शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

नागपुरात  भिसी-लकी ड्रॉच्या नावावर कोट्यवधींनी फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2020 9:16 PM

भिसी आणि लकी ड्रॉच्या नावावर कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केल्याची घटना घडली आहे. गुन्हे शाखेने दोन व्यापारी बंधूंना अटक केली आहे. तपासात १५ जणांना जवळपास २ कोटी रुपयांनी फसविल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देव्यापारी बंधूंना अटक : अनेक नागरिक झालेत शिकार, सदर ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भिसी आणि लकी ड्रॉच्या नावावर कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केल्याची घटना घडली आहे. गुन्हे शाखेने दोन व्यापारी बंधूंना अटक केली आहे. तपासात १५ जणांना जवळपास २ कोटी रुपयांनी फसविल्याची माहिती आहे.नागपुरात सुरू असलेल्या भिसीच्या रॅकेटची माहिती या घटनेमुळे उजेडात आली आहे. आरोपी कश्मिरी गल्ली, पाचपावली येथील रहिवासी हरप्रीतसिंह ऊर्फ चिंटू गुरुमितसिंह अलघ आणि त्याचा भाऊ गमनप्रीतसिंह उर्फ बिन्नी इकबालसिंह अलघ हे आहेत. अलघ बंधू अनेक दिवसांपासून भिसीच्या व्यवसायात आहेत. ते व्हर्च्युअल कॉन्ट्रिब्युशन स्कीम आणि मासिक लकी ड्रॉच्या माध्यमातून नागरिकांना आकर्षित करीत होते. या स्कीमच्या माध्यमातून नागरिक त्यांच्याशी जुळले होते. कडबी चौक येथील रहिवासी हरविंदरसिंह नरुलांसह अनेक नागरिकांनी अलघ बांधवांकडे गुंतवणूक केली होती. नरुला यांनी एप्रिल २०१६ पासून अलघ बंधूंकडे व्हर्च्युअल कॉन्ट्रिब्यूशन स्कीममध्ये गुंतवणूक करणे सुरू केले होते. या स्कीममध्ये भिसीच्या धर्तीवर नागरिकांना वेगवेगळ्या वेळी रक्कम मिळणार होती. नरुला यांनी एप्रिल २०१६ ते नोव्हेंबर २०१८ दरम्यान गुंतवणूक केली. त्यांना ८ लाख २० हजार रुपये मिळणार होते. नरुलांनी २०१८ मध्ये पैसे परत मागितल्यानंतर अलघ बंधंूनी ही रक्कम मंथली लकी ड्रॉ स्कीमध्ये ट्रान्सफर केल्याची बतावणी केली. त्यांनी नरुलांना मंथली लकी ड्रॉ स्कीममध्ये मोठा फायदा होणार असल्याचे सांगितले. मंथली लकी ड्रॉ स्कीमचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर नरुला यांनी पैसे मागणे सुरू केले. परंतु त्यानंतरही अलघ बंधू टाळाटाळ करू लागले. नरुलांसह अनेक व्यापाऱ्यांनी आरोपींकडे व्हर्च्युअल कॉन्ट्रिब्यूशन स्कीम आणि मंथली लकी ड्रॉ स्कीम अंतर्गत कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली होती. नरुलांसारखेच आरोपी सर्वांनाच टाळाटाळ करीत होते. खूप दिवसांपासून त्रस्त झाल्यामुळे नागरिकांनी गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन राजमाने यांना तक्रार दिली. गुन्हे शाखेच्या हप्ता वसुली प्रतिबंधक पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू केला. तपासात १५ नागरिकांची दोन कोटींपेक्षा अधिक रुपयांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले. त्या आधारे पोलिसांनी नरुलांच्या तक्रारीवरून आरोपी अलघ बंधूंना अटक केली. त्यांना न्यायालयासमोर हजर करून १६ मार्चपर्यंत ताब्यात घेतले आहे. हे प्रकरण अनेक दिवसांपासून सुरू आहे. पीडितांनी पाचपावली ठाण्यातही तक्रार केली होती.पोलिसांनी काहीच कारवाई न केल्यामुळे गुंतवणूकदार शांत झाले होते. आरोपी आपली मोठी रक्कम नागरिकांकडे बाकी असल्याचे सांगत आहेत. ही रक्कम मिळताच पैसे परत करण्याचे आश्वासन देत आहेत. काही दिवसांपूर्वी आरोपी अलघ बंधूंचा पीडितांशी निगडित एका युवकाशी वाद झाला. त्यानंतर हे प्रकरण चिघळले.अनेक नागरिकांनी उचलला फायदाआरोपी अलघ बंधूंकडून अनेक नागरिकांनी फायदा घेतला आहे. त्यांचे पोलीस आणि गुंडांशी संबंध आहेत. त्यांची सरबराई करताना आरोपींचे खिसे रिकामे झाले. त्यांनाही बाजारातून मोठी रक्कम घ्यावयाची आहे. अलघ बंधू हॉटेल आणि फायनान्सच्या व्यवसायाशी निगडित आहेत. पोलीस त्यांची माहिती काढत आहेत.

टॅग्स :fraudधोकेबाजीInvestmentगुंतवणूक