Maratha Reservation मुंबई बंददरम्यान हिंसाचार करणाऱ्या तिघांना गोव्यात अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2018 06:37 PM2018-08-02T18:37:54+5:302018-08-02T18:38:33+5:30

Maratha Reservation: कलंगुट पोलिसांनी भूषण भगवान आगास्कर, आशिष काळे आणि चंद्रशेखर या तिघांना केली अटक

Maratha Reservation Mumbai: Three people arrested in Goa who made riot during Mumbai Bandh | Maratha Reservation मुंबई बंददरम्यान हिंसाचार करणाऱ्या तिघांना गोव्यात अटक 

Maratha Reservation मुंबई बंददरम्यान हिंसाचार करणाऱ्या तिघांना गोव्यात अटक 

Next

नवी मुंबई - मराठा आरक्षणावरुन मुंबईत पुकारलेल्या बंदवेळी मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडून आला. या हिंसाचारानंतर पोलिसांकडून अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. नवी मुंबईतही हत्या आणि जाळपोळीसारख्या हिंसा पसरवणाऱ्या घटना आंदोलनावेळी घडल्या आहेत. याप्रकरणी फरार असलेल्या तिघांना गोव्यातील कलंगुट पोलिसांनी अटक केली आहे. नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील हिंसाचारप्रकरणी या तिघांना अटक केल्याचे कलिंगवूडचे पोलीस निरीक्षक जीवबा दळवी यांनी सांगितले.

मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन मुंबई बंदवेळी नवी मुंबईत मोठ्या प्रमाणावर हिंसाचार पसरला होता. तसेच गाड्यांची तोडफोड - जाळपोळ  करण्यात आली होती. जमावाने केलेल्या तुफान दगडफेकीनंतर पोलीसंच कर्फ्यू देखील लावण्यात आला होता. अनेक तरुणांना नवी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले होते.  मारहाणीत जखमी झालेला तरुण रोहन तोडकर (वय - १९) याचा मृत्यू देखील झाला होता. दरम्यान, इंटरनेट सुविधा बंद करण्याचा अत्यंत चांगला निर्णय घेतल्यामुळे परस्थिती नियंणत्रात आली. याप्रकरणी गोव्यात कलंगुट पोलिसांनी भूषण भगवान आगास्कर, आशिष काळे आणि चंद्रशेखर या तिघांना अटक केली आहे. 

Web Title: Maratha Reservation Mumbai: Three people arrested in Goa who made riot during Mumbai Bandh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.