शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

हरवलेली कागदपत्रे साडेपाच वर्षांनी मिळाली; ठाणे रेल्वे प्रशासनाने केली परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 01:35 IST

एका अनोळखी प्रवाशाने ठाणे रेल्वेस्थानकाचे तत्कालीन उपप्रबंधक लक्ष्मण दास यांच्याकडे २०१५ मध्ये रेल्वे प्रवासात मिळालेली एक प्लास्टिकची पिशवी आणून दिली.

ठाणे : तब्बल साडेपाच वर्षांपूर्वी हरवलेल्या एका प्लास्टिक पिशवीतील शैक्षणिक प्रमाणपत्रांसह महत्त्वाची कागदपत्रे ठाणे रेल्वे प्रशासनाने संबंधित केरळ येथील प्रवासी महिलेचा शोध घेऊन तिला बुधवारी सुपूर्द केली. ही महिला मूळची मुंबईतील रहिवासी असून लग्नानंतर ती केरळची रहिवासी झाली आहे.

एका अनोळखी प्रवाशाने ठाणे रेल्वेस्थानकाचे तत्कालीन उपप्रबंधक लक्ष्मण दास यांच्याकडे २०१५ मध्ये रेल्वे प्रवासात मिळालेली एक प्लास्टिकची पिशवी आणून दिली. त्यामध्ये रेजिमोल कुंजप्पन या महिलेची महत्त्वाची कागदपत्रे असल्याचे आढळले. पिशवीत काही दूरध्वनी क्रमांक दास यांना मिळाले. त्यापैकी एकही क्रमांक कुंजप्पन यांचा नव्हता. कागदपत्रांचे महत्त्व लक्षात घेऊन दास यांनी कुंजप्पन यांचा शोध घेण्याचा बराच प्रयत्न केला. दरम्यान, कुंजप्पन यांचा क्रमांक मिळाल्यावर त्यांच्याशी संपर्क झाला. त्यांना कागदपत्रांबाबत माहिती दिली. त्यावेळी त्यांनी आपण केरळ येथे असून मुंबईत परत येऊ तेव्हा संपर्क करून ती घेऊन जाऊ, असे सांगितले. परंतु, साडेपाच वर्षांत त्यांचे मुंबईत येणेच झाले नाही. त्यातच, नोव्हेंबर २०२० मध्ये त्या मुंबईत आल्या. तेव्हा त्यांनी दास यांच्याशी संपर्क करून आपल्या हरवलेल्या कागदपत्रांची माहिती घेऊन ती त्यांच्याकडून परत मिळवली. त्यावेळी, त्यांनी रेल्वे प्रशासनाचेही आभार मानले.  

जन्म दाखला, सिनिअर केजीपासून बी. कॉम या कागदपत्रांसह एटीएमकार्ड, चेकबुक, छायाचित्र आदी महत्त्वाची कागदपत्रे गहाळ झाली होती. त्यामुळेच कुंजप्पन यांच्याशी संपर्क साधला. आठ महिन्यांनी त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर खातरजमा करून ती त्यांना परत केली.  - लक्ष्मण दास, तत्कालीन उपप्रबंधक,     ठाणे रेल्वेस्थानक

 

टॅग्स :railwayरेल्वे