शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

Gangrape : ४ दिवस दारू पाजून आदिवासी महिलेवर केला सामूहिक बलात्कार

By पूनम अपराज | Updated: February 11, 2021 17:11 IST

Gangrape in Amravati : या संपूर्ण घटनेची तक्रार पोलिस ठाण्यात करणार असे महिलेने सांगितले, म्हणूनच संतप्त आरोपींनी तिचा खून केला.

ठळक मुद्देअटक केलेल्या आरोपींमध्ये नामेश मेश्राम, सुधीर रघुपती वानखेडे आणि विनोद तुकाराम वानखेडे यांचा समावेश आहे.

अमरावती - महाराष्ट्रात सामूहिक बलात्काराची घटना अमरावती जिल्ह्यात उघडकीस आली आहे. शिरखेड पोलिसांनी आरोपींना अटक करुन तुरूंगात पाठविले आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये नामेश मेश्राम, सुधीर रघुपती वानखेडे आणि विनोद तुकाराम वानखेडे यांचा समावेश आहे. आरोपींनी महिलेला  चार दिवस खूप दारू पाजली. नंतर तिच्यावर पाशवी अत्याचार करून तिची हत्या केली.

तिवसा तालुक्यातील तळेगाव दाभेरी येथील महिलेचे प्रेत शिवारात चेहरा दगडाने चेचलेल्या व पार्श्वभागात काड्या खुपसलेल्या अवस्थेत ६ फेब्रुवारी रोजी आढळून आला होता. घटनास्थळ शिरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने पोलीस पाटलांच्या फिर्यादीवरून शिरखेड पोलिसांनी भादंविचे कलम ३०२, ३७६, ३७६ (१), ३७६ (२), २०१ अन्वये गुन्हा नोंदविला होता. या गुन्हयाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी हे स्थानिक गुन्हे शाखा व शिरखेड पोलीस ठाण्याच्या सहकार्याने करीत होते. सदर महिलेची ओळख पटल्यावर प्रथम तिचा वीटभट्टीवरील सहकारी नीलेश गोविंद मेश्राम (४२, रा.मनीपूर) याला ७ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली. तथापि, महिलेचा मृतदेह ज्या स्थितीत आढळला, त्यावरून या गुन्ह्यात आणखी काही जण सहभागी असल्याचा होरा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांचा होता. नीलेश हा काही तरी लपवत आहे, हे त्याच्या शारीरिक परिभाषेवरून लक्षात आले होते. त्यामुळे त्याला पोलीस कोठडीदरम्यान विश्वासात घेऊन वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. आता नीलेशने पोलिसांना दिलेल्या कबुलीनुसार, तळेगाव येथील गावगुंड सुधीर रघुपती वानखडे व विनोद तुकाराम वानखडे यांनी मृत महिलेचा खून केला. यानंतर त्यांनी नीलेशला हत्येचा आरोपी होण्यास सांगितले व तसे न केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली.

असा केला खून नीलेशच्या कथनानुसार, १ फेब्रुवारी.रोजी सकाळी १० वाजता मृत महिला ही वीटभट्टीवरून सारवायला शेण घेऊन येते, असे सांगून गेली होती. ४ फेब्रुवारीपर्यंत सुधीर व विनोद याांनी तिला त्यांचेकडे ठेवून घेतले. रघुपती वानखडे याच्या पडीक शेतात दोन्ही आरोपींनी तिच्यावर लैंगिक अत्याचार व निर्घृण खून केला. यानंतर त्यांनी नीलेशला धमकावून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.काय प्रकरण आहे?अमरावती जिल्ह्यातील शिरखेड पोलिस स्टेशनअंतर्गत तळेगाव येथे एका आदिवासी महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. त्यावेळी याप्रकरणी पोलिसांनी निलेश मेश्राम यांना अटक केली. पोलिस चौकशीत आरोपी मेश्राम यांनी उर्वरित गुन्हेगारांची नावेही दिली, त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटकही केली. या संपूर्ण घटनेची तक्रार पोलिस ठाण्यात करणार असे महिलेने सांगितले, म्हणूनच संतप्त आरोपींनी तिचा खून केला.गुन्हे शाखेच्या मदतीने आरोपीला अटकयाप्रकरणी गुन्हे शाखेची मदत घेत फरार असलेल्या दोन आरोपींना स्थानिक पोलिसांनी (महाराष्ट्र पोलिसांनी) अटक केली असून, निलेश मेश्राम याने सांगितले की, इतर दोन आरोपींनी मिळून महिलेची हत्या केली होती. आरोपीविरूद्ध हत्या आणि सामूहिक बलात्कारासह इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण आहे. आरोपींच्या मोबाईल लोकेशनच्या मदतीने फरार असलेल्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळAmravatiअमरावतीPoliceपोलिसArrestअटकMaharashtraमहाराष्ट्र