शहरं
Join us  
Trending Stories
1
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
2
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
3
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
4
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
5
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
6
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
7
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
8
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
9
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
10
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
11
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
12
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
13
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

तीन इराकी पर्यटकांना लावला चुना; लंडनधील व्यक्ती हाेती लुटारुंच्या संपर्कात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2020 15:37 IST

Crime News : तीन आराेपी गजाआड, दाेन फरार    

ठळक मुद्देपरदेशी नागरिकांना लुटल्यानंतर त्यांना खालापूर टाेल नाक्याजवळ साेडण्यात आले हाेते. त्यानंतर ते पुन्हा मुंबई येथे गेले आणि सहारा पाेलिस ठाण्यात घडलेला सर्व प्रकार सांगितला.

आविष्कार देसाई   

                                                                                                                            रायगड - भारतात फिरण्यासाठी आलेल्या तीन परदेशी नागरिकांना लुटण्याचा प्रकार समोर आला आहे. तीनही पर्यटक हे इराक देशातील असल्याची माहिती मिळत आहे. परदेशातील त्यांच्या नातेवाईकांना धमकी देत खंडणी देखील मागतली हाेती. याप्रकरणी पाेलिसांनी तीन आराेपींना पकडले आहे. अन्य फरार आराेपींचा शाेध सुरु आहे. या घटनेने चांगलीच खळबळ उडाली आहे. 

परदेशी नागरिकांना लुटल्यानंतर त्यांना खालापूर टाेल नाक्याजवळ साेडण्यात आले हाेते. त्यानंतर ते पुन्हा मुंबई येथे गेले आणि सहारा पाेलिस ठाण्यात घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर ते काेठे गेले याबाबत माहिती मिळत नसल्याचे पाेलिस सुत्रांनी सांगितले. रायगड जिल्ह्यातील खालापूर पाेलिस ठाण्यातही या घटनेची नाेंद करण्यात आली आहे. भारतातील पाच आराेपींच्या संपर्कामध्ये लंडनमधून एक व्यक्ती संपर्कात हाेती. लंडनमधील ती व्यक्ती एजंट असल्याचे बाेलले जाते. त्यांनेच इराकी नागरिकांची माहिती भारतातील लुटारुंना दिल्याचे समाेर येत आहे.

26 डिसेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे परदेशी नागरिक उतरले. यावेळी विमानतळावर काही व्यक्ती त्यांच्या नावाचे बोर्ड घेवून उभे होते. बोर्ड पाहून परदेशी नागरिक त्यांच्या वाहनातून इच्छित स्थळी जाण्यास निघाले. त्यावेळी आपले अपहरण झाले आहे. याची त्यांना माहिती नव्हती. लुटारुंपैकी एकाने आपण सीबीआय अधिकारी असल्याचे सांगत या परदेशी नागिरकाचे पासपोर्ट आणि मोबाईल काढून घेतले. अन्य चार जणांनी परदेशात त्याच्या नातेवाईकांकडे फोनद्वारे संपर्क साधत खंडणीची मागणी केली. खंडीची मागणी पूर्ण होईपर्यंत त्यांना गाडीमधून ठिकठिकाणी फिरवले. पैसे मिळत नाही याचा अंदाज आल्यानंतर सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास या लुटारुंनी या परदेशी नागरिकांना मुंबई-पुणे एक्सप्रेसवरील खालापूर टोलनाक्यापासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर साेडले. त्या आधी त्यांनी त्यांना अटक करण्याची धमकी देत पैसे, मोबाईल आणि बॅग असा सुमारे 90 हजार रुपयांचा ऐवज काढून घेतला.खालापूर टोलनाका येथे पोलिस असल्याचे पाहील्याने लुटारुंचे धाबे दणाणले. त्यांनी पैस घेऊन मोबाईल आणि बॅग वाहनातच ठेवले आणि तेथून पळ काढला. पाेलिसांनी उरण-केगाव, पुणे आणि सातारा-मान येथून तीन आराेपींना अटक केली आहे.

                                                                                                                                                                                                        भारतातील पाच आराेपींसाेबत लंडनमधून एक व्यक्ती संपर्कात हाेती. त्या व्यक्तीकडून सर्व माहिती मिळत असल्याने तीन इराकी पर्यटकांना ट्रप करणे साेपे गेले. पाेलिसांनी तीन आराेपींना पकडले आहे. अन्य लवकरच पाेलिसांच्या जाळ्यात सापडतील.  -  अशाेक दुधे (जिल्हा पोलीस अधिक्षक) 

टॅग्स :fraudधोकेबाजीPoliceपोलिसRaigadरायगडArrestअटकLondonलंडन