शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
2
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
3
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
4
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
5
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
6
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
7
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
8
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
9
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
10
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
11
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
12
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
13
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
14
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
15
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
16
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
17
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
18
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
19
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
20
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!

करण तुलीवर मारहाणीचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 21:47 IST

Karan Tuli case, crime news बिग बॉसने प्रसिद्ध झालेले अभिनेते आणि आरजे प्रीतम सिंह यांच्यावर हल्ला करणारे शिवसेनेचे माजी पदाधिकारी करण तुली आणि त्याच्या मित्राविरुद्ध कपिलनगर पोलिसांनी माराहाणीचा गुन्हा नोंदविला आहे.

ठळक मुद्देमित्राला बनविले आरोपी : अभिनेता प्रीतमवर हल्ला प्रकरण

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : बिग बॉसने प्रसिद्ध झालेले अभिनेते आणि आरजे प्रीतम सिंह यांच्यावर हल्ला करणारे शिवसेनेचे माजी पदाधिकारी करण तुली आणि त्याच्या मित्राविरुद्ध कपिलनगर पोलिसांनी माराहाणीचा गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणानंतर करण आणि त्याच्या मित्रांमध्ये खळबळ उडाली आहे.

प्रीतमने सहा महिन्यांपूर्वी अभिनेत्री कंगना रणावत यांचे सोशल मीडियावर समर्थन केले होते. या कारणाने तुली नाराज होता. काही दिवसांपूर्वी प्रीतम नागपुरात आपल्या घरी आला होता. हल्ल्याची घटना २६ डिसेंबरच्या रात्रीची आहे. प्रीतम सिंह हे मित्र गुरुप्रीत भंडारी यांच्यासोबत जात होते. कपिलनगरात करण तुलीने प्रीतमला आवाज देऊन बोलाविले आणि कंगना रणावतला समर्थन का दिले, अशी विचारणा करीत मित्र रिची शेठीच्या मदतीने त्याच्यावर हल्ला केला. त्यानंतर करण हा प्रीतमच्या वडिलांच्या रेस्टॉरंटमध्ये गेला. त्या ठिकाणी प्रीतमचे आई-वडील आणि बहिणीला शिवीगाळ करून धमकी दिली. करणने शिवसेनेच्या नावाने धमकी दिल्याने प्रीतम घाबरला होता. प्रीतमने या घटनेची तक्रार दुसऱ्या दिवशी कपिलनगर ठाण्यात नोंदविली. घाबरल्याने त्याने पोलिसांना खरी बाब सांगितली नाही. या कारणाने पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदविला होता.

प्रीतमने २८ डिसेंबरला वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन घटनेची तक्रार केली होती. त्यानंतर कपिलनगर पोलिसांनी प्रीतम आणि करणला चौकशीसाठी बोलविले होते. कारवाईची माहिती मिळताच करण भूमिगत झाला. प्रीतमची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर करण तुली आणि रिची सेठीविरुद्ध माराहाण आणि धमकीचा गुन्हा नोंदविला.

करण तुली पूर्वीही वादात सहभागी आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी रामदासपेठ येथील हॉटेल संचालक आणि त्याच्या मुलाला माराहाणीच्या प्रकरणात चर्चेत आला होता. तो स्वत:ला शिवसेनचा पदाधिकारी असल्याचे सांगतो. त्या कारणाने लोक त्याची तक्रार करीत नाहीत. प्रीतम सिंहचे आई-वडील वयस्क आहेत. त्यांना धमकी देण्याचे प्रकरण गंभीर आहे. या प्रकरणात हल्ला करणारा करण आणि त्यांच्या मित्रांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची त्यांची मागणी आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर