शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
4
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
5
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
6
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
7
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
8
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
9
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
10
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
11
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
12
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
13
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
14
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
15
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
16
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
17
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
18
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
19
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
20
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट

सवत घरी आणल्याने मुलांसोबत माऊलीने केली आत्महत्या? तीन मुलांना विष पाजून गळफासाचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2020 00:47 IST

Bhiwandi News : जेथे हे मृतदेह सापडले तेथे विषारी औषधाची पुडी व बाटली आढळली. त्यामुळे रंजना हिने स्वत: व मुलांना विष पाजून नंतर त्यांचे मृतदेह झाडाला टांगून आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.

-  मेघनाथ विशेपडघा - भिवंडी तालुक्यातील उंबरखांड या जेमतेम साडेसहाशे लोकवस्तीच्या गावात वास्तव्य करीत असलेल्या श्रीपत बच्चू बांगारे याची पत्नी रंजनाचे ऑक्टोबर महिन्यात ऑपरेशन झाले होते. त्यावेळी घरातील लहान मुलांना सांभाळण्यासह घरकामाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्याकरिता रंजनाच्या मावशीची मुलगी सविता ही आली होती. याच काळात श्रीपत व सविता यांचे प्रेमसंबंध जुळले. श्रीपतने सविताशी लग्न केले. यामुळे निराश झालेल्या रंजनाने पाच्छापूर येथील तानसा अभयारण्याला लागून असलेल्या घनदाट जंगलातील डोंगरमाथ्यावर जाऊन स्वत: व मुले दर्शना (१२), रोहिणी (६), रोहित (९) यांच्यासह आत्महत्या केली, असे प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे. रंजनाच्या भावाने श्रीपत व सविता यांच्यावर रंजनाचा छळ केल्याबद्दल गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. पोलिसांना घटनास्थळी विषाची पुडी सापडली आहे.रंजना व तिची तीन मुले २० ऑक्टोबर २०२० रोजी बेपत्ता झाली. याबाबत श्रीपतने पडघा पोलिसात तक्रार दिली होती. श्रीपतचा भाऊ संतोष हा जंगलात लाकडे तोडण्याकरिता गेला असता त्याला दुर्गंधी आल्याने तो त्या दिशेने गेला असता आप्प्याच्या झाडाला सडलेल्या अवस्थेतील दोन मृतदेह लटकले होते, तर दोन लहान मुलांचे मृतदेह जमिनीवर कोसळले होते. संतोषने ही वार्ता गावात देताच श्रीपत व सविता यांनी विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.पोलीस, घटनास्थळी उपस्थित ग्रामस्थ व रंजनाचे नातलग यांनी दिलेल्या माहितीनुसार, रंजनाचे ऑपरेशन झाल्याने घरातील कामे करण्याकरिता सविता आली होती. त्यावेळी श्रीपत व सविता यांचे प्रेमसंबंध जुळले. त्यांनी लग्न केले. या दोघांचे लग्न झाल्यानंतर जेमतेम तीन दिवसांनंतर रंजना ही मुलांसोबत निघून गेली. गेल्या दोन महिन्यांत तिचा ठावठिकाणा शोधण्यात पोलिसांना यश आले नाही. शुक्रवारी अचानक रंजना व तिच्या मुलांचे सडलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडले. जेथे हे मृतदेह सापडले तेथे विषारी औषधाची पुडी व बाटली आढळली. त्यामुळे रंजना हिने स्वत: व मुलांना विष पाजून नंतर त्यांचे मृतदेह झाडाला टांगून आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.रंजना आणि तिची तीन मुले २० ऑक्टोबर रोजी बेपत्ता झाली. याबाबत श्रीपतने पडघा पोलिसात तक्रार दिली होती. पोलिसांना घटनास्थळी विषाची पुडी सापडली आहे.श्रीपत व सविता हे सध्या मुंबईतील जे.जे. इस्पितळात उपचार घेत असून त्यांची प्रकृती सुधारत आहे. त्यांच्या चौकशीतून अधिक माहिती उघड होईल. ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप गोडबोले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणे