शहरं
Join us  
Trending Stories
1
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
2
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
3
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
4
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
5
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
6
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
7
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
8
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
9
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
10
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
11
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
12
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
13
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
15
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
16
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
17
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
18
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
19
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
20
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले

हरवलेली कागदपत्रे साडेपाच वर्षांनी मिळाली; ठाणे रेल्वे प्रशासनाने केली परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2020 1:35 AM

एका अनोळखी प्रवाशाने ठाणे रेल्वेस्थानकाचे तत्कालीन उपप्रबंधक लक्ष्मण दास यांच्याकडे २०१५ मध्ये रेल्वे प्रवासात मिळालेली एक प्लास्टिकची पिशवी आणून दिली.

ठाणे : तब्बल साडेपाच वर्षांपूर्वी हरवलेल्या एका प्लास्टिक पिशवीतील शैक्षणिक प्रमाणपत्रांसह महत्त्वाची कागदपत्रे ठाणे रेल्वे प्रशासनाने संबंधित केरळ येथील प्रवासी महिलेचा शोध घेऊन तिला बुधवारी सुपूर्द केली. ही महिला मूळची मुंबईतील रहिवासी असून लग्नानंतर ती केरळची रहिवासी झाली आहे.

एका अनोळखी प्रवाशाने ठाणे रेल्वेस्थानकाचे तत्कालीन उपप्रबंधक लक्ष्मण दास यांच्याकडे २०१५ मध्ये रेल्वे प्रवासात मिळालेली एक प्लास्टिकची पिशवी आणून दिली. त्यामध्ये रेजिमोल कुंजप्पन या महिलेची महत्त्वाची कागदपत्रे असल्याचे आढळले. पिशवीत काही दूरध्वनी क्रमांक दास यांना मिळाले. त्यापैकी एकही क्रमांक कुंजप्पन यांचा नव्हता. कागदपत्रांचे महत्त्व लक्षात घेऊन दास यांनी कुंजप्पन यांचा शोध घेण्याचा बराच प्रयत्न केला. दरम्यान, कुंजप्पन यांचा क्रमांक मिळाल्यावर त्यांच्याशी संपर्क झाला. त्यांना कागदपत्रांबाबत माहिती दिली. त्यावेळी त्यांनी आपण केरळ येथे असून मुंबईत परत येऊ तेव्हा संपर्क करून ती घेऊन जाऊ, असे सांगितले. परंतु, साडेपाच वर्षांत त्यांचे मुंबईत येणेच झाले नाही. त्यातच, नोव्हेंबर २०२० मध्ये त्या मुंबईत आल्या. तेव्हा त्यांनी दास यांच्याशी संपर्क करून आपल्या हरवलेल्या कागदपत्रांची माहिती घेऊन ती त्यांच्याकडून परत मिळवली. त्यावेळी, त्यांनी रेल्वे प्रशासनाचेही आभार मानले.  

जन्म दाखला, सिनिअर केजीपासून बी. कॉम या कागदपत्रांसह एटीएमकार्ड, चेकबुक, छायाचित्र आदी महत्त्वाची कागदपत्रे गहाळ झाली होती. त्यामुळेच कुंजप्पन यांच्याशी संपर्क साधला. आठ महिन्यांनी त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर खातरजमा करून ती त्यांना परत केली.  - लक्ष्मण दास, तत्कालीन उपप्रबंधक,     ठाणे रेल्वेस्थानक

 

टॅग्स :railwayरेल्वे