शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

"20 रुपये देऊन तो आमच्या मम्मीला घेऊन गेला"; 2 लेकरांनी सांगितलं महिलेचं प्रेमप्रकरण अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2022 16:19 IST

पली मुलं, पती आणि संसार सोडून ही महिला प्रियकरासोबत पळून गेल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

नवी दिल्ली - प्रेमासाठी काही लोक वाटेल ते करतात. त्याचे काही भन्नाट किस्सेही याआधी अनेकदा समोर आले आहेत. अशीच एक घटना आता घडली आहे. दोन चिमुकल्यांना सोडून एक महिला तिच्या तिच्या प्रियकरासोबत पळून गेल्याची घटना घडली आहे. आपली मुलं, पती आणि संसार सोडून ही महिला प्रियकरासोबत पळून गेल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. मुख्य म्हणजे या महिलेने मुलांना 20 रुपये देऊन खाऊ आणायला दुकानात पाठवलं आणि नंतर प्रियकरासोबत निघून गेली. 

आई पळून गेल्याने मुलांची अवस्था रडून रडून अत्यंत वाईट झाली आहे. तर पत्नी अचानक पळून गेल्याने पतीलाही धक्का बसला. पत्नी पळून गेलीये हे लोकांना सांगावं तरी कसं आणि तिला शोधावं तरी कसं? असा प्रश्न या पतीला पडला होता. पण नंतर त्याने हिंमत करत नातेवाईकांना घडलेला प्रकार सांगितला आणि पोलिसांत तक्रारही दिली. बिहारमध्ये ही घटना  घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार बथवारिया पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या एका महिलेला तिच्या प्रियकराने 20 रुपये दिले. ते पैसे त्याने तिच्या मुलांना द्यायला सांगितले आणि चॉकलेट, बिस्किट आणायला दुकानात पाठवले. 

तुम्ही चॉकलेट आणि बिस्किट आणून खाऊन घ्या, मी बँकेत पैसे काढायला जाते, असं सांगितलं. मुलं चॉकलेट आणि बिस्किटे घेऊन परतली तेव्हा त्यांची आई घरात नव्हती आणि तिच्यासोबत असणारा तिचा प्रियकरही नव्हता. बिस्किटे खाल्ल्यानंतर मुलांनी आई परत येण्याची वाट पाहिली, पण ती परत आलीच नाही. मुलांनी घडलेला सर्व प्रकार वडिलांना सांगितला. मुलांनी सांगितलेलं ऐकताच त्यांना धक्का बसला आणि तिला कसं शोधावं, नातेवाईकांना काय सांगावं? असा प्रश्न त्याला पडला. 

शेवटी नातेवाईकांना सांगितलं आणि त्यांच्याकडेही तिचा शोध घेतला, परंतु तिच्याबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही. त्यानंतर त्याने पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला. पतीने पोलीस ठाण्यात जाऊन एका व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली. महिलेच्या पतीने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटलंय की, "मला दोन मुलं आहेत. 24 मे 2022 रोजी माझ्या पत्नीने मुलांना 20 रुपये दिले आणि म्हणाली की तुम्ही दुकानातून चॉकलेट, बिस्किटं आणून खा, मी बँकेतून पैसे घेऊन येत आहे. परंतु, त्यानंतर ती परतली नाही." याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला असून तपास केला जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी