शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

धक्कादायक! पोलिसांवर दगडफेक, जळते फटाके फेकले; 'या' ठिकाणी परिस्थिती गंभीर, घटनेने खळबळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2021 14:29 IST

Unruly elements created ruckus in jabalpur : गर्दी पांगवण्यासाठी आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराचीही मदत घ्यावी लागली. पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली.

जबलपूर - मध्य प्रदेशच्या जबलपूर शहरात मंगळवारी काही लोकांनी खूप गोंधळ घातल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांवर दगडफेक करतानाच जळते फटाकेही फेकण्यात आले आहे. यामुळे पोलिसांनी देखील स्वसंरक्षणासाठी जमावावर लाठीचार्ज करावा लागला. तसेच गर्दी पांगवण्यासाठी आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराचीही मदत घ्यावी लागली. पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली. काही काळ यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जबलपूरमधल्या मच्छी बाजार परिसरात ही घटना घडली. मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्ताने मिलाद-उन-नबी साजरी करण्यासाठी येथे एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मोठ्या संख्येने लोक मशिदीत नमाज अदा करण्यासाठी गोळा होत होते. एकाच मार्गाने जाण्यासाठी पोलीस त्यांना विनंती करत होते. संवेदनशील भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागात पोलीसही सावध होते.

पोलिसांनीही लाठीचार्ज करत अश्रुधुराचा वापर केला

जबलपूरचे जिल्हा पोलीस अधिक्षक सिद्धार्थ बहुगुणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मच्छी बाजार हा संवेदनशील भाग आहे. त्यामुळे इथे मोठ्या संख्येत पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. मात्र, अचानक काही लोकांनी पोलिसांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक सुरू केली. तसेच जळते फटाकेही पोलिसांवर फेकण्यात आले. यानंतर पोलिसांनीही लाठीचार्ज करत अश्रुधुराचा वापर केला.

दगड फेकणाऱ्या लोकांची ओळख पटवण्यात यश

जिल्हाधिकारी कर्मवीर शर्मा यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांवर जळते फटाके आणि दगड फेकणाऱ्या लोकांची ओळख पटवण्यात यश आलं आहे. अशा उपद्रवींविरोधात कठोर कारवाई केली जाईल, जेणेकरून भविष्यात अशा घटना घडू नये असं देखील त्यांनी म्हटलं आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी