शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
3
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
4
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
5
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
6
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
7
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
8
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
9
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
10
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
11
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
12
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
13
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
14
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
15
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
16
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
17
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
18
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
19
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
20
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...

नवरी जोमात, नवरदेव कोमात! अवघ्या 7 दिवसांचं लग्न, संबंधांना नकार; दागिने घेऊन नववधू पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2021 12:42 IST

Crime News : अवघ्या सात दिवसांत एक नवरी पैसे आणि दागिने घेऊन पसार झाल्य़ाची धक्कादायक घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली - राजस्थानच्या पोखरणमध्ये फसवणुकीची एक अजब घटना समोर आली आहे. अवघ्या सात दिवसांत एक नवरी पैसे आणि दागिने घेऊन पसार झाल्य़ाची धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नानंतर अवघ्या सात दिवसांतच ही घटना घडल्याने नवरी जोमात आणि नवरदेव कोमात असंचं म्हणावं लागेल. यामुळे नवरदेवाला मोठा मानसिक धक्का बसला आहे. लग्नानंतर नववधूने पतीसोबत शरीरसंबंध ठेवायलाही नकार लग्नाच्या आठव्या दिवशी तब्येत बिघडल्याचा बहाणा करत ती घरातून पसार झाली. तसेच हे लग्न जमवणारा मध्यस्थी म्हणून असलेला व्यक्ती देखील तेव्हापासून गायब आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या पोखरणमध्ये राहणाऱ्या बाबूरामचं शांती नावाच्या एका तरुणीशी लग्न झालं होतं. जगमाल सिंह या मध्यस्थाच्या मदतीनं हे लग्न जमलं होतं आणि मर्यादित नातेवाईकांच्या उपस्थितीत पार पडलं होतं. पुजाऱ्यांच्या उपस्थितीत आर्य मंदिरात हा विवाह पार पडला. त्यानंतर घरी आलेल्या नववधूचं वागणं पाहून बाबूरामलाही थोडा धक्का बसला. तिनेनलग्नानंतर शारीरिक संबंध ठेवायला नकार दिला होता. काहीतरी बहाणा सांगून तिने काही दिवसांनी संबंध ठेवण्याची विनंती केली होती. पत्नीच्या इच्छेचा आदर करत बाबूरामनेही ही गोष्ट मान्य केली होती. 

लग्नानंतर आठव्याच दिवशी संसार मोडला

लग्नाच्या आठ दिवसांपर्यंत ते दोघे एकाच घरात राहत होते, मात्र त्यांच्यामध्ये पती-पत्नीसारखे कोणतेही संबंध नव्हते. लग्नाच्या आठव्या दिवशी आपली तब्येत ठीक नसल्याचं सांगत शांतीने उपचारासाठी रुग्णालयात जाण्याची विनंती केली. मात्र रुग्णालयामध्ये गेलेली शांती पुन्हा घरी आलीच नाही. बाबूरामने तिला खूप वेळा फोन लावण्याचा प्रयत्न केला, मात्र तिचा फोन बंद येत होता. बाबूराम जेव्हा तिचा शोध घेऊन घरी आला, तेव्हा त्याच्या घरातील सर्व पैसे आणि दागिने गायब होते. सर्व संपत्ती लुटून शांतीने पळून गेल्याचं त्याच्या लक्षात आलं.

सात लाख रोख रक्कम आणि साडे तीन लाखांचं सोनं घेऊन पसार

पत्नीने फसवणूक केल्याचं समजताच त्याने मध्यस्थ असणाऱ्या जगमाल सिंहला फोन केला. मात्र त्याचा फोनदेखील बंद असल्यामुळे अखेर त्याने पोलिसांत धाव घेत याबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनी मध्यस्थ आणि पत्नी शांती हे एकमेकांचे साथीदार असण्याची शक्यता वर्तवली आहे. बाबूरामने तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, जवळपास सात लाख रोख रक्कम आणि साडे तीन लाखांचं सोनं घेऊन शांती पळून गेल्याचं म्हटलं आहे. पोलीस या दोघांचा सध्या शोध घेत असून अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :marriageलग्नCrime Newsगुन्हेगारी