शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

भारत-वेस्ट इंडीज क्रिकेट सामन्याला सुरक्षा पुरवण्यास मुंबई पोलीस असमर्थ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2019 22:01 IST

मरिन लाईन्स येथील वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या भारत-वेस्ट इंडीज टी-20 क्रिकेट सामन्याला सुरक्षा देणे शक्‍य नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले

ठळक मुद्देअयोध्येतील बाबरी मशीद ६ डिसेंबर १९९२ रोजी पाडण्यात आली होती. अयोध्या निकाल सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिल्याने ६ डिसेंबरला सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर विशेष महत्त्व आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनासाठी ६ डिसेंबरला लाखो अनुयायी मुंबईत दादर, चैत्यभूमी  येथे दाखल होतात.

मुंबई - भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात ६ डिसेंबरला वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या टी-20 सामन्याला सुरक्षा पुरवण्यास मुंबई पोलिसांनी असमर्थता व्यक्त केली आहे. त्यामुळे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तसंजय बर्वे यांची भेट घेऊन सामन्याला सुरक्षा देण्याची विनंती केली.अयोध्येतील बाबरी मशीद ६ डिसेंबर १९९२ रोजी पाडण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या हिंसाचारामुळे हा दिवस संवेदनशील मानला जातो. त्याचबरोबर अयोध्या निकाल सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिल्याने ६ डिसेंबरला सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर विशेष महत्त्व आले आहे. त्याचप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनासाठी ६ डिसेंबरला लाखो अनुयायी मुंबईत दादर, चैत्यभूमी  येथे दाखल होतात. त्यामुळे मरिन लाईन्स येथील वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या भारत-वेस्ट इंडीज टी-20 क्रिकेट सामन्याला सुरक्षा देणे शक्‍य नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले असल्याची माहिती पोलीस आयुक्त प्रणय अशोक यांनी दिली आहे. त्यानंतर एमसीएच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्या भेटीची वेळ मागितली होती. त्यानुसार एमसीएच्या शिष्टमंडळाने आज पोलीस आयुक्त बर्वे यांची भेट घेऊन चर्चा केली. मुंबई पोलिसांकडे मनुष्यबळ अपुरे असल्यामुळे क्रिकेट सामन्यादरम्यान वानखेडे स्टेडियमला सुरक्षा देण्यास पोलिसांनी नकार दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे हा सामना होण्याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, याबाबत पोलीस आयुक्त आणि एमसीएच्या भेटीबाबत पोलिसांकडून अधिकृत माहिती मिळू शकली नाही. एमसीएने अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतला नसल्याचे सांगण्यात आले आहे. 

टॅग्स :Sanjay Barveसंजय बर्वेPoliceपोलिसcommissionerआयुक्तT20 Cricketटी-20 क्रिकेट