शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

सीसीटीव्ही बंद, कर्जाचं ओझं आणि हत्या... तिहेरी हत्याकांड प्रकरणात पोलिसांचा धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 13:20 IST

एकाच कुटुंबातील तीन सदस्यांच्या गूढ मृत्यूप्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. या प्रकरणाच्या पोलीस तपासात एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे.

पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे एकाच कुटुंबातील तीन सदस्यांच्या गूढ मृत्यूप्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. या प्रकरणाच्या पोलीस तपासात एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. मृतांमध्ये रोमी दे आणि सुदेशना दे या दोन महिला आणि एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. त्याची हत्या एकाच कुटुंबातील दोन भावांनी, प्रसुन दे आणि प्रणय दे यांनी केल्याचा पोलिसांना संशय आहे. हे लक्षात घेण्यासारखं आहे की, दोन्ही भाऊ सध्या रुग्णालयात दाखल आहेत. रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर, पोलीस त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करू शकतात. कर्जाच्या ओझ्यामुळे भावांनी ही हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे.

१९ फेब्रुवारी रोजी सकाळी कोलकात्यातील टांगरा परिसरात एका अपघाताची माहिती वाहतूक पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे जेव्हा पोलीस प्रसून आणि प्रणयच्या घरी पोहोचले तेव्हा तेथील दृश्य पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला. रोमी दे, सुदेशना दे आणि एका अल्पवयीन मुलीचे मृतदेह घरात पडले होते. सुरुवातीच्या तपासात ही आत्महत्या असल्याचं मानलं गेलं होतं, परंतु पोस्टमॉर्टम रिपोर्टने हा दावा फेटाळून लावला. अहवालानुसार, तिघांचीही हत्या करण्यात आली होती.

गाडीचा भयानक अपघात 

पोलीस सूत्रांनी सांगितलं की, प्रसून आणि प्रणय हे सख्खे भाऊ आहेत, त्यांनी सर्वप्रथम त्यांच्या पत्नी आणि प्रसूनच्या मुलीची हत्या केली आणि नंतर आत्महत्या करण्याचा विचार केला. यासाठी दोघेही एका गाडीने बाहेर पडले, पण त्यांच्या गाडीला एक भयानक अपघात झाला. या अपघातात दोन्ही भाऊ गंभीर जखमी झाले आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. या कारणास्तव त्यांचा आत्महत्येचा प्लॅन फसला.

कर्जाचं ओझं हे मुख्य कारण

पोलीस तपासात असं दिसून आलं की, हे कुटुंब चामड्याच्या वस्तूंचा व्यवसाय करत होते आणि त्यांच्यावर खूप कर्ज होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्जाची रक्कम इतकी मोठी होती की, कुटुंबाला ती परतफेड करणं अशक्य झालं होतं. तरीही, प्रसून आणि प्रणय यांनी त्यांची आलिशान लाईफस्टाईल कमी केली नाही. महागडे कपडे, आलिशान गाड्या ही त्याची सवय झाली होती. कुटुंबाच्या जवळच्या लोकांच्या चौकशीत असंही दिसून आलं की कर्ज वाढत असतानाही, दोन्ही भावांनी त्यांच्या खर्चावर लगाम लावला नाही, ज्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती आणखी बिकट झाली. या भयानक घटनेमागे कर्जाचं ओझं हे मुख्य कारण असल्याचा पोलिसांचा दावा आहे.

सीसीटीव्ही कॅमेरे बंद

तपासादरम्यान आणखी एक महत्त्वाचा पुरावा समोर आला. ज्या दिवशी ही घटना घडली, त्या दिवशी घरात बसवलेले सर्व सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते. पोलिसांचं म्हणणं आहे की, हा योगायोग असू शकत नाही. त्यामुळे असं दिसतं की ही हत्या आधीच नियोजित होती आणि पुरावे नष्ट करण्यासाठी कॅमेरे जाणूनबुजून बंद करण्यात आले होते. याच कारणाने भावांवरील संशय आणखी वाढला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीwest bengalपश्चिम बंगालPoliceपोलिस