शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

'जाळीदार टोपी, हातात मांस...'; हिस्ट्रीशीटर आहे अयोध्येत तणावाचा कट रचनारा महेश मिश्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 17:22 IST

प्रभू रामचंद्रांची जन्मभूमी असलेल्या अयोध्येत धार्मिक तणाव निर्माण करण्याचा कट उधळून लावण्यात आला आहे. येथे काही मंडळींनी जाळीदार टोपी ...

प्रभू रामचंद्रांची जन्मभूमी असलेल्या अयोध्येत धार्मिक तणाव निर्माण करण्याचा कट उधळून लावण्यात आला आहे. येथे काही मंडळींनी जाळीदार टोपी घालून धार्मिक स्थळांवर आक्षेपार्ह पत्रके आणि मांसाचे तुकडे फेकले. याप्रकरणी पोलिसांनी सात आरोपींना अटक केली आहे. हा कट रचणारा आरोपी हिस्ट्रीशीटर आहे. त्याच्यावर आधीपासूनच चार गुन्ह्यांची नोंद आहे.

कोण आहेत आरोपी?संबंधित घटनेचा तपास घेत पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. तर आणखी चार जणांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी सर्वप्रथम दोन आरोपींना ताब्यात घेतले होते. हे सर्व जण 'हिंदू योद्धा संघटने'शी संबंधित असल्याचे बोलले जात आहे. महेश मिश्रा (मास्टरमाइंड), प्रत्यूष कुमार, नितिन कुमार, दीपक गौड, ब्रजेश पांडे, शत्रुघ्न आणि विमल पांडेय अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यांच्यावर मशिदीबाहेर आक्षेपार्ह गोष्टी फेकून तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. हे लोक सीसीटीव्हीमध्येही कैद झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, असे काही करताना CCTV मध्येही दिसावे, अशी स्वतः आरोपीचीच इच्छा होती. यामुळेच त्याने संबंधित भागातील सीसीटीव्ही असलेल्या दोन मशिदींची निवड केली होती. याच बरोबर, महेश मिश्रा या संपूर्ण कटाचा मास्टरमाइंड होता. त्याने ब्रजेश पांडे नावाच्या वक्यक्तीच्या घरी यासंदर्भात प्लॅन आखला होता. एवढेच नाही, तर त्याने हे आक्षेपार्ह पत्रके लालबाग येथे छपले होते. तर आरोपी प्रत्यूष श्रीवास्तवने कुरान आणि टोपी विकत घेतली होती, असे पुलिसांनी म्हटले आहे.

याशिवाय, इतर आरोपींनी लालबागमधून मांस खरेदी केले होते. हे सामान 26 एप्रिलला घेण्यात आले आणि नंतर काश्मिरी मोहल्ला मशिदीत मांस आणि कुरान फेकण्यात आले. तसेच दुसऱ्या एका मशिदीत आक्षेपार्ह गोष्टी आणि मांस फेकण्यात आले, असेही पोलिसांनी म्हटले आहे. यासंदर्भात पोलिसांकडे चार तक्रारी आल्या होत्या. 

जहांगीरपुरीचा बदला घेण्याचा डाव! -पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जहांगीरपुरीचा बदला घेण्याची आरोपींची इच्छा होती. आरोपींनी म्हटले आहे, की हनुमान जयंतीच्या दिवशी जहांगीरपुरी येथे हिंसाचार झाला, यामुळेच त्यांची ईदच्या दिवशी वातावरण खराब करण्याची इच्छा होती. सध्या त्यांच्यावर आयपीसी कलम 295 आणि 295A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायदांतर्गत (NSA) गुन्हा नोंदवला जाईल. 

टॅग्स :Ayodhyaअयोध्याUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस