शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरे सरकारच्या वाझे गँगने मनसुख हिरेन यांची हत्या केली ; किरीट सोमय्या यांचा ठाकरे सरकारवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 14:05 IST

Kirit Somaiya on Mansukh Hiren Death : बुधवारी शहरातील कोविड लसीकरण केंद्रांना भेटी देण्यासाठी किरीट सोमय्या भिवंडीत आले होते.

ठळक मुद्दे मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी अपारदर्शकपणे व घाईघाईने ५ जून २०२० रोजी सचिन वाझे यांना पुन्हा पोलीस सेवेत घेतले यामागे नेमकी काय हेतू होता

नितिन पंडीत

भिवंडी - ठाकरे सरकारच्या ठाकरे सरकारच्या वाझे गँगने मनसुख हिरेन यांची हत्या केली असा आरोप भाजपचे किरीट सोमय्या यांनी भिवंडीत केला आहे. त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. बुधवारी शहरातील कोविड लसीकरण केंद्रांना भेटी देण्यासाठी किरीट सोमय्या भिवंडीत आले होते. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधतांना त्यांनी ठाकरे सरकारवर मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात आरोप केला. यावेळी बोलतांना सोमय्या म्हणाले कि आपण कालच हिरेन परिवाराची भेट घेतली असून या भेटी दरम्यान हिरेन परिवार प्रचंड तणावात असल्याचे मला आढळले असून ठाकरे सरकारच्या वाझे गँग कडून त्यांच्या पत्नी व परिवाराला धमक्या येत असल्याने हिरेन परिवाराला सुरक्षा पुरविण्यात यावी अशी विनंती व मागणी लेखी पत्राद्वारे आपण एनआयए यंत्रणा व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली असल्याचेही सोमय्या यांनी यावेळी सांगितले. 

त्याचबरोबर मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी अपारदर्शकपणे व घाईघाईने ५ जून २०२० रोजी सचिन वाझे यांना पुन्हा पोलीस सेवेत घेतले यामागे नेमकी काय हेतू होता याची देखील चौकशी व्हावी अशा मागणीचे पत्र देखील आपण एनआयएला दिले असल्याचेही सोमय्या यांनी सांगितले. 

तर या हिरेन प्रकरणात भाजपचा हात असल्याचा आरोप व ट्विट काँग्रेसचे सचिन सावंत यांनी केला असून याबत सोमय्या यांना विचारले असता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , गृहमंत्री अनिल देशमुख व काँग्रेसचे सचिन सावंत हे हिरेन प्रकरण भरकटविण्याचा प्रयत्न करत असून सरकार तुमचा , पोलीस तुमचे वाझेही तुमचाच मग हिरेन प्रकरणात पंधरा दिवस सरकार व पोलीस झोपा काढत होते काय ? की हे सर्व जण ५० कोटींच्या वासुलीत व्यस्त होते असा प्रती सवाल व आरोप देखील सोमय्या यांनी केला असून सचिन वाझेचा बोलविता धनी देखील तुरुंगात जाणार असल्याचा विश्वास सोमय्या यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

टॅग्स :sachin Vazeसचिन वाझेMansukh Hirenमनसुख हिरणKirit Somaiyaकिरीट सोमय्याBJPभाजपा