शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

महिलांनो, मुलींनो आपली तक्रार बिनधास्तपणे तक्रार पेटीत टाका, पोलिसांचा स्तुत्य उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2021 19:48 IST

Women's safety : महिला सुरक्षेसाठी माणिकपूर पोलिसांचा स्तुत्य उपक्रम ; 112 टोल फ्री नंबर जाहीर

ठळक मुद्दे खरं तर अनेक महिला, मुली या आपल्या बदनामी ला घाबरत असतात आणि तसे होऊ नये, या भीतीने त्या तक्रार करण्यासाठी पुढे येत नाहीत. पोलिस ठाण्यात न जाता महिला, मुली आपली तक्रार थेट या तक्रार पेटीत टाकून आपले म्हणणे मांडू शकतात.

आशिष राणे

वसई :- शहरीकरण वाढले आणि गुन्हे ही वाढले  अखेर उशिरा का होईना राज्यशासनातर्फे गतवर्षी ०१ ऑक्टोबर २०२० रोजी मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तांलय स्थापन करण्यात आले. दरम्यान गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असतानाही त्यात महिला व मुलीवरचे अत्याचार ही बाब दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. त्यात मुंबई किंवा उपनगरात सध्या महिला वर्ग, लहान मोठया मुलीवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. 

त्यात अलीकडेच मुंबई साकीनाका व कल्याण -डोंबिवली सारख्या घटनानी महाराष्ट्र हादरून गेला   मात्र मीरा भाईंदर वसई विरार शहरात देखील भविष्यात घडू नयेत किमान गुन्ह्याला आळा व प्रतिबंध होण्याच्या दृष्टीने वसई विरार पोलीस आयुक्त डॉ सदानंद दाते यांच्या नेतृत्व व संकल्पनेनुसार झोन २ चे पोलीस  उप-आयुक्त संजय कुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माणिकपूर पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आहेर यांनी महिला सुरक्षितता म्हणून शहरात माणिकपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सार्वजनिक ठिकाणी १२ तक्रार पेट्या लावल्या आहेत.  याव्यतिरिक्त ११२ क्रमांकाचा टोल फ्री नंबर देखील महिलांना मदत म्हणून जाहीर केल्याची माहिती पोलिस निरीक्षक भाऊसाहेब आहेर यांनी लोकमत ला दिली.

दरम्यान खरं तर अनेक महिला, मुली या आपल्या बदनामी ला घाबरत असतात आणि तसे होऊ नये, या भीतीने त्या तक्रार करण्यासाठी पुढे येत नाहीत. त्यामुळे त्या कधीकधी मानसिक ताण सहन करतात अर्थातच मुली व महिला आपल्या अत्याचाराविरोधात पुढे येत नसल्याने गुन्हेगारांचे  मनोबल वाढते आणि यालाच  आळा घालण्यासाठी पोलिस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली माणिकपूर पोलिसांनी हे  पाऊल उचलले आहे. विशेष म्हणजे आता महिलांसाठी पोलिसांनी टोल फ्री नंबर ११२ हा  जाहीर केला असून शहरात प्रत्येक सार्वजनिक ठिकाणी एक बंद तक्रार पेटी पोलिसांकडून बसविण्यात आली आहे.

माणिकपूर पोलीस हद्दीत 12 ठिकाणी तक्रार पेटी

पोलिसांनी टोल फ्री नंबर जाहीर केल्याने आता या नंबर वरून कधीही कुठेही केव्हाही महिला, मुलींना आपली तक्रार नोंदवता येणार आहे. मग त्यात शाळा, कॉलेज, रेल्वेस्थानक, बस स्टॉप, वसई पश्चिम सनसिटी चौकी, नायगाव चौक, बँका, रिक्षा स्टॅन्ड आदी अशा 12 ठिकाणी  माणिकपूर पोलिसांनी तक्रार पेटी बसविली आहे.

पोलिस ठाण्यात न जाता महिला, मुली आपली तक्रार थेट या तक्रार पेटीत टाकून आपले म्हणणे मांडू शकतात. आणि तक्रार येताच त्यावर एक स्वतंत्र बिट व त्यातील पोलीस यावर  तत्काळ कारवाई करणार असल्याचे पोलीसाकडून सांगण्यात आले आहे. या स्तुत्य उपक्रमाने नक्कीच महिला व मुली सक्षम व बिनधास्त होण्यास मदत च मिळेल

 

पोलीस आयुक्त व उपायुक्त सरांचे नेहमीच मार्गदर्शन असते त्यानुसार आता शहरात ११२ टोल फ्री नंबरवर महिला, मुली आपली तक्रार नोंदवू शकतात.आपण 12 सार्वजनिक ठिकाणी तक्रार पेटी लावली आहे. महिलांनी निःसंकोचपणे टोल फ्री नंबरवर फोन करावा, आपली तक्रारपेटीत तक्रार टाकावी, त्यासाठी आम्ही स्वतंत्र बिट तयार केले आहे. तक्रार केल्यानंतर त्याची तत्काळ दखल घेतली जाणार आहे.- भाऊसाहेब आहेर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, झोन -२ माणिकपूर पोलिस ठाणे

टॅग्स :PoliceपोलिसWomenमहिलाVasai Virarवसई विरारcollegeमहाविद्यालय