शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

सीसीटीव्ही बंद, कर्जाचं ओझं आणि हत्या... तिहेरी हत्याकांड प्रकरणात पोलिसांचा धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 13:20 IST

एकाच कुटुंबातील तीन सदस्यांच्या गूढ मृत्यूप्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. या प्रकरणाच्या पोलीस तपासात एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे.

पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे एकाच कुटुंबातील तीन सदस्यांच्या गूढ मृत्यूप्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. या प्रकरणाच्या पोलीस तपासात एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. मृतांमध्ये रोमी दे आणि सुदेशना दे या दोन महिला आणि एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. त्याची हत्या एकाच कुटुंबातील दोन भावांनी, प्रसुन दे आणि प्रणय दे यांनी केल्याचा पोलिसांना संशय आहे. हे लक्षात घेण्यासारखं आहे की, दोन्ही भाऊ सध्या रुग्णालयात दाखल आहेत. रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर, पोलीस त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करू शकतात. कर्जाच्या ओझ्यामुळे भावांनी ही हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे.

१९ फेब्रुवारी रोजी सकाळी कोलकात्यातील टांगरा परिसरात एका अपघाताची माहिती वाहतूक पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे जेव्हा पोलीस प्रसून आणि प्रणयच्या घरी पोहोचले तेव्हा तेथील दृश्य पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला. रोमी दे, सुदेशना दे आणि एका अल्पवयीन मुलीचे मृतदेह घरात पडले होते. सुरुवातीच्या तपासात ही आत्महत्या असल्याचं मानलं गेलं होतं, परंतु पोस्टमॉर्टम रिपोर्टने हा दावा फेटाळून लावला. अहवालानुसार, तिघांचीही हत्या करण्यात आली होती.

गाडीचा भयानक अपघात 

पोलीस सूत्रांनी सांगितलं की, प्रसून आणि प्रणय हे सख्खे भाऊ आहेत, त्यांनी सर्वप्रथम त्यांच्या पत्नी आणि प्रसूनच्या मुलीची हत्या केली आणि नंतर आत्महत्या करण्याचा विचार केला. यासाठी दोघेही एका गाडीने बाहेर पडले, पण त्यांच्या गाडीला एक भयानक अपघात झाला. या अपघातात दोन्ही भाऊ गंभीर जखमी झाले आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. या कारणास्तव त्यांचा आत्महत्येचा प्लॅन फसला.

कर्जाचं ओझं हे मुख्य कारण

पोलीस तपासात असं दिसून आलं की, हे कुटुंब चामड्याच्या वस्तूंचा व्यवसाय करत होते आणि त्यांच्यावर खूप कर्ज होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्जाची रक्कम इतकी मोठी होती की, कुटुंबाला ती परतफेड करणं अशक्य झालं होतं. तरीही, प्रसून आणि प्रणय यांनी त्यांची आलिशान लाईफस्टाईल कमी केली नाही. महागडे कपडे, आलिशान गाड्या ही त्याची सवय झाली होती. कुटुंबाच्या जवळच्या लोकांच्या चौकशीत असंही दिसून आलं की कर्ज वाढत असतानाही, दोन्ही भावांनी त्यांच्या खर्चावर लगाम लावला नाही, ज्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती आणखी बिकट झाली. या भयानक घटनेमागे कर्जाचं ओझं हे मुख्य कारण असल्याचा पोलिसांचा दावा आहे.

सीसीटीव्ही कॅमेरे बंद

तपासादरम्यान आणखी एक महत्त्वाचा पुरावा समोर आला. ज्या दिवशी ही घटना घडली, त्या दिवशी घरात बसवलेले सर्व सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते. पोलिसांचं म्हणणं आहे की, हा योगायोग असू शकत नाही. त्यामुळे असं दिसतं की ही हत्या आधीच नियोजित होती आणि पुरावे नष्ट करण्यासाठी कॅमेरे जाणूनबुजून बंद करण्यात आले होते. याच कारणाने भावांवरील संशय आणखी वाढला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीwest bengalपश्चिम बंगालPoliceपोलिस