शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

लग्न झालं, मधुचंद्राच्या रात्री पत्नीचा फोन वाजला, ती रात्रचं शेवटची ठरली; धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 19:38 IST

उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका तरुणाच्या लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी हत्या झाल्याचे समोर आले आहे. या तरुणाची मधुचंद्राची रात्र ही शेवटची रात्र ठरली आहे. तरुणाची हत्या झाल्याचे समोर आले आहे. हत्येनंतर नातेवाईकांनी गुन्हा दाखल केला. मात्र, ९ महिन्यांपासून मृताची आई हत्येतील आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांच्या फेऱ्या मारत आहे. मृताच्या आईचा आरोप आहे की, हनिमूनच्या वेळी वधूच्या मोबाईलवर कोणाचा तरी फोन आणि मेसेज आला होता. त्यानंतर मुलगा बाहेर गेला आणि २० किलोमीटर अंतरावर त्याची हत्या करण्यात आली. (Crime News)

या प्रकरणी पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला, मात्र ९ महिने उलटूनही कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. या हत्येतील आरोपींना अटक करण्याची मागणी मृताच्या आईने पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. मुलाच्या हत्येत पत्नीचाही हात असल्याचा आरोप आईने केला आहे.

"साहेब, मी माझ्या पत्नीची हत्या केली", पत्नीच्या हत्येनंतर आरोपीने गाठले पोलीस ठाणे

मिळालेल्या माहितीनुसार, कानपूरमधील घाटमपूर येथील रहिवासी असलेल्या सर्वेश या तरुणाचे १७ मे २०२२ रोजी लग्न झाले होते. त्यानंतर १९ मे रोजी  सर्वेशचा मृतदेह घरापासून २० किलोमीटर अंतरावर रेल्वे लाईनच्या बाजूला अर्धनग्न अवस्थेत आढळून आला होता. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. मात्र, आजपर्यंत या हत्येतील आरोपींचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही.

या प्रकरणाबाबत सर्वेशची आई लीलावती मुलाच्या लग्नाची पत्रिका घेऊन पोलीस आयुक्तांना भेटण्यासाठी पोहोचल्या. लीलावती म्हणाल्या की, मधुचंद्राच्या रात्री वधूच्या फोनवर कोणीतरी फोन आला, त्यानंतर मेसेजही आला. यानंतर मुलगा खोलीतून निघून गेला. यानंतर घरापासून २० किलोमीटर अंतरावर बडी पाल येथील रेल्वे लाईनजवळ त्यांचा मृतदेह आढळून आला. ज्या क्रमांकावरून वधूला फोन आला होता, त्या क्रमांकावर फोन केला, पण तो फोन बंद होता. यानंतर पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. मात्र आजपर्यंत मारेकरी सापडलेले नाहीत.

या हत्येत नववधूचा हात असल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. तिच्या मोबाईलवर कॉल आल्यानंतर मुलगा घरातून निघून गेला होता. मात्र, पोलिसांनी अद्याप चौकशी केली नाही, मोबाईल क्रमांकाच्या आधारे कोणालाही अटक करण्याचा प्रयत्न केला नाही, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस