrime Newsगुन्हेगारी