शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

अपहृत बालिकेचा लग्नाचा डाव मध्य प्रदेशमध्ये उधळला! तीन महिलांसह दोन पुरुषांना बेड्या

By अझहर शेख | Updated: August 2, 2022 21:24 IST

Kidnap Case : पोलिसांवर गावकऱ्यांकडून हल्ला

नाशिक : अल्पवयीन मुलीचे ओझर येथून महिलेने अपहरण करत थेट मध्य प्रदेशच्या सीमावर्ती गावात पावणेदाेन लाखांत विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिक ग्रामीण पोलिसांनी उघडकीस आणला आहे. मध्य प्रदेशच्या खरगोन जिल्ह्यातील लखापूर गावात या अपहृत अल्पवयीन मुलीचा इच्छेविरुद्ध लग्न लावण्याचा डाव पोलिसांच्या पथकाने हाणून पाडला. यावेळी गावकऱ्यांनी एकत्र येत ग्रामीण पोलिसांसह मध्य प्रदेश पोलिसांच्या पथकावर चाल केली. त्यांचा हल्ला थोपवून धरत पीडित अल्पवयीन मुलीची पोलिसांनी सुटका केली.

ओझर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून २३ जुलै रोजी एका १४ वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली. ओझर परिसरातील महामार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज पोलिसांनी तपासले असता एक अनोळखी महिला मुलीला घेऊन जात असल्याचे दिसून आले. पोलिसांनी तिची ओळख पटविली व सापळा रचून सातपूरमधून संशयित प्रियंका देविदास पाटील (रा. कार्बननाका) हिला ताब्यात घेतले. तिची कसून चौकशी केली असता तिने शिरपूर येथील तिची मैत्रीण संशयित रत्ना विक्रम कोळी हिच्या मदतीने मुलीचे अपहरण केले होते, अशी कबुली दिली. यानंतर पोलिसांनी संशयित महिला रत्ना कोळी हिला धुळे जिल्ह्यातील शिरपूरमधून ताब्यात घेतले. दोघींनी मिळून १ लाख ७५ हजार रुपये किमतीत अपहृत मुलीला गुजरात येथे लग्नासाठी विक्री केल्याचे सांगितले.

पोलिसांनी या दोघींसह त्यांची मुख्य दलाल जिचे मध्य प्रदेशमध्ये लागेबांधे आहेत, ती संशयित सुरेखाबाई जागो भिला (रा. शिरपूर) हिलाही बेड्या ठोकल्या. या तिघींची पोलिसांनी कसून चौकशी केली. पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून दोन पथके तयार केली. पोलीस निरीक्षक अशोक रहाटे, उपनिरीक्षक जी. ए. जाधव, महिला उपनिरीक्षक अर्चना तोडमल, हवालदार किशोर अहिरराव, विश्वनाथ धारबळ, अनुपम जाधव, रावसाहेब मोरे, राजेंद्र डंबाळे यांचे पथक गुजरातकडे रवाना केले. मुलीची विक्री मध्य प्रदेशमध्ये केली गेली होती. गुजरात येथून पुन्हा पोलिसांनी मध्य प्रदेशमध्ये दाखल होत मुलीची सुखरूप सुटका केली. 

 

१२ ते १६ वयोगटातील सामान्य कुटुंबातील मुलींना शोधून त्यांना पैसे, नोकरीचे आमिष दाखवत अपहरण करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीपर्यंत ‘ऑपरेशन मुस्कान’ राबवित पोलीस पोहोचले. या महिलांवर यापूर्वीही असे काही गुन्हे आहे का? याबाबत माहिती घेतली जात आहे. या पाचही संशयितांनी संघटितपणे गुन्हा केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. पैशांचे आमिष दाखवून बळजबरीने मुलीचे अपहरण केले व तेथे तिची लग्नासाठी विक्री केली. यामुळे त्यांच्याविरुद्ध अपहरणासह मानव तस्करीचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या म्होरक्याचा पोलीस शोध घेत आहेत.- सचिन पाटील, पोलीस अधीक्षक

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKidnappingअपहरणNashikनाशिकPoliceपोलिसMadhya Pradeshमध्य प्रदेश