शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

नवरी जोमात, नवरदेव कोमात! अवघ्या 7 दिवसांचं लग्न, संबंधांना नकार; दागिने घेऊन नववधू पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2021 12:42 IST

Crime News : अवघ्या सात दिवसांत एक नवरी पैसे आणि दागिने घेऊन पसार झाल्य़ाची धक्कादायक घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली - राजस्थानच्या पोखरणमध्ये फसवणुकीची एक अजब घटना समोर आली आहे. अवघ्या सात दिवसांत एक नवरी पैसे आणि दागिने घेऊन पसार झाल्य़ाची धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नानंतर अवघ्या सात दिवसांतच ही घटना घडल्याने नवरी जोमात आणि नवरदेव कोमात असंचं म्हणावं लागेल. यामुळे नवरदेवाला मोठा मानसिक धक्का बसला आहे. लग्नानंतर नववधूने पतीसोबत शरीरसंबंध ठेवायलाही नकार लग्नाच्या आठव्या दिवशी तब्येत बिघडल्याचा बहाणा करत ती घरातून पसार झाली. तसेच हे लग्न जमवणारा मध्यस्थी म्हणून असलेला व्यक्ती देखील तेव्हापासून गायब आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या पोखरणमध्ये राहणाऱ्या बाबूरामचं शांती नावाच्या एका तरुणीशी लग्न झालं होतं. जगमाल सिंह या मध्यस्थाच्या मदतीनं हे लग्न जमलं होतं आणि मर्यादित नातेवाईकांच्या उपस्थितीत पार पडलं होतं. पुजाऱ्यांच्या उपस्थितीत आर्य मंदिरात हा विवाह पार पडला. त्यानंतर घरी आलेल्या नववधूचं वागणं पाहून बाबूरामलाही थोडा धक्का बसला. तिनेनलग्नानंतर शारीरिक संबंध ठेवायला नकार दिला होता. काहीतरी बहाणा सांगून तिने काही दिवसांनी संबंध ठेवण्याची विनंती केली होती. पत्नीच्या इच्छेचा आदर करत बाबूरामनेही ही गोष्ट मान्य केली होती. 

लग्नानंतर आठव्याच दिवशी संसार मोडला

लग्नाच्या आठ दिवसांपर्यंत ते दोघे एकाच घरात राहत होते, मात्र त्यांच्यामध्ये पती-पत्नीसारखे कोणतेही संबंध नव्हते. लग्नाच्या आठव्या दिवशी आपली तब्येत ठीक नसल्याचं सांगत शांतीने उपचारासाठी रुग्णालयात जाण्याची विनंती केली. मात्र रुग्णालयामध्ये गेलेली शांती पुन्हा घरी आलीच नाही. बाबूरामने तिला खूप वेळा फोन लावण्याचा प्रयत्न केला, मात्र तिचा फोन बंद येत होता. बाबूराम जेव्हा तिचा शोध घेऊन घरी आला, तेव्हा त्याच्या घरातील सर्व पैसे आणि दागिने गायब होते. सर्व संपत्ती लुटून शांतीने पळून गेल्याचं त्याच्या लक्षात आलं.

सात लाख रोख रक्कम आणि साडे तीन लाखांचं सोनं घेऊन पसार

पत्नीने फसवणूक केल्याचं समजताच त्याने मध्यस्थ असणाऱ्या जगमाल सिंहला फोन केला. मात्र त्याचा फोनदेखील बंद असल्यामुळे अखेर त्याने पोलिसांत धाव घेत याबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनी मध्यस्थ आणि पत्नी शांती हे एकमेकांचे साथीदार असण्याची शक्यता वर्तवली आहे. बाबूरामने तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, जवळपास सात लाख रोख रक्कम आणि साडे तीन लाखांचं सोनं घेऊन शांती पळून गेल्याचं म्हटलं आहे. पोलीस या दोघांचा सध्या शोध घेत असून अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :marriageलग्नCrime Newsगुन्हेगारी