शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

मामीला घेऊन पळून गेला भाचा; नाराज मामाने 3 मुलांना दिलं विष अन् उचललं टोकाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2023 11:29 IST

एका महिलेने आपल्या पतीची फसवणूक करून भाच्यासोबत प्रेमसंबंध ठेवले होते.

उत्तर प्रदेशातील बहराइचमध्ये एका महिलेने आपल्या पतीची फसवणूक करून भाच्यासोबत प्रेमसंबंध ठेवले होते. इतकंच नाही तर ती तिन्ही मुलं आणि पतीला सोडून भाच्यासोबत मुंबईला पळून गेली. हा प्रकार पतीला समजताच तो अस्वस्थ झाला. त्याने आपल्या मुलांना विषारी बिस्किटे खाऊ घातली. त्यानंतर त्याने स्वतः विष प्राशन केलं. यामध्ये पतीचा मृत्यू झाला आहे. तर मुलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिन्ही मुलांची प्रकृती चिंताजनक आहे.

हे प्रकरण राणीपूर परिसरातील निजामपूर गावचे आहे. व्यवसायाने मजूर असलेले धर्म चंद पत्नी आणि तीन मुलांसह येथे राहत होता. मजुरीच्या कामासाठी तो अनेकदा घराबाहेर असायचा. याच दरम्यान, धर्म चंद याच्या पत्नीचे तिच्या भाच्यासोबत प्रेमसंबंध सुरू झाले. त्यानंतर पंधरा दिवसांपूर्वी ती आपल्या तीन निरागस मुलांना सोडून भाच्यासोबत मुंबईला पळून गेली.

ही बाब धर्म चंद यांना समजताच त्याला मोठा धक्काच बसला. तो काळजीत पडला. काही दिवस एकटा आणि गप्प राहिला. मात्र काल रात्री म्हणजेच रविवारी रात्री धर्मचंदने आपल्या तीन मुलांना बोलावून घेतलं. त्यांना बिस्किटं खायला दिली. निष्पाप मुलांनी विचार न करता बिस्किटं खाल्ली. मात्र बिस्किटे खाल्ल्याबरोबर त्यांची प्रकृती ढासळू लागली. धर्म चंद याने बिस्किटांमध्ये विष मिसळले होतं.

स्वतः विष प्राशन केलं होतं. त्याला आपल्या मुलांची हत्या करून स्वतःचं जीवन संपवायचे होते. चौघांची प्रकृती ढासळू लागल्यावर त्यांनी ओरडण्यास सुरुवात केली. त्याचा आवाज ऐकून शेजारी आले. चौघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान धर्म चंदचा मृत्यू झाला. तर तिन्ही मुलांची प्रकृती चिंताजनक आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी