शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! ५० लाखांची खंडणी न दिल्यानं विद्यार्थ्याला जिवंत जाळलं, मुख्यमंत्र्यांच्याच गावात धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 18:16 IST

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाता करत असले तरी त्यांच्याच गावात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

नालंदा

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाता करत असले तरी त्यांच्याच गावात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नालंदा जिल्ह्यातील एका विद्यार्थ्याचं अपहरण करण्यात आलं होतं आणि ५० लाखांची खंडणी न दिल्यानं अपहरणकर्त्यांनी विद्यार्थ्याला जिवंत जाळल्याचा प्रकार समोर आला आहे. १६ ऑक्टोबर रोजी बिहार ठाणे हद्दीतून विद्युत विभागात काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याच्या मुलाचं अपहरण करण्यात आलं होतं. 

मुसादपूर येथील रहिवासी कर्मी उर्मिला देवी यांनी त्यांचा २० वर्षीय मुलगा नितीश याचं अपहरण झाल्याची तक्रार नोंदवली होती. चौकशी दरम्यान, पोलिसांनी शाळेच्या संचालकांसह दोन संशयितांना ताब्यात घेतलं होतं. अपहरणकर्त्यांनी मंगळवारी सोहसरायच्या आशानगर येथील मदर तेरेसा शाळेच्या परिसरातून पोलिसांना हत्या प्रकरणाचे पुरावे हाती लागले. अपहरणकर्त्यांनी नितीश याला चक्क जीवंत जाळलं आणि त्यानंतर त्याच्या शरीराचे तुकडे करुन नदीत टाकून दिले. अटकेत असलेला शाळेचा संचालक दीपक कुमार उर्मिला देवी यांचाच कुटुंबिय असल्याचीही माहिती समोर आली आहे.

इतर आरोपींचा शोध सुरूडीसीपी शिब्ली नोमानी यांनी दिलेल्या माहितीनुसार शाळेच्या परिसरात हत्येसंदर्भात पुरावे हाती लागले. त्यानंतर श्वानपथकाला पाचारण करण्यात आलं व संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. आरोपींनी तरुणाला जीवंत जाळलं आणि त्यानंतर त्याच्या शरीराचे तुकडे करुन नदीत टाकले. या घटनेशी संबंधित इतर आरोपींचा शोध घेण्यासंदर्भात छापेमारी सुरू आहे. 

१६ ऑक्टोबरपर्यंत ५० लाखांच्या खंडणीची केली होती मागणीउर्मिला देवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ ऑक्टोबर रोजी नितीशनं त्याला ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटवरुन एक टेबल मागवायचा होता म्हणून १५० रुपये देऊन मी कामावर निघाले. संध्याकाळी घरी पोहोचले तेव्हा नितीश घरी नव्हता. रात्री उशिरापर्यंत तो घरी न परतल्यानं त्याच्या मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तर मोबाइलही स्विच ऑफ येऊ लागला. मध्यरात्री नितीशच्या मोबाइलवर एक फोन कॉल आला आणि खंडणीची मागणी केली गेली. नितीशचं अपहरण करण्यात आलं असून ५० लाख दिले नाहीत तर त्याला ठार करु अशी धमकी अपहरणकर्त्यांनी दिली होती. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBiharबिहारNitish Kumarनितीश कुमार