शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

२ मुलांच्या आईला झालं FB मित्राशी प्रेम; भेटायला ये नाहीतर जीव देईन दिली धमकी, मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2022 17:43 IST

वारंवार समजावूनही पत्नी नमिता पती संजयचं काहीही ऐकण्यास तयार नव्हती. यातच अलीकडेच नमिता कुणाशी तरी फोनवरुन सातत्याने बोलत होती

जमशेदपूर – झारखंडच्या जमशेदपूर जिल्ह्यात एका अजब प्रेमाची गजब कहानी सध्या चर्चेचा विषय बनली आहे. याठिकाणी एका महिलेला फेसबुकवर अनोळखी युवकाशी बोलता बोलता त्याच्यावर प्रेम जडलं. ही महिला दोन मुलांची आई आहे. ज्यावेळी या महिलेच्या पतीला या घटनेचा सुगावा लागला तेव्हा त्याने जे काही केले तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला.

मिळालेल्या माहितीनुसार, जमशेदपूरहून जवळपास ६० किमी अंतरावर काडाघोडा असं गाव आहे. याठिकाणी संजय महतो यांचं लग्न २०१६ मध्ये नमिता महतो यांच्याशी झालं. या दाम्पत्याची दोन मुलं आहे. एक मुलगा आणि एक मुलगी असं चौघांचे कुटुंब आहे. संजयची पत्नी गेल्या काही दिवसांपासून फेसबुकचा मोठ्या प्रमाणात वापर करु लागली होती. त्यामुळे अनेकदा घरच्या कामांमध्येही तिचे लक्ष लागत नव्हतं. त्यामुळे संजय आणि नमिता यांच्यात खटके उडत होते. फेसबुकच्या वापरामुळे दोघांमध्ये भांडणं झालं. संजयने पत्नी नमिताला अनेकदा व्हॉट्सअप चॅट्स करताना पाहिलं होतं. त्यावरुन दोघांमध्ये वाद निर्माण होत होते.

वारंवार समजावूनही पत्नी नमिता पती संजयचं काहीही ऐकण्यास तयार नव्हती. यातच अलीकडेच नमिता कुणाशी तरी फोनवरुन सातत्याने बोलत होती. त्यानंतर हळूहळू सगळ्या गोष्टी बाहेर पडू लागल्या. संजयला नमिताच्या हालचालींवर, वागण्यावर संशय आला. नमिताच्या आयुष्यात दुसरं कोणी व्यक्ती आल्याचा संशय संजयला आला. नमिता दुसऱ्या कोणावर प्रेम करत होती आणि त्याच्यासोबत तिला पुढचं आयुष्य घालवायचं आहे असं संजयला कळालं.

प्रियकराला दिली धमकी, मुंबईहून आला नाही तर जीव देईन

नमिता ज्याच्यावर प्रेम करत होती तो मुंबईला राहायला होता. नमिताने तिचा ऑनलाइन प्रियकर सुकराला मेसेज करुन तिच्याकडे बोलावून घेतलं. जर तो भेटायला आला नाही तर जीव देईन असं ती म्हणाली. सुकरा गावाला पोहचला तसं नमिता त्याच्यासोबत निघून गेली. इथं घरातून पत्नी अचानक गायब झाल्याने पती संजयने पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांचा तपास सुरु होणार इतक्यात सुकरा आणि नमिता दोघंही गावात आले. तेव्हा सगळ्या गावकऱ्यांसोबत या प्रकरणाची चर्चा झाली.

संजयने नमिताला खूप समजावलं परंतु ती प्रियकरासोबत जाण्याच्या मागणीवर ठाम होती. कुठल्याही परिस्थितीत त्याला सोडणार नसल्याचं नमिता म्हणाली. अखेर गावकऱ्यांच्या मध्यस्थीनंतर पंचायतीने त्या दोघांना एकत्रित राहण्याची परवानगी दिली. त्यानंतर नमिताचा पती संजयही तयार झाला. परंतु नमितासमोर संजयने अट ठेवली की प्रियकरासोबत पळून जाताना मुलांनाही सोबत घेऊन जा. तेव्हा नमिता आणि तिचा प्रियकर दोघंही तयार झाले.

टॅग्स :Facebookफेसबुक