शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

अपहृत बालिकेचा लग्नाचा डाव मध्य प्रदेशमध्ये उधळला! तीन महिलांसह दोन पुरुषांना बेड्या

By अझहर शेख | Updated: August 2, 2022 21:24 IST

Kidnap Case : पोलिसांवर गावकऱ्यांकडून हल्ला

नाशिक : अल्पवयीन मुलीचे ओझर येथून महिलेने अपहरण करत थेट मध्य प्रदेशच्या सीमावर्ती गावात पावणेदाेन लाखांत विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिक ग्रामीण पोलिसांनी उघडकीस आणला आहे. मध्य प्रदेशच्या खरगोन जिल्ह्यातील लखापूर गावात या अपहृत अल्पवयीन मुलीचा इच्छेविरुद्ध लग्न लावण्याचा डाव पोलिसांच्या पथकाने हाणून पाडला. यावेळी गावकऱ्यांनी एकत्र येत ग्रामीण पोलिसांसह मध्य प्रदेश पोलिसांच्या पथकावर चाल केली. त्यांचा हल्ला थोपवून धरत पीडित अल्पवयीन मुलीची पोलिसांनी सुटका केली.

ओझर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून २३ जुलै रोजी एका १४ वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली. ओझर परिसरातील महामार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज पोलिसांनी तपासले असता एक अनोळखी महिला मुलीला घेऊन जात असल्याचे दिसून आले. पोलिसांनी तिची ओळख पटविली व सापळा रचून सातपूरमधून संशयित प्रियंका देविदास पाटील (रा. कार्बननाका) हिला ताब्यात घेतले. तिची कसून चौकशी केली असता तिने शिरपूर येथील तिची मैत्रीण संशयित रत्ना विक्रम कोळी हिच्या मदतीने मुलीचे अपहरण केले होते, अशी कबुली दिली. यानंतर पोलिसांनी संशयित महिला रत्ना कोळी हिला धुळे जिल्ह्यातील शिरपूरमधून ताब्यात घेतले. दोघींनी मिळून १ लाख ७५ हजार रुपये किमतीत अपहृत मुलीला गुजरात येथे लग्नासाठी विक्री केल्याचे सांगितले.

पोलिसांनी या दोघींसह त्यांची मुख्य दलाल जिचे मध्य प्रदेशमध्ये लागेबांधे आहेत, ती संशयित सुरेखाबाई जागो भिला (रा. शिरपूर) हिलाही बेड्या ठोकल्या. या तिघींची पोलिसांनी कसून चौकशी केली. पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून दोन पथके तयार केली. पोलीस निरीक्षक अशोक रहाटे, उपनिरीक्षक जी. ए. जाधव, महिला उपनिरीक्षक अर्चना तोडमल, हवालदार किशोर अहिरराव, विश्वनाथ धारबळ, अनुपम जाधव, रावसाहेब मोरे, राजेंद्र डंबाळे यांचे पथक गुजरातकडे रवाना केले. मुलीची विक्री मध्य प्रदेशमध्ये केली गेली होती. गुजरात येथून पुन्हा पोलिसांनी मध्य प्रदेशमध्ये दाखल होत मुलीची सुखरूप सुटका केली. 

 

१२ ते १६ वयोगटातील सामान्य कुटुंबातील मुलींना शोधून त्यांना पैसे, नोकरीचे आमिष दाखवत अपहरण करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीपर्यंत ‘ऑपरेशन मुस्कान’ राबवित पोलीस पोहोचले. या महिलांवर यापूर्वीही असे काही गुन्हे आहे का? याबाबत माहिती घेतली जात आहे. या पाचही संशयितांनी संघटितपणे गुन्हा केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. पैशांचे आमिष दाखवून बळजबरीने मुलीचे अपहरण केले व तेथे तिची लग्नासाठी विक्री केली. यामुळे त्यांच्याविरुद्ध अपहरणासह मानव तस्करीचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या म्होरक्याचा पोलीस शोध घेत आहेत.- सचिन पाटील, पोलीस अधीक्षक

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKidnappingअपहरणNashikनाशिकPoliceपोलिसMadhya Pradeshमध्य प्रदेश