शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
4
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
5
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
6
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
7
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
8
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
9
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
10
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
11
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
12
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
13
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
14
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
15
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
16
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
17
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
18
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
19
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
20
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."

सवत घरी आणल्याने मुलांसोबत माऊलीने केली आत्महत्या? तीन मुलांना विष पाजून गळफासाचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2020 00:47 IST

Bhiwandi News : जेथे हे मृतदेह सापडले तेथे विषारी औषधाची पुडी व बाटली आढळली. त्यामुळे रंजना हिने स्वत: व मुलांना विष पाजून नंतर त्यांचे मृतदेह झाडाला टांगून आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.

-  मेघनाथ विशेपडघा - भिवंडी तालुक्यातील उंबरखांड या जेमतेम साडेसहाशे लोकवस्तीच्या गावात वास्तव्य करीत असलेल्या श्रीपत बच्चू बांगारे याची पत्नी रंजनाचे ऑक्टोबर महिन्यात ऑपरेशन झाले होते. त्यावेळी घरातील लहान मुलांना सांभाळण्यासह घरकामाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्याकरिता रंजनाच्या मावशीची मुलगी सविता ही आली होती. याच काळात श्रीपत व सविता यांचे प्रेमसंबंध जुळले. श्रीपतने सविताशी लग्न केले. यामुळे निराश झालेल्या रंजनाने पाच्छापूर येथील तानसा अभयारण्याला लागून असलेल्या घनदाट जंगलातील डोंगरमाथ्यावर जाऊन स्वत: व मुले दर्शना (१२), रोहिणी (६), रोहित (९) यांच्यासह आत्महत्या केली, असे प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे. रंजनाच्या भावाने श्रीपत व सविता यांच्यावर रंजनाचा छळ केल्याबद्दल गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. पोलिसांना घटनास्थळी विषाची पुडी सापडली आहे.रंजना व तिची तीन मुले २० ऑक्टोबर २०२० रोजी बेपत्ता झाली. याबाबत श्रीपतने पडघा पोलिसात तक्रार दिली होती. श्रीपतचा भाऊ संतोष हा जंगलात लाकडे तोडण्याकरिता गेला असता त्याला दुर्गंधी आल्याने तो त्या दिशेने गेला असता आप्प्याच्या झाडाला सडलेल्या अवस्थेतील दोन मृतदेह लटकले होते, तर दोन लहान मुलांचे मृतदेह जमिनीवर कोसळले होते. संतोषने ही वार्ता गावात देताच श्रीपत व सविता यांनी विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.पोलीस, घटनास्थळी उपस्थित ग्रामस्थ व रंजनाचे नातलग यांनी दिलेल्या माहितीनुसार, रंजनाचे ऑपरेशन झाल्याने घरातील कामे करण्याकरिता सविता आली होती. त्यावेळी श्रीपत व सविता यांचे प्रेमसंबंध जुळले. त्यांनी लग्न केले. या दोघांचे लग्न झाल्यानंतर जेमतेम तीन दिवसांनंतर रंजना ही मुलांसोबत निघून गेली. गेल्या दोन महिन्यांत तिचा ठावठिकाणा शोधण्यात पोलिसांना यश आले नाही. शुक्रवारी अचानक रंजना व तिच्या मुलांचे सडलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडले. जेथे हे मृतदेह सापडले तेथे विषारी औषधाची पुडी व बाटली आढळली. त्यामुळे रंजना हिने स्वत: व मुलांना विष पाजून नंतर त्यांचे मृतदेह झाडाला टांगून आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.रंजना आणि तिची तीन मुले २० ऑक्टोबर रोजी बेपत्ता झाली. याबाबत श्रीपतने पडघा पोलिसात तक्रार दिली होती. पोलिसांना घटनास्थळी विषाची पुडी सापडली आहे.श्रीपत व सविता हे सध्या मुंबईतील जे.जे. इस्पितळात उपचार घेत असून त्यांची प्रकृती सुधारत आहे. त्यांच्या चौकशीतून अधिक माहिती उघड होईल. ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप गोडबोले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणे