शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

खार हत्याप्रकरण : जान्हवी कुकरेजाच्या आरोपपत्रात त्रुटी, आरोपी जोगधनकरच्या वकिलांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 03:39 IST

जान्हवी कुकरेजा (वय १९) या विद्यार्थिनीच्या हत्येप्रकरणी खार पोलिसांनी अडीचशे पानी आरोपपत्र मंगळवारी (दि. ३०) कोर्टात दाखल केले. मात्र यात बऱ्याच त्रुटी असल्याचा दावा आरोपी असलेल्या श्री जाेगधनकर याच्या वकिलांकडून करण्यात आला

मुंबई :  जान्हवी कुकरेजा (वय १९) या विद्यार्थिनीच्या हत्येप्रकरणी खार पोलिसांनी अडीचशे पानी आरोपपत्र मंगळवारी (दि. ३०) कोर्टात दाखल केले. मात्र यात बऱ्याच त्रुटी असल्याचा दावा आरोपी असलेल्या श्री जाेगधनकर याच्या वकिलांकडून करण्यात आला असून, त्यामुळे पीडितेला खरा न्याय मिळणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.खार पोलिसांनी घटनेच्या तीन महिन्यांनंतर कोर्टात दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, भगवती हाईट्स इमारतीच्या १४व्या मजल्यावर २० जण पार्टी करीत होते. ज्यात सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने १२ जणांचे जबाब नोंदविण्यात आले. हिंदुजा रुग्णालयातील डॉक्टर, न्यायवैद्यक प्रयोगशाळेतील तज्ज्ञ यांचाही जबाब नाेंदविण्यात आला. जान्हवीच्या अंगावर ४८ जखमा आढळल्याचा उल्लेख आहे. मात्र श्री जोगधनकर याचे वकील ॲड. महेश वासवानी यांच्या म्हणण्यानुसार श्री याच्या पाठीच्या कण्याला दुखापत आहे; तसेच डोक्यालाही आठ इंचांची जखम आहे, जी एखादी बॉटल डोक्यावर फोडल्यामुळे झाल्याचा संशय आहे. ही जखम त्याला त्या दोन मुली (जान्हवी, दिया) यांनी मारहाण केल्यामुळे होऊ शकत नाही. तर, पोलिसांनी ज्या दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या, त्यानुसार दारू पिणाऱ्या सर्व जणांचे जबाब नोंदविण्यात आले नाहीत. त्यामुळे या प्रकरणात चौथ्याच व्यक्तीचा हात असून त्यानुसार सर्व वैद्यकीय अहवालही पोलिसांनी कोर्टात सादर करणे आवश्यक आहे. मात्र तसे करण्यात आलेले नाही, असेही ॲड. वासवानी यांचे म्हणणे आहे. पोलिसांची दिशाभूल होत असून, त्यानुसार त्यांनी चौकशी करावी, अशी मागणी करीत पीडितेला खरा न्याय मिळावा, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय