शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

२ मुलांच्या आईला झालं FB मित्राशी प्रेम; भेटायला ये नाहीतर जीव देईन दिली धमकी, मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2022 17:43 IST

वारंवार समजावूनही पत्नी नमिता पती संजयचं काहीही ऐकण्यास तयार नव्हती. यातच अलीकडेच नमिता कुणाशी तरी फोनवरुन सातत्याने बोलत होती

जमशेदपूर – झारखंडच्या जमशेदपूर जिल्ह्यात एका अजब प्रेमाची गजब कहानी सध्या चर्चेचा विषय बनली आहे. याठिकाणी एका महिलेला फेसबुकवर अनोळखी युवकाशी बोलता बोलता त्याच्यावर प्रेम जडलं. ही महिला दोन मुलांची आई आहे. ज्यावेळी या महिलेच्या पतीला या घटनेचा सुगावा लागला तेव्हा त्याने जे काही केले तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला.

मिळालेल्या माहितीनुसार, जमशेदपूरहून जवळपास ६० किमी अंतरावर काडाघोडा असं गाव आहे. याठिकाणी संजय महतो यांचं लग्न २०१६ मध्ये नमिता महतो यांच्याशी झालं. या दाम्पत्याची दोन मुलं आहे. एक मुलगा आणि एक मुलगी असं चौघांचे कुटुंब आहे. संजयची पत्नी गेल्या काही दिवसांपासून फेसबुकचा मोठ्या प्रमाणात वापर करु लागली होती. त्यामुळे अनेकदा घरच्या कामांमध्येही तिचे लक्ष लागत नव्हतं. त्यामुळे संजय आणि नमिता यांच्यात खटके उडत होते. फेसबुकच्या वापरामुळे दोघांमध्ये भांडणं झालं. संजयने पत्नी नमिताला अनेकदा व्हॉट्सअप चॅट्स करताना पाहिलं होतं. त्यावरुन दोघांमध्ये वाद निर्माण होत होते.

वारंवार समजावूनही पत्नी नमिता पती संजयचं काहीही ऐकण्यास तयार नव्हती. यातच अलीकडेच नमिता कुणाशी तरी फोनवरुन सातत्याने बोलत होती. त्यानंतर हळूहळू सगळ्या गोष्टी बाहेर पडू लागल्या. संजयला नमिताच्या हालचालींवर, वागण्यावर संशय आला. नमिताच्या आयुष्यात दुसरं कोणी व्यक्ती आल्याचा संशय संजयला आला. नमिता दुसऱ्या कोणावर प्रेम करत होती आणि त्याच्यासोबत तिला पुढचं आयुष्य घालवायचं आहे असं संजयला कळालं.

प्रियकराला दिली धमकी, मुंबईहून आला नाही तर जीव देईन

नमिता ज्याच्यावर प्रेम करत होती तो मुंबईला राहायला होता. नमिताने तिचा ऑनलाइन प्रियकर सुकराला मेसेज करुन तिच्याकडे बोलावून घेतलं. जर तो भेटायला आला नाही तर जीव देईन असं ती म्हणाली. सुकरा गावाला पोहचला तसं नमिता त्याच्यासोबत निघून गेली. इथं घरातून पत्नी अचानक गायब झाल्याने पती संजयने पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांचा तपास सुरु होणार इतक्यात सुकरा आणि नमिता दोघंही गावात आले. तेव्हा सगळ्या गावकऱ्यांसोबत या प्रकरणाची चर्चा झाली.

संजयने नमिताला खूप समजावलं परंतु ती प्रियकरासोबत जाण्याच्या मागणीवर ठाम होती. कुठल्याही परिस्थितीत त्याला सोडणार नसल्याचं नमिता म्हणाली. अखेर गावकऱ्यांच्या मध्यस्थीनंतर पंचायतीने त्या दोघांना एकत्रित राहण्याची परवानगी दिली. त्यानंतर नमिताचा पती संजयही तयार झाला. परंतु नमितासमोर संजयने अट ठेवली की प्रियकरासोबत पळून जाताना मुलांनाही सोबत घेऊन जा. तेव्हा नमिता आणि तिचा प्रियकर दोघंही तयार झाले.

टॅग्स :Facebookफेसबुक