शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कुटुंबातील १६ जणांच्या हत्येचा होता प्लॅन; २० दिवसांत ५ संपवले, नवा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2023 13:38 IST

पोलिसांनी सध्या या प्रकरणाच्या तपासासाठी ५ टीम तयार केल्या आहेत.

गडचिरोली – जिल्ह्यात घडलेल्या ५ जणांच्या हत्याकांडामुळे राज्यात तसेच देशभरात चर्चा आहे. २ महिलांनी मिळून २० दिवसांत कुटुंबातील ५ सदस्यांची हत्या केली. या हत्या हळूहळू कुणालाही संशय येऊ नये अशा केल्या. अखेर पोलिसांनी २ महिलेला अटक केली. कुटुंबातील सदस्यांच्या जेवणात विषारी द्रव टाकून हत्या करण्यात आली. या महिलांनी जेवणात आणि पाण्यात हे मिसळले होते. एका आरोपीला तिचा पती आणि सासरच्यांकडून सतत टोमणे मारले जात होते म्हणून तिने क्रूर कृत्य केले तर दुसऱ्या महिलेला वडिलोपार्जित मालमत्तेवरून वाद झाला होता म्हणून या दोन्ही महिला आरोपींनी १६ जणांना मारण्याचं प्लॅनिंग आखल्याचा धक्कादायक खुलासा पोलीस तपासात झाला आहे.

२६ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत ही घटना घडली. एका पाठोपाठ एका कुटुंबातील ५ लोकांची हत्या झाल्याने सगळेच हैराण झाले होते. हे सर्व मृत्यू नैसर्गिक वाटत होते. मृत लोकांच्या शरीरात वेदना, पाठीच्या खालील बाजून आणि डोके प्रचंड दुखू लागले, त्यामुळे उपचारावेळी यांचा मृत्यू झाला. २० सप्टेंबरला महागावातील शंकर कुंभारे आणि पत्नी विजया कुंभारे आजारी पडले. २६ सप्टेंबर आणि २७ सप्टेंबरला त्या दोघांचा मृत्यू झाला. त्यानंतर काही दिवसांनी शंकर यांचा मुलगा रोशन, मुलगी कोमल, आनंद यांनाही हीच लक्षणे जाणवली आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या तिघांनी ८ ते १५ ऑक्टोबर काळात जीव सोडला.

कुटुंबाची अडचण आणखी वाढली जेव्हा शंकर यांचा दुसरा मुलगा सागर हा आई वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी दिल्लीहून आला होता. घरी परतल्यानंतर तोदेखील आजारी पडला. शंकर आणि विजया यांना चंद्रपूरला घेऊन जाणारा चालकही आजारी पडला. कुटुंबाच्या मदतीला आलेला एक नातेवाईकही अशाच लक्षणांनी आजारी पडला. त्याला हॉस्पिटलला दाखल करावे लागेल. जेव्हा डॉक्टरांना विषबाधेचा संशय आला मात्र प्राथमिक तपासात याची पुष्टी झाली नाही. पोलिसांनी सध्या या प्रकरणाच्या तपासासाठी ५ टीम तयार केल्या आहेत.

धोतराच्या बियाच्या विषारी द्रवाचा पहिला प्रयोग फसल्यानंतर संघमित्रा रामटेकेने इंटनेवर दर्प व रंग नसलेले द्रव शोधून काढले. हे द्रव तिला रोझा रामटेकेने उपलब्ध करून दिले. रोझाचे माहेर तेलंगणातील कागझनगर आहे. तेथून तिने हे द्रव मागविले असावे, असा पोलिसांचा अंदाज असून, त्यादृष्टीने तपास सुरू आहे. रोझाच्या संपर्कात नेमके कोण होते, याबाबत चौकशी सुरू असून, त्यानंतर आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी