शहरं
Join us  
Trending Stories
1
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
3
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
4
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
5
IND vs SA Women's World Cup 2025 Final Live Streaming: फायनलमध्ये 'ही' गोष्ट ठरेल भारतासाठी जमेची बाजू
6
"वर्गात एक विद्यार्थी असेल तरी मराठीची तुकडी चालली पाहिजे", विश्वास पाटील यांची स्पष्ट भूमिका
7
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
8
IND vs AUS 3rd T20I Live Streaming : हा सामना जिंका नाहीतर मालिका विसरा! टीम इंडियाकडे शेवटची संधी
9
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
10
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
11
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
12
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
13
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
14
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
15
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
16
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
17
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
18
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
19
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
20
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले

मामीला घेऊन पळून गेला भाचा; नाराज मामाने 3 मुलांना दिलं विष अन् उचललं टोकाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2023 11:29 IST

एका महिलेने आपल्या पतीची फसवणूक करून भाच्यासोबत प्रेमसंबंध ठेवले होते.

उत्तर प्रदेशातील बहराइचमध्ये एका महिलेने आपल्या पतीची फसवणूक करून भाच्यासोबत प्रेमसंबंध ठेवले होते. इतकंच नाही तर ती तिन्ही मुलं आणि पतीला सोडून भाच्यासोबत मुंबईला पळून गेली. हा प्रकार पतीला समजताच तो अस्वस्थ झाला. त्याने आपल्या मुलांना विषारी बिस्किटे खाऊ घातली. त्यानंतर त्याने स्वतः विष प्राशन केलं. यामध्ये पतीचा मृत्यू झाला आहे. तर मुलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिन्ही मुलांची प्रकृती चिंताजनक आहे.

हे प्रकरण राणीपूर परिसरातील निजामपूर गावचे आहे. व्यवसायाने मजूर असलेले धर्म चंद पत्नी आणि तीन मुलांसह येथे राहत होता. मजुरीच्या कामासाठी तो अनेकदा घराबाहेर असायचा. याच दरम्यान, धर्म चंद याच्या पत्नीचे तिच्या भाच्यासोबत प्रेमसंबंध सुरू झाले. त्यानंतर पंधरा दिवसांपूर्वी ती आपल्या तीन निरागस मुलांना सोडून भाच्यासोबत मुंबईला पळून गेली.

ही बाब धर्म चंद यांना समजताच त्याला मोठा धक्काच बसला. तो काळजीत पडला. काही दिवस एकटा आणि गप्प राहिला. मात्र काल रात्री म्हणजेच रविवारी रात्री धर्मचंदने आपल्या तीन मुलांना बोलावून घेतलं. त्यांना बिस्किटं खायला दिली. निष्पाप मुलांनी विचार न करता बिस्किटं खाल्ली. मात्र बिस्किटे खाल्ल्याबरोबर त्यांची प्रकृती ढासळू लागली. धर्म चंद याने बिस्किटांमध्ये विष मिसळले होतं.

स्वतः विष प्राशन केलं होतं. त्याला आपल्या मुलांची हत्या करून स्वतःचं जीवन संपवायचे होते. चौघांची प्रकृती ढासळू लागल्यावर त्यांनी ओरडण्यास सुरुवात केली. त्याचा आवाज ऐकून शेजारी आले. चौघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान धर्म चंदचा मृत्यू झाला. तर तिन्ही मुलांची प्रकृती चिंताजनक आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी