शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

वाड्यात मानपानावरून माेडले मुलीचे लग्न 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 00:00 IST

टिळ्याचा कार्यक्रम : चाैघांवर गुन्हा

 

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : लग्न जमल्यावर टिळा लावण्याच्या कार्यक्रमात मुलीकडच्यांनी याेग्य मानपान न केल्याचे कारण देत चक्क लग्न मोडल्याची घटना तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी नवरदेवासह त्याचे आईवडील व काकाविरोधात वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नीरज पाटील (नवरा मुलगा), सुधाकर पाटील (वडील), नयना पाटील (आई), कमलाकर पाटील (काका) अशी आरोपींची नावे आहेत. ते भिवंडी तालुक्यातील घोटगाव येथील रहिवासी आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवंडी तालुक्यातील घोटगाव येथील मूळ रहिवासी असणारे सुधाकर पाटील सध्या मुक्काम वसई यांनी त्यांच्या सिव्हिल इंजिनिअर असणाऱ्या नीरज या मुलाचे लग्न वाडा तालुक्यातील एका उच्चशिक्षित मुलीबरोबर ठरवले होते. हे लग्न जमण्यासाठी या मुलाचे काका कमलाकर पाटील यांनी पुढाकार घेतला होता. त्याअनुषंगाने हे लग्न जमल्यानंतर ३० ते ४० लोकांच्या उपस्थितीत कुंकू लावण्याचा कार्यक्रम पार पडला होता.यानंतर नवरीच्या वडिलांनी मुलाच्या काकांना फोन करून कारण विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र काका कमलाकर याने फोन न उचलता कोणताही प्रतिसाद दिला नाही. यानंतर मुलीचे वडील व आपले एक-दोन नातेवाईक मध्यस्थांना घेऊन मुलाच्या वडिलांकडे गेले असता मुलाचे काका कमलाकर पाटील हे आलेल्या मध्यस्थांना व मुलीच्या वडिलांना भेटले नाहीत. आपली फसवणूक झाल्याचे नवरी मुलीच्या वडिलांच्या लक्षात आले. यानंतर मुलीच्या वडिलांनी थेट पोलीस ठाणे गाठून फसवणुकीचा गुन्हा वाडा पोलीस ठाण्यात दाखल केला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक रूपाली गुंड तपास करत आहेत. या प्रकाराबाबत सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

जेवण, भेटवस्तूही दिल्यानवऱ्याकडील मंडळींचे नवरी मुलीच्या वडिलांनी येथोचित असे स्वागत केले. कपड्यांच्या भेटी दिल्या. जेवण घातले. मात्र दुसऱ्या दिवशी साखरपुड्याची तारीख ठरविण्यासाठी नवरी मुलीच्या वडिलांनी नवऱ्या मुलाला व त्याच्या काकांना विचारणा केली असता मुलाने त्यांना चक्क आपले जमणार नसल्याचे सांगितले.