शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
2
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
3
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
4
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
5
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
6
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
7
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
8
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
9
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
10
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
11
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
12
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
13
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
14
NIA प्रमुख सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक, ३ जानेवारीला स्वीकारणार पदभार
15
Video: गळफास घेतलेल्या तरुणाला जीवनदान; पोलिस अधिकाऱ्याने CPR देऊन वाचवले प्राण
16
VHT 2025-26 : पांड्याचं 'तांडव'! वनडेत ठोकली टी-२० स्टाईल सेंच्युरी; संघाने जिंकली ४०० पारची लढाई
17
Hello 2026! न्यूझीलंडमध्ये नववर्षाचे जंगी स्वागत; ऑकलंडच्या स्काय टॉवरवर फटाक्यांची आतषबाजी
18
साबणापासून फेस पॅकपर्यंत... गाढविणीच्या दुधामुळे पालटलं नशीब, आता करतेय लाखोंची कमाई
19
गुंतवणूकदारांची 'चांदी'! वर्षाच्या शेवटच्या दिवशी ४ लाख कोटींची कमाई; मेटल आणि रिलायन्स शेअर्समध्ये धूम
20
"भाजपाला मदत व्हावी म्हणून अंबादास दानवेंनी निवडून येणाऱ्या महिलांचे तिकीट कापले", ठाकरेंच्या दोन नेत्यांमध्ये वाजले!
Daily Top 2Weekly Top 5

सवत घरी आणल्याने मुलांसोबत माऊलीने केली आत्महत्या? तीन मुलांना विष पाजून गळफासाचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2020 00:47 IST

Bhiwandi News : जेथे हे मृतदेह सापडले तेथे विषारी औषधाची पुडी व बाटली आढळली. त्यामुळे रंजना हिने स्वत: व मुलांना विष पाजून नंतर त्यांचे मृतदेह झाडाला टांगून आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.

-  मेघनाथ विशेपडघा - भिवंडी तालुक्यातील उंबरखांड या जेमतेम साडेसहाशे लोकवस्तीच्या गावात वास्तव्य करीत असलेल्या श्रीपत बच्चू बांगारे याची पत्नी रंजनाचे ऑक्टोबर महिन्यात ऑपरेशन झाले होते. त्यावेळी घरातील लहान मुलांना सांभाळण्यासह घरकामाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्याकरिता रंजनाच्या मावशीची मुलगी सविता ही आली होती. याच काळात श्रीपत व सविता यांचे प्रेमसंबंध जुळले. श्रीपतने सविताशी लग्न केले. यामुळे निराश झालेल्या रंजनाने पाच्छापूर येथील तानसा अभयारण्याला लागून असलेल्या घनदाट जंगलातील डोंगरमाथ्यावर जाऊन स्वत: व मुले दर्शना (१२), रोहिणी (६), रोहित (९) यांच्यासह आत्महत्या केली, असे प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे. रंजनाच्या भावाने श्रीपत व सविता यांच्यावर रंजनाचा छळ केल्याबद्दल गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. पोलिसांना घटनास्थळी विषाची पुडी सापडली आहे.रंजना व तिची तीन मुले २० ऑक्टोबर २०२० रोजी बेपत्ता झाली. याबाबत श्रीपतने पडघा पोलिसात तक्रार दिली होती. श्रीपतचा भाऊ संतोष हा जंगलात लाकडे तोडण्याकरिता गेला असता त्याला दुर्गंधी आल्याने तो त्या दिशेने गेला असता आप्प्याच्या झाडाला सडलेल्या अवस्थेतील दोन मृतदेह लटकले होते, तर दोन लहान मुलांचे मृतदेह जमिनीवर कोसळले होते. संतोषने ही वार्ता गावात देताच श्रीपत व सविता यांनी विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.पोलीस, घटनास्थळी उपस्थित ग्रामस्थ व रंजनाचे नातलग यांनी दिलेल्या माहितीनुसार, रंजनाचे ऑपरेशन झाल्याने घरातील कामे करण्याकरिता सविता आली होती. त्यावेळी श्रीपत व सविता यांचे प्रेमसंबंध जुळले. त्यांनी लग्न केले. या दोघांचे लग्न झाल्यानंतर जेमतेम तीन दिवसांनंतर रंजना ही मुलांसोबत निघून गेली. गेल्या दोन महिन्यांत तिचा ठावठिकाणा शोधण्यात पोलिसांना यश आले नाही. शुक्रवारी अचानक रंजना व तिच्या मुलांचे सडलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडले. जेथे हे मृतदेह सापडले तेथे विषारी औषधाची पुडी व बाटली आढळली. त्यामुळे रंजना हिने स्वत: व मुलांना विष पाजून नंतर त्यांचे मृतदेह झाडाला टांगून आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.रंजना आणि तिची तीन मुले २० ऑक्टोबर रोजी बेपत्ता झाली. याबाबत श्रीपतने पडघा पोलिसात तक्रार दिली होती. पोलिसांना घटनास्थळी विषाची पुडी सापडली आहे.श्रीपत व सविता हे सध्या मुंबईतील जे.जे. इस्पितळात उपचार घेत असून त्यांची प्रकृती सुधारत आहे. त्यांच्या चौकशीतून अधिक माहिती उघड होईल. ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप गोडबोले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणे