शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

हरवलेली कागदपत्रे साडेपाच वर्षांनी मिळाली; ठाणे रेल्वे प्रशासनाने केली परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 01:35 IST

एका अनोळखी प्रवाशाने ठाणे रेल्वेस्थानकाचे तत्कालीन उपप्रबंधक लक्ष्मण दास यांच्याकडे २०१५ मध्ये रेल्वे प्रवासात मिळालेली एक प्लास्टिकची पिशवी आणून दिली.

ठाणे : तब्बल साडेपाच वर्षांपूर्वी हरवलेल्या एका प्लास्टिक पिशवीतील शैक्षणिक प्रमाणपत्रांसह महत्त्वाची कागदपत्रे ठाणे रेल्वे प्रशासनाने संबंधित केरळ येथील प्रवासी महिलेचा शोध घेऊन तिला बुधवारी सुपूर्द केली. ही महिला मूळची मुंबईतील रहिवासी असून लग्नानंतर ती केरळची रहिवासी झाली आहे.

एका अनोळखी प्रवाशाने ठाणे रेल्वेस्थानकाचे तत्कालीन उपप्रबंधक लक्ष्मण दास यांच्याकडे २०१५ मध्ये रेल्वे प्रवासात मिळालेली एक प्लास्टिकची पिशवी आणून दिली. त्यामध्ये रेजिमोल कुंजप्पन या महिलेची महत्त्वाची कागदपत्रे असल्याचे आढळले. पिशवीत काही दूरध्वनी क्रमांक दास यांना मिळाले. त्यापैकी एकही क्रमांक कुंजप्पन यांचा नव्हता. कागदपत्रांचे महत्त्व लक्षात घेऊन दास यांनी कुंजप्पन यांचा शोध घेण्याचा बराच प्रयत्न केला. दरम्यान, कुंजप्पन यांचा क्रमांक मिळाल्यावर त्यांच्याशी संपर्क झाला. त्यांना कागदपत्रांबाबत माहिती दिली. त्यावेळी त्यांनी आपण केरळ येथे असून मुंबईत परत येऊ तेव्हा संपर्क करून ती घेऊन जाऊ, असे सांगितले. परंतु, साडेपाच वर्षांत त्यांचे मुंबईत येणेच झाले नाही. त्यातच, नोव्हेंबर २०२० मध्ये त्या मुंबईत आल्या. तेव्हा त्यांनी दास यांच्याशी संपर्क करून आपल्या हरवलेल्या कागदपत्रांची माहिती घेऊन ती त्यांच्याकडून परत मिळवली. त्यावेळी, त्यांनी रेल्वे प्रशासनाचेही आभार मानले.  

जन्म दाखला, सिनिअर केजीपासून बी. कॉम या कागदपत्रांसह एटीएमकार्ड, चेकबुक, छायाचित्र आदी महत्त्वाची कागदपत्रे गहाळ झाली होती. त्यामुळेच कुंजप्पन यांच्याशी संपर्क साधला. आठ महिन्यांनी त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर खातरजमा करून ती त्यांना परत केली.  - लक्ष्मण दास, तत्कालीन उपप्रबंधक,     ठाणे रेल्वेस्थानक

 

टॅग्स :railwayरेल्वे