शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

कमलेश तिवारी हत्येप्रकरणी एटीएसने केली कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2019 22:04 IST

नागपूर येथून केली आरोपीला अटक

ठळक मुद्देनागपूर युनिटने झिंगाबाई टाकळी येथून सैय्यद असीम अली (२९) याला अटक केली आहे.ट्रान्झिट रिमांड मंजूर करण्यात आला आहे. त्याचा ताबा लवकरच उत्तर प्रदेश पोलीस घेणार आहेत.  

मुंबई - उत्तर प्रदेशातील हिंदू संघटनेचा कार्यकर्ता कमलेश तिवारी याच्या हत्येप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले असून, त्यापैकी तिघांना सुरतहून अटक केली आहे. या संशयितांनी आपला गुन्हा मान्य केल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, हे दहशतवादी कृत्य असल्याचे पोलिसांनी खंडन केले. यानंतर महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाच्या नागपूर युनिटने झिंगाबाई टाकळी येथून सैय्यद असीम अली (२९) याला अटक केली आहे. सैय्यद हा हार्डवेअर दुकानाचा मालक आहे.  पोलिसांनी बिजनौरमधून मौलाना अनवर उल हक याला अटक केली होती. याशिवाय मौलाना मुफ्ती नईम काजमीविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांनी कमलेश तिवारीला ठार करणाऱ्यास दीड कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाईल, असे २०१५ साली जाहीर केले होते. कमलेश तिवारीने प्रक्षोभक व आक्षेपार्ह भाषण केले होते. लखनौमध्ये कमलेश तिवारी यांची १८ ऑक्टोबर रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली होती. अटक केलेल्या इतर आरोपींच्या सतत संपर्कात सैय्यद असल्याने त्याचा मागावर एटीएसचे पथक होते. त्याला नागपूर येथून अटक करून चौकशी केली असता त्याचा या हत्याकांडात महत्वपूर्ण सहभाग असल्याचं चौकशीअंती निष्पन्न झाले आहे. याबाबतची माहिती उत्तर प्रदेश पोलिसांना देण्यात आली आहे. सैय्यदला नागपूर येथील कोर्टात हजर केले असता त्याचा ट्रान्झिट रिमांड मंजूर करण्यात आला आहे. त्याचा ताबा लवकरच उत्तर प्रदेश पोलीस घेणार आहेत.  कशी केली हत्या?तिवारी यांची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. पैंगबरांवरील विधानामुळे ते चर्चेत होते. लखनौ खुर्शीद बाग येथील हिंदू समाज पार्टी कार्यालयात चहा पिण्याच्या बहाण्याने हल्लेखोर आले होते. मिठाईच्या डब्यात चाकू आणि देशी कट्टा घेऊन आले होते. येथे हल्लेखोराने तिवारी यांच्यावर हल्ला करत त्यांची गळा चिरून हत्या केली.

टॅग्स :Anti Terrorist SquadएटीएसnagpurनागपूरUttar Pradeshउत्तर प्रदेशMurderखूनArrestअटक